शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

पाऊसच दोषी, प्रशासन निर्दोेष

By admin | Updated: June 16, 2017 00:57 IST

महापौरांचा दावा : गटार योजना, प्लॅस्टिक पिशव्यांमुळे साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मुसळधार पाऊस पडल्यानंतर पावसाळी गटारींच्या अपुऱ्या वहनक्षमतेमुळे तसेच गटारींच्या ढाप्यांवर अडकलेल्या प्लॅस्टिक पिशव्या यामुळेच बुधवारी पावसात शहर जलमय झाल्याचा अजब निष्कर्ष महापौर रंजना भानसी यांनी काढला असून, त्यांनी अधिकाऱ्यांची पाठराखण केली. पावसाळापूर्व कामांसाठी नियमानुसार संपूर्ण शहराकरिता एकच ठेका काढला जाणे अपेक्षित असताना, या कामांचे तुकडे करून प्रभागनिहाय ३१ ठेके दिल्याचा प्रकारही महापौरांनी बोलविलेल्या बैठकीत उघड झाला. त्यामुळे भाजपाच्या पारदर्शक कामकाजावर विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे.बुधवारी (दि. १४) दुपारी साडेचार ते सायंकाळी सहा या दीड तासाच्या कालावधीत शहर व परिसरात कोसळलेल्या मुसळधार पावसाने महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांचे बिंग फुटले. शहरात पावसाळी गटार योजना तसेच खुले नाले असतानाही पाण्याचा निचरा न झाल्याने शहरात अनेक ठिकाणी तळे साचले. अनेक भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना धावपळ करावी लागली. मध्यवर्ती भागात कापडपेठ, सराफ बाजार आणि भांडी बाजारात अक्षरश: हाहाकार उडाला. दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. या पार्श्वभूमीवर महापौर भानसी यांनी बांधकाम, आरोग्य व ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावत आढावा घेतला. या बैठकीस उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेते दिनकर पाटील, भाजपा गटनेते संभाजी मोरूस्कर, शहर अभियंता यू. बी. पवार, आरोग्याधिकारी सुनील बुकाणे, कार्यकारी अभियंता गौतम पगारे आदी उपस्थित होते.महापौरांचा शिवसेनेला टोलानाशिक जलमय होण्यामागे पावसाळी गटार योजनेची अपुरी वहनक्षमता असल्याचे नमूद करीत महापौर रंजना भानसी यांनी अप्रत्यक्षरीत्या शिवसेनेवर निशाणा साधला. मुंबईत पावसाळी गटारींची पावसाळी पाणी वहनक्षमता नाशिकपेक्षा कितीतरी पटीने अधिक असताना पावसाळ्यात मुंबईदेखील जलमय होते, असा दाखला महापौरांनी दिला.