शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
3
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
4
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
5
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
6
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
7
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
8
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
9
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
10
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
11
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
12
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
13
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
14
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
15
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
16
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
18
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
19
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
20
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!

पाऊसच दोषी, प्रशासन निर्दोेष

By admin | Updated: June 16, 2017 00:57 IST

महापौरांचा दावा : गटार योजना, प्लॅस्टिक पिशव्यांमुळे साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मुसळधार पाऊस पडल्यानंतर पावसाळी गटारींच्या अपुऱ्या वहनक्षमतेमुळे तसेच गटारींच्या ढाप्यांवर अडकलेल्या प्लॅस्टिक पिशव्या यामुळेच बुधवारी पावसात शहर जलमय झाल्याचा अजब निष्कर्ष महापौर रंजना भानसी यांनी काढला असून, त्यांनी अधिकाऱ्यांची पाठराखण केली. पावसाळापूर्व कामांसाठी नियमानुसार संपूर्ण शहराकरिता एकच ठेका काढला जाणे अपेक्षित असताना, या कामांचे तुकडे करून प्रभागनिहाय ३१ ठेके दिल्याचा प्रकारही महापौरांनी बोलविलेल्या बैठकीत उघड झाला. त्यामुळे भाजपाच्या पारदर्शक कामकाजावर विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे.बुधवारी (दि. १४) दुपारी साडेचार ते सायंकाळी सहा या दीड तासाच्या कालावधीत शहर व परिसरात कोसळलेल्या मुसळधार पावसाने महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांचे बिंग फुटले. शहरात पावसाळी गटार योजना तसेच खुले नाले असतानाही पाण्याचा निचरा न झाल्याने शहरात अनेक ठिकाणी तळे साचले. अनेक भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना धावपळ करावी लागली. मध्यवर्ती भागात कापडपेठ, सराफ बाजार आणि भांडी बाजारात अक्षरश: हाहाकार उडाला. दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. या पार्श्वभूमीवर महापौर भानसी यांनी बांधकाम, आरोग्य व ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावत आढावा घेतला. या बैठकीस उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेते दिनकर पाटील, भाजपा गटनेते संभाजी मोरूस्कर, शहर अभियंता यू. बी. पवार, आरोग्याधिकारी सुनील बुकाणे, कार्यकारी अभियंता गौतम पगारे आदी उपस्थित होते.महापौरांचा शिवसेनेला टोलानाशिक जलमय होण्यामागे पावसाळी गटार योजनेची अपुरी वहनक्षमता असल्याचे नमूद करीत महापौर रंजना भानसी यांनी अप्रत्यक्षरीत्या शिवसेनेवर निशाणा साधला. मुंबईत पावसाळी गटारींची पावसाळी पाणी वहनक्षमता नाशिकपेक्षा कितीतरी पटीने अधिक असताना पावसाळ्यात मुंबईदेखील जलमय होते, असा दाखला महापौरांनी दिला.