शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
2
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
3
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
4
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
5
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
6
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
7
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
8
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
9
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
10
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
11
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
12
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
13
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
14
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
15
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
16
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
18
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
19
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
20
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!

जिल्ह्यात पावसाची हजेरी

By admin | Updated: June 26, 2016 00:04 IST

शेतकरी सुखावला : मुंबई-आग्रा महामार्गावर धुक्याचे साम्राज्य

 इगतपुरी : पावसाचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी शहर परिसरात शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. दिवसभर दमदार पाऊस पडल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे. आजच्या पावसामुळे काही ठिकाणी शेतीच्या कामांना वेग आला आहे.यंदा पावसाने वीस ते एकवीस दिवस उशिरा हजेरी लावली असली तरी आता बळीराजा भात पेरणीच्या कामाला लागला आहे.आज सकाळ पासून पाऊस रिमझिम पाऊस पडत होता. दुपारपासून पावसाने चांगलाच जोर धरला. शहरातील मुख्यबाजर पेठेत पावसामुळे ग्राहकांची गर्दी मंदावली होती .सर्वाधिक वर्दळीचा ओळखल्या जाणाऱ्या मुंबई -आग्रा महामार्गावरील वाहतुक कसारा घाटातील धुक्यामुळे काहीकाळ मंदावली होती. कसारा घाटातील महामार्गावर सर्वत्र धुके पसरले होते. धुक्यामुळे वाहन चालकांना वाहनांचे दिवे लावुनच मार्गक्रमण करावे लागत होते. त्र्यंबक : त्र्यंबक परिसरात शनिवारी रिमझिम पाऊस झाला. शुक्रवारपासून त्र्यंबक परिसरात पावसास सुरुवात झाली असून, पेरणीसाठी त्र्यंबक तालुक्यातील शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. दमदार पाऊस नसल्याने अद्याप त्र्यंबकेश्वर तालुक्यात पेरण्यांना सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते खरेदीस सुरुवात केली आहे. कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळत आहे. रिमझिम पावसामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (वार्ताहर) (वार्ताहर)