शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

खेडगाव परिसरात पावसाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 14:55 IST

खेडगाव : दोन दिवसांपासून सुरू असलल्या मुसळधार पावसामुळे परिसरात शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

खेडगाव : दोन दिवसांपासून सुरू असलल्या मुसळधार पावसामुळे परिसरात शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाऊस विजांच्या कडकडाटासह सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत पडत होता. या पावसाने छाटलेल्या द्राक्षबागा तसेच सुरू असलेल्या टोमॅटो मका वेळीवर्ग भाजीपाला यांचे नुकसान झाले आहे. सगळ्या बागांमध्ये कमरेइतके पाणी साचले असून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने शेतकरी वर्गास द्राक्ष बागांना फवारणी करताना बागेमध्ये ट्रक्टर चालत नाही तसेच मजुरांअभावी नळीने फवारणी करताना बागेत पाणी असल्याने अडचणी येत आहेत. याही अडचणींवर मात करत शेतकरी घरातील सगळेच लहान मोठे माणसांमार्फत नळ्या खांद्यावर घेऊन फवारणी करत आहे. पण फवारणी करून झाल्यानंतर दुपारी लगेच पाऊस पडल्यामुळे शेतकरी प्रचंड हतबल झाला असून पावसाने पूर्ण मेटाकुटीस आला आहे.हवामान खाते रोज नवीन नवीन पावसाचे अंदाज देत आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी घाबरला आहे. द्राक्ष पिकाचे नुकसान हे पाऊस उघडल्यावर सात ते आठ दिवसांनी दिसत आहे. हे नुकसान शासन मान्य करत नाही, कारण डावणी रोगाने नुकसान झालेल्या द्राक्ष बागेचे नुकसान ग्राह्य धरले जात नाही. डावणी हा फक्त पोगा स्टेज ला होणार्या पावसामुळे होते सध्या ६० ते ७० टक्के बागांची पोगा स्टेज आहे. त्यामुळे बरेच नुकसान होणार आहे. या वर्षी अति पावसाने टोमॅटो पिकाचे नुकसान झाले होते. राहिलेल्या टोमॅटोचे मोठे नुकसान झाले असून पूर्ण टोमॅटो या अतिवृष्टी मुले खराब झाली असून एकरी १० ते १२ खोके माल निघतो आहे. तसेच मका सुद्धा सोग्नीला आल्या असून त्याचेही मोठे नुकसान झाले आहे. या सगळ्या अस्मानी संकटे शेतकरी झेलत आहे यातून कधी सुटका होईल याची चिंता लागून राहिली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक