शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
3
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
4
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
5
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
6
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
7
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
8
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
9
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
10
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
11
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
12
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
13
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
14
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
15
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
16
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
17
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
18
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
19
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
20
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खेडगाव परिसरात पावसाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 14:55 IST

खेडगाव : दोन दिवसांपासून सुरू असलल्या मुसळधार पावसामुळे परिसरात शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

खेडगाव : दोन दिवसांपासून सुरू असलल्या मुसळधार पावसामुळे परिसरात शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाऊस विजांच्या कडकडाटासह सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत पडत होता. या पावसाने छाटलेल्या द्राक्षबागा तसेच सुरू असलेल्या टोमॅटो मका वेळीवर्ग भाजीपाला यांचे नुकसान झाले आहे. सगळ्या बागांमध्ये कमरेइतके पाणी साचले असून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने शेतकरी वर्गास द्राक्ष बागांना फवारणी करताना बागेमध्ये ट्रक्टर चालत नाही तसेच मजुरांअभावी नळीने फवारणी करताना बागेत पाणी असल्याने अडचणी येत आहेत. याही अडचणींवर मात करत शेतकरी घरातील सगळेच लहान मोठे माणसांमार्फत नळ्या खांद्यावर घेऊन फवारणी करत आहे. पण फवारणी करून झाल्यानंतर दुपारी लगेच पाऊस पडल्यामुळे शेतकरी प्रचंड हतबल झाला असून पावसाने पूर्ण मेटाकुटीस आला आहे.हवामान खाते रोज नवीन नवीन पावसाचे अंदाज देत आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी घाबरला आहे. द्राक्ष पिकाचे नुकसान हे पाऊस उघडल्यावर सात ते आठ दिवसांनी दिसत आहे. हे नुकसान शासन मान्य करत नाही, कारण डावणी रोगाने नुकसान झालेल्या द्राक्ष बागेचे नुकसान ग्राह्य धरले जात नाही. डावणी हा फक्त पोगा स्टेज ला होणार्या पावसामुळे होते सध्या ६० ते ७० टक्के बागांची पोगा स्टेज आहे. त्यामुळे बरेच नुकसान होणार आहे. या वर्षी अति पावसाने टोमॅटो पिकाचे नुकसान झाले होते. राहिलेल्या टोमॅटोचे मोठे नुकसान झाले असून पूर्ण टोमॅटो या अतिवृष्टी मुले खराब झाली असून एकरी १० ते १२ खोके माल निघतो आहे. तसेच मका सुद्धा सोग्नीला आल्या असून त्याचेही मोठे नुकसान झाले आहे. या सगळ्या अस्मानी संकटे शेतकरी झेलत आहे यातून कधी सुटका होईल याची चिंता लागून राहिली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक