शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

शहरात पावसाची संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:39 IST

नाशिक शहरासह जिल्ह्यात मागील आठवड्याप्रमाणे रविवारी (दि.२७) पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. दिवसभर पावसाची संततधार सुरूच राहिल्याने जनजीवन प्रभावित झाले. सकाळपासून पावसाचा जोर दिवसभर कमी-अधिक होता. पावसाने दिवसभरात अल्पशीदेखील उघडीप घेतली नसल्यामुळे नागरिकांनी रेनकोट-छत्रीचा वापर करत आवश्यक दैनंदिन कामे आटोपली. सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शहरात १८.४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.

नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्यात मागील आठवड्याप्रमाणे रविवारी (दि.२७) पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. दिवसभर पावसाची संततधार सुरूच राहिल्याने जनजीवन प्रभावित झाले. सकाळपासून पावसाचा जोर दिवसभर कमी-अधिक होता. पावसाने दिवसभरात अल्पशीदेखील उघडीप घेतली नसल्यामुळे नागरिकांनी रेनकोट-छत्रीचा वापर करत आवश्यक दैनंदिन कामे आटोपली. सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शहरात १८.४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. रविवार असल्यामुळे शाळा-महाविद्यालयांसह शासकीय तसेच बहुतांश खासगी कार्यालयांना सुटी असल्यामुळे विद्यार्थी व चाकरमान्यांचे हाल झाले नाही; मात्र खासगी शिकवणीसाठी बाहेर पडलेल्या तरुण-तरुणींची पावसामुळे गैरसोय झाली. संततधारेने उपनगरांसह शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांवरही पाणी साचले होते. रस्त्यांना खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.गटारींची अवस्था अद्यापही बिकट असल्यामुळे नाशिकच्या रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसून रस्त्यावर तलाव साचत असल्याचे चित्र आहे. बहुसंख्य रस्त्यांची पावसामुळे दैनावस्था झाली असून, कच पसरली आहे. पुणे महामार्गावर नेहरूनगर, उपनगर, गांधीनगर, आंबेडकरनगर, बोधलेनगर या परिसरात खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. महामार्ग असूनही रस्त्यावरील खड्डे बुजविले जात नसल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच वडाळागाव, अशोका मार्ग, जुने नाशिक, सिडको, इंदिरानगर या भागातदेखील रस्त्यांची दुर्दशा कायम आहे.‘गंगापूर’मधून दीड हजार क्यूसेक विसर्गशहरासह ग्रामीण भागातही पावसाचा जोर वाढल्यामुळे गंगापूर धरणातूनदेखील विसर्ग वाढविण्यात आला आहे. शनिवारी दिवसभर साडेपाचशे क्यूसेकने विसर्ग सुरू होता. पहाटेनंतर अडीचशे क्यूसेकने वाढ होऊन दुपारी बारा वाजेपर्यंत ७८६ क्यूसेक विसर्ग सुरू होता; मात्र पावसाचा जोर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढल्यामुळे विसर्ग आठशे क्यूसेकने वाढविण्यात आला. दुपारी १ वाजेपासून दीड हजार क्यूसेक पाणी नदीपात्रात धरणातून प्रवाहित करण्यात आले. धरणातून जरी दीड हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत असलातरी शहरात होणाºया पावसामुळे रस्त्यांवरून वाहून जाणारे व नाल्यामधील पाण्यामुळे गोदावरीच्या पातळीत रामकुंडापासून पुढे अधिक वाढ झाली आहे. अहल्यादेवी होळकर पुलाखालून सुमारे दोन ते अडीच हजार क्यूसेक पाणी पुढे रामकुंडात प्रवाहित होते.