शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
2
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
3
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
4
French Open 2025: नोवाक जोकोविचचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं, सेमीफायनलमध्ये दारूण पराभव!
5
FD rates: 'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका
6
पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य
7
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
8
बॉलिवूड, साऊथ अन् मराठी कलाकार! रणबीरच्या 'रामायण'ची संपूर्ण स्टारकास्ट, आदिनाथ कोठारेही दिसणार
9
Tarot Card: दुःखावर सुखाची फुंकर घालणारा आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
KL राहुल 'नॅशनल ड्युटी स्टार्ट विथ ब्युटीफुल सेंच्युरी'! १८ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची दिली 'गॅरेंटी'
11
"...आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार"; राहुल गांधींना भाजपाचं प्रत्युत्तर
12
मेडिकल सायन्सचा चमत्कार! नव्या IVF टेक्निकने पालक ठरवणार मुलाच्या डोळ्यांचा, त्वचेचा रंग
13
Astro Tip: सकाळी झोपून उठल्यावर म्हणा 'हा' पॉवरफुल मंत्र; २१ दिवसात मार्गी लागेल काम!
14
जर असं घडलं तर विराट कोहली पुन्हा कसोटी खेळण्यास तयार होईल! या दिग्गजानं केला मोठा दावा
15
विकासाचे वारे! नक्षलवादी भागात गुरुकुल सुरू, जवानांनी घेतली १०० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी
16
२१ व्यांदा डिविडेंड देणार Tata ची 'ही' कंपनी; एका शेअरवर ७५ रुपयांचा फायदा, रेकॉर्ड डेट कधी?
17
“STचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार”; प्रताप सरनाईकांची माहिती
18
लक्ष्मी भद्र पंचमहापुरुष राजयोग: प्रदोष दिनी २ ग्रहांचे शुभ गोचर, ८ राशींना धनलाभ; उत्तम काळ
19
२ राजयोगात रवि प्रदोष: सूर्यासारखे तेज मिळेल, भाग्य उजळेल; ‘असे’ करा व्रत, शिव होतील प्रसन्न
20
Tejashwi Yadav : तेजस्वी यादव अपघातातून थोडक्यात बचावले; ताफ्यात घुसला ट्रक, ३ सुरक्षा कर्मचारी जखमी

पावसाने झोडपले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 00:38 IST

नाशिक : गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. बुधवारी (दि.११) नाशिककरांना पावसाने चांगलेच झोडपले. दुपारी शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्ये पावसाला जोरदार सुरुवात झाली. शहरात मंगळवारी पावसाचा जोर कमी होता; मात्र बुधवारी सकाळपासून शहरात ढगाळ हवामान कायम असल्याने दुपारी तीन वाजेपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली. सुमारे दीड तास चाललेल्या पावसाने नाशिककरांची दैना उडविली. शहरासह उपनगरांमध्येही पावसाचे थैमान सुरू होते. सर्व परिसर जलमय झाला होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते.

नाशिक : गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. बुधवारी (दि.११) नाशिककरांना पावसाने चांगलेच झोडपले. दुपारी शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्ये पावसाला जोरदार सुरुवात झाली.शहरात मंगळवारी पावसाचा जोर कमी होता; मात्र बुधवारी सकाळपासून शहरात ढगाळ हवामान कायम असल्याने दुपारी तीन वाजेपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली. सुमारे दीड तास चाललेल्या पावसाने नाशिककरांची दैना उडविली. शहरासह उपनगरांमध्येही पावसाचे थैमान सुरू होते. सर्व परिसर जलमय झाला होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते.दरम्यान, गंगापूर धरणातून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाच हजार क्यूसेकचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला. दुपारी एक वाजेनंतर हा विसर्ग कमी करण्यात आला असला तरी गोदावरीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण शहरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. गोदावरीवरील अहल्यादेवी होळकर पुलाखालून पुढे नदीपात्रात ६ हजार ५६० क्यूसेक पाण्याचा प्रवाह सुरू होता. गंगापूर धरणातून मंगळवारी रात्री बारा वाजता विसर्ग वाढविण्यात आला होता.बुधवारी दुपारपर्यंत ५११६ क्यूसेक विसर्ग सुरू होता. गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने विसर्ग दुपारी एक वाजता ४५४५ क्यूसेक तर चार वाजता २८७४ क्यूसेकवर आणला गेला; मात्र शहरात चार वाजेपासून पावसाला पुन्हा जोरदार सुरुवात झाल्याने गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढली होती. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊसबुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत त्र्यंबकला १२, गंगापूरला ११ तर कश्यपी ३८, गौतमी-गोदावरीच्या परिसरात ६९, अंबोली परिसरात ७४ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. एकूणच गंगापूर धरण समूहातील गौतमी, कश्यपी, अंबोली या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणात बुधवारी दुपारपर्यंत पाण्याची मोठी आवक सुरू होती. त्यामुळे मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेला ५००० क्युसेकचा विसर्ग बुधवारी दुपारपर्यंत कायम होता. मात्र, दुपारनंतर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने विसर्गामध्येही कपात झाली.