शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने झोडपले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 00:38 IST

नाशिक : गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. बुधवारी (दि.११) नाशिककरांना पावसाने चांगलेच झोडपले. दुपारी शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्ये पावसाला जोरदार सुरुवात झाली. शहरात मंगळवारी पावसाचा जोर कमी होता; मात्र बुधवारी सकाळपासून शहरात ढगाळ हवामान कायम असल्याने दुपारी तीन वाजेपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली. सुमारे दीड तास चाललेल्या पावसाने नाशिककरांची दैना उडविली. शहरासह उपनगरांमध्येही पावसाचे थैमान सुरू होते. सर्व परिसर जलमय झाला होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते.

नाशिक : गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. बुधवारी (दि.११) नाशिककरांना पावसाने चांगलेच झोडपले. दुपारी शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्ये पावसाला जोरदार सुरुवात झाली.शहरात मंगळवारी पावसाचा जोर कमी होता; मात्र बुधवारी सकाळपासून शहरात ढगाळ हवामान कायम असल्याने दुपारी तीन वाजेपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली. सुमारे दीड तास चाललेल्या पावसाने नाशिककरांची दैना उडविली. शहरासह उपनगरांमध्येही पावसाचे थैमान सुरू होते. सर्व परिसर जलमय झाला होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते.दरम्यान, गंगापूर धरणातून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाच हजार क्यूसेकचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला. दुपारी एक वाजेनंतर हा विसर्ग कमी करण्यात आला असला तरी गोदावरीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण शहरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. गोदावरीवरील अहल्यादेवी होळकर पुलाखालून पुढे नदीपात्रात ६ हजार ५६० क्यूसेक पाण्याचा प्रवाह सुरू होता. गंगापूर धरणातून मंगळवारी रात्री बारा वाजता विसर्ग वाढविण्यात आला होता.बुधवारी दुपारपर्यंत ५११६ क्यूसेक विसर्ग सुरू होता. गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने विसर्ग दुपारी एक वाजता ४५४५ क्यूसेक तर चार वाजता २८७४ क्यूसेकवर आणला गेला; मात्र शहरात चार वाजेपासून पावसाला पुन्हा जोरदार सुरुवात झाल्याने गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढली होती. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊसबुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत त्र्यंबकला १२, गंगापूरला ११ तर कश्यपी ३८, गौतमी-गोदावरीच्या परिसरात ६९, अंबोली परिसरात ७४ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. एकूणच गंगापूर धरण समूहातील गौतमी, कश्यपी, अंबोली या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणात बुधवारी दुपारपर्यंत पाण्याची मोठी आवक सुरू होती. त्यामुळे मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेला ५००० क्युसेकचा विसर्ग बुधवारी दुपारपर्यंत कायम होता. मात्र, दुपारनंतर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने विसर्गामध्येही कपात झाली.