शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

मोठ्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पाऊस परतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:21 IST

मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने पाण्याअभावी करपू लागलेल्या पिकांना काहीसे जीवदान मिळाले असून, बळीराजाच्या चेहºयावर समाधान दिसू लागले आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारी दिवसभर सुरू होता. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबक या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. निफाड, येवला, सटाणा, दिंडोरी, पेठ या तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. पिके ऐन बहरात आल्यानंतर पावसाने ओढ दिल्याने हाती आलेले पीक जाते की काय याची चिंता शेतकºयांच्या चेहºयावर दिसत होती.

नाशिक : मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने पाण्याअभावी करपू लागलेल्या पिकांना काहीसे जीवदान मिळाले असून, बळीराजाच्या चेहºयावर समाधान दिसू लागले आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारी दिवसभर सुरू होता. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबक या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. निफाड, येवला, सटाणा, दिंडोरी, पेठ या तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. पिके ऐन बहरात आल्यानंतर पावसाने ओढ दिल्याने हाती आलेले पीक जाते की काय याची चिंता शेतकºयांच्या चेहºयावर दिसत होती. पावसाने हजेरी लावल्याने पोळ्याचा आनंद द्विगुणित झाला आहे.येवल्यात पावसाची दमदार हजेरीयेवला : गेल्या कित्येक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने तालुक्यामध्ये दमदार हजेरी लावली. पोळा या सणाच्या पूर्वसंध्येलाच तालुक्यात सर्वत्र कमीजास्त प्रमाणात पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. उभ्या पिकांना असलेली गरज पुर्ण झाली असली तरी विहिरींना पाणी येण्यासाठी मोठ्या आणि दमदार पावसाची अपेक्षा शेतकºयांना  आहे. येवला शहरामध्ये सोशल मीडियावर शहरातील रस्त्यातील खड्डे ओव्हरफ्लो अशा पोस्ट फिरवून शहरातील रस्त्याच्या दुरवस्थेवर ताशेरे ओढले जात होते. रविवारी पहाटेपासून कमीजास्त प्रमाणात येणारा पाऊस सकाळी ७ नंतर हळूहळू जोर पकडू लागला तर दुपारी पावसाने चांगलाच जोर धरला होता. येवला तालुक्यामध्ये आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या १९ दिवसात केवळ २० मिमी पाऊस पडला असल्याने शेतकरी चिंतेत होता. रविवारी झालेल्या पावसाची आकडेवारी आली नसली तरी निश्चितच आॅगस्टची सरासरी ओलांडली जाईल असे चित्र दिसत आहे.डांगसौंदाणे : डांगसौंदाणेसह परिसरात दमदार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. पाण्याअभावी करपू लागलेल्या पिकांना या पावसामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा पावसामुळे आनंदित झाला आहे. परिसरात रिमझिम पावसाने शनिवारी रात्री व रविवारी हजेरी लावली आहे. मुसळधार जरी नसला तरी या पावसाने सर्वच पिकांना जीवदान मिळाले आहे. परिसरात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. बळीराजाला पावसाने चांगलीच हुलकावणी दिल्याने पेरणी झालेल्या क्षेत्रातील पिके पावसाअभावी करपू लागली होती. त्यामुळे बळीराजाच्या चेहºयावर चिंतेचे ढग स्पष्ट दिसू लागले होते. पावसाने लावलेल्या हजेरीमुळे शेतकºयांना दिलासा मिळाला  आहे. जेमतेम पावसावर पेरणी झालेली पिके उन्हाच्या तडाख्याने कोमेजू लागली होती. पावसामुळे जनावरांच्या चाºयाची चिंता थोड्या फार प्रमाणात का होईना कमी होणार आहे. बागलाणच्या पश्चिमपट्ट्यातील बहुतांशी आदिवासी बांधवांचे मुख्य पीक हे भात व नागली असून, लागवडीनंतर दमदार पावसाच्या हजेरीशिवाय ही पिकेही आता कोमेजू लागल्यामुळे आदिवासी बांधवांच्या चेहºयावर चिंता दिसू लागली होती. पावसाने सगळीकडेच हजेरी लावल्याने या भागातील भात, नागली, बाजरी, मका या पिकांना जीवदान मिळाले आहे. आठ ते दहा दिवस असाच पाऊस सुरू राहिल्यास परिसरातील पाण्याची समस्या दूर होईल व विहिरीच्या पाणी पातळीतही वाढ होण्याची आशा बळीराजाने व्यक्त केली आहे.पेठमध्ये रिमझिमपेठ : राज्यभर पावसाचे पुनरागमन झाले असताना पेठ तालुक्यात मात्र गत १२ तासांपासून रिमझिम सुरू आहे. सर्वत्र ढगांनी आकाश झाकोळले असून गोळशी फाट्यापासून सावळघाटपर्यंत रस्ते धुक्यात हरवले आहेत.