शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
2
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
3
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
4
Rishabh Pant Captain : पंत टीम इंडियाचा कॅप्टन! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ऋतुराजलाही संधी
5
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
6
वीरेंद्र सेहवागच्या 'फॅमिली फोटो'तून पत्नी आरती गायब; नात्यात दुराव्याच्या चर्चांना खतपाणी
7
टोयोटाची 'बेबी लँड क्रूझर'! जिम्नी नाही बरं का...! डिझाइन, रग्ड फीचर्स आणि ऑफ-रोडिंग क्षमता आली समोर
8
हा खेळाडू मला संघात नकोय...! सूर्यकुमार - गंभीर यांच्यात आशिया कपआधी कुणावरून झालेला वाद?
9
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
10
IND vs AUS : दिवाळीच्या शुभेच्छा! विमानतळावर विराट-रोहितची चाहत्यांसोबत सेल्फी अन् बरंच काही (VIDEO)
11
सासरा-सूनेच्या अफेअरला सासूची मदत; माजी पोलीस महासंचालकाने केली मुलाची हत्या, पंजाब हादरले!
12
Top Test Wicket Taker List In 2025 : ...अन् टेस्टमध्ये DSP सिराजपेक्षा बेस्ट ठरला झिम्बाब्वेचा गडी!
13
हळद लागली! ऐन दिवाळीत नोरा फतेहीची लगीनघाई? कोरियन अभिनेत्यासोबत हळदीचे फोटो झाले व्हायरल
14
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
15
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली कियारा अडवाणी, दिवाळीनिमित्त शेअर केला क्युट व्हिडीओ
16
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
17
Ashwin Amavasya 2025: दिवाळीच्या आनंदात ठेवा पितरांचे स्मरण; त्यांचे नावे पणती लावून करा दीप प्रज्वलन!
18
Shaheen Afridi Pakistan New ODI Captain : रिझवानची 'उचलबांगडी'; आफ्रिदीच्या डोईवर 'कॅप्टन्सीचा ताज'
19
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
20
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी

मोठ्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पाऊस परतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:21 IST

मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने पाण्याअभावी करपू लागलेल्या पिकांना काहीसे जीवदान मिळाले असून, बळीराजाच्या चेहºयावर समाधान दिसू लागले आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारी दिवसभर सुरू होता. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबक या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. निफाड, येवला, सटाणा, दिंडोरी, पेठ या तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. पिके ऐन बहरात आल्यानंतर पावसाने ओढ दिल्याने हाती आलेले पीक जाते की काय याची चिंता शेतकºयांच्या चेहºयावर दिसत होती.

नाशिक : मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने पाण्याअभावी करपू लागलेल्या पिकांना काहीसे जीवदान मिळाले असून, बळीराजाच्या चेहºयावर समाधान दिसू लागले आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारी दिवसभर सुरू होता. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबक या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. निफाड, येवला, सटाणा, दिंडोरी, पेठ या तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. पिके ऐन बहरात आल्यानंतर पावसाने ओढ दिल्याने हाती आलेले पीक जाते की काय याची चिंता शेतकºयांच्या चेहºयावर दिसत होती. पावसाने हजेरी लावल्याने पोळ्याचा आनंद द्विगुणित झाला आहे.येवल्यात पावसाची दमदार हजेरीयेवला : गेल्या कित्येक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने तालुक्यामध्ये दमदार हजेरी लावली. पोळा या सणाच्या पूर्वसंध्येलाच तालुक्यात सर्वत्र कमीजास्त प्रमाणात पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. उभ्या पिकांना असलेली गरज पुर्ण झाली असली तरी विहिरींना पाणी येण्यासाठी मोठ्या आणि दमदार पावसाची अपेक्षा शेतकºयांना  आहे. येवला शहरामध्ये सोशल मीडियावर शहरातील रस्त्यातील खड्डे ओव्हरफ्लो अशा पोस्ट फिरवून शहरातील रस्त्याच्या दुरवस्थेवर ताशेरे ओढले जात होते. रविवारी पहाटेपासून कमीजास्त प्रमाणात येणारा पाऊस सकाळी ७ नंतर हळूहळू जोर पकडू लागला तर दुपारी पावसाने चांगलाच जोर धरला होता. येवला तालुक्यामध्ये आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या १९ दिवसात केवळ २० मिमी पाऊस पडला असल्याने शेतकरी चिंतेत होता. रविवारी झालेल्या पावसाची आकडेवारी आली नसली तरी निश्चितच आॅगस्टची सरासरी ओलांडली जाईल असे चित्र दिसत आहे.डांगसौंदाणे : डांगसौंदाणेसह परिसरात दमदार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. पाण्याअभावी करपू लागलेल्या पिकांना या पावसामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा पावसामुळे आनंदित झाला आहे. परिसरात रिमझिम पावसाने शनिवारी रात्री व रविवारी हजेरी लावली आहे. मुसळधार जरी नसला तरी या पावसाने सर्वच पिकांना जीवदान मिळाले आहे. परिसरात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. बळीराजाला पावसाने चांगलीच हुलकावणी दिल्याने पेरणी झालेल्या क्षेत्रातील पिके पावसाअभावी करपू लागली होती. त्यामुळे बळीराजाच्या चेहºयावर चिंतेचे ढग स्पष्ट दिसू लागले होते. पावसाने लावलेल्या हजेरीमुळे शेतकºयांना दिलासा मिळाला  आहे. जेमतेम पावसावर पेरणी झालेली पिके उन्हाच्या तडाख्याने कोमेजू लागली होती. पावसामुळे जनावरांच्या चाºयाची चिंता थोड्या फार प्रमाणात का होईना कमी होणार आहे. बागलाणच्या पश्चिमपट्ट्यातील बहुतांशी आदिवासी बांधवांचे मुख्य पीक हे भात व नागली असून, लागवडीनंतर दमदार पावसाच्या हजेरीशिवाय ही पिकेही आता कोमेजू लागल्यामुळे आदिवासी बांधवांच्या चेहºयावर चिंता दिसू लागली होती. पावसाने सगळीकडेच हजेरी लावल्याने या भागातील भात, नागली, बाजरी, मका या पिकांना जीवदान मिळाले आहे. आठ ते दहा दिवस असाच पाऊस सुरू राहिल्यास परिसरातील पाण्याची समस्या दूर होईल व विहिरीच्या पाणी पातळीतही वाढ होण्याची आशा बळीराजाने व्यक्त केली आहे.पेठमध्ये रिमझिमपेठ : राज्यभर पावसाचे पुनरागमन झाले असताना पेठ तालुक्यात मात्र गत १२ तासांपासून रिमझिम सुरू आहे. सर्वत्र ढगांनी आकाश झाकोळले असून गोळशी फाट्यापासून सावळघाटपर्यंत रस्ते धुक्यात हरवले आहेत.