शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची विश्रांती; धरणातून विसर्ग रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:42 IST

नाशिक : शनिवारपासून संततधार लावलेल्या पावसाने बुधवारी दिवसभर पूर्ण विश्रांती घेतल्याने सूर्यदर्शन होण्याबरोबरच जनजीवन पूर्वपदावर आले असून, धरणक्षेत्रातही पाऊस थांबल्यामुळे गंगापूर, दारणासह अन्य धरणांतून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने दिवसभरात कमी करण्यात आला व रात्री उशिरा पूर्ण विसर्ग रोखण्यात आल्याने नद्यांचा पूर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी गोदावरीत पोहण्यासाठी उडी घेतलेला तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात असून, पेठ तालुक्यातील भुवन घाटात दरड कोसळून काही काळ वाहतूक विस्कळीत झाल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देजनजीवन पूर्वपदावर : पाच दिवसांनी सूर्यदर्शन

नाशिक : शनिवारपासून संततधार लावलेल्या पावसाने बुधवारी दिवसभर पूर्ण विश्रांती घेतल्याने सूर्यदर्शन होण्याबरोबरच जनजीवन पूर्वपदावर आले असून, धरणक्षेत्रातही पाऊस थांबल्यामुळे गंगापूर, दारणासह अन्य धरणांतून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने दिवसभरात कमी करण्यात आला व रात्री उशिरा पूर्ण विसर्ग रोखण्यात आल्याने नद्यांचा पूर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी गोदावरीत पोहण्यासाठी उडी घेतलेला तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात असून, पेठ तालुक्यातील भुवन घाटात दरड कोसळून काही काळ वाहतूक विस्कळीत झाल्याची घटना घडली आहे.नाशिक जिल्ह्णात गेल्या पाच दिवसांपासून पावसाने मुक्काम ठोकल्यामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले असून, धरणांच्या साठ्यातही कमालीची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे नाशिकसह पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यात विक्रमी पाऊस नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्णातील धरणांमध्ये ४२ टक्के जलसाठा झाला असून, नाशिकला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर, दारणा धरणातही ७९ टक्के साठा झाल्याने सोमवारपासून धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. गेल्या दोन दिवसात हजारो क्युसेक पाणी गोदावरी व दारणा नदीतून नांदूरमध्यमेश्वरमार्गे जायकवाडीकडे सोडण्यात आले. मंगळवारी रात्रीपासून पावसाने उघडीप दिली, त्याचबरोबर धरणक्षेत्रातही पावसाने विश्रांती घेतल्यामुळे बुधवारी मध्यरात्रीपासून गंगापूर धरणातील विसर्ग ९३०२ वरून २४९६ क्युसेक करण्यात आला, तर दारणाचाही साठा १०६०० वरून ११०० क्युसेक करण्यात आल्यामुळे पुराचे पाणी ओसरण्यास मदत झाली आहे. बुधवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेत अधूनमधून सूर्यदर्शन दिल्याने गेल्या पाच दिवसांपासून पावसामुळे वैतागलेल्या नाशिककरांना मोठा दिलासा मिळून जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली.बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्णात ३७६ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, सर्वाधिक पावसाची नोंद पेठ तालुक्यात ९८ व त्या खालोखाल इगतपुरी ८८ व सुरगाणा तालुक्यात ७१ मिलीमीटर अशी झाली आहे. त्र्यंबकेश्वर येथे ४९ मिलीमीटर व नाशिकला २८ मिलीमीटर नोंद करण्यात आली. जिल्ह्णातील अन्य तालुक्यांत मात्र पावसाची वक्रदृष्टी कायम आहे.