शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

पावसाची विश्रांती; धरणातून विसर्ग रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:42 IST

नाशिक : शनिवारपासून संततधार लावलेल्या पावसाने बुधवारी दिवसभर पूर्ण विश्रांती घेतल्याने सूर्यदर्शन होण्याबरोबरच जनजीवन पूर्वपदावर आले असून, धरणक्षेत्रातही पाऊस थांबल्यामुळे गंगापूर, दारणासह अन्य धरणांतून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने दिवसभरात कमी करण्यात आला व रात्री उशिरा पूर्ण विसर्ग रोखण्यात आल्याने नद्यांचा पूर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी गोदावरीत पोहण्यासाठी उडी घेतलेला तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात असून, पेठ तालुक्यातील भुवन घाटात दरड कोसळून काही काळ वाहतूक विस्कळीत झाल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देजनजीवन पूर्वपदावर : पाच दिवसांनी सूर्यदर्शन

नाशिक : शनिवारपासून संततधार लावलेल्या पावसाने बुधवारी दिवसभर पूर्ण विश्रांती घेतल्याने सूर्यदर्शन होण्याबरोबरच जनजीवन पूर्वपदावर आले असून, धरणक्षेत्रातही पाऊस थांबल्यामुळे गंगापूर, दारणासह अन्य धरणांतून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने दिवसभरात कमी करण्यात आला व रात्री उशिरा पूर्ण विसर्ग रोखण्यात आल्याने नद्यांचा पूर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी गोदावरीत पोहण्यासाठी उडी घेतलेला तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात असून, पेठ तालुक्यातील भुवन घाटात दरड कोसळून काही काळ वाहतूक विस्कळीत झाल्याची घटना घडली आहे.नाशिक जिल्ह्णात गेल्या पाच दिवसांपासून पावसाने मुक्काम ठोकल्यामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले असून, धरणांच्या साठ्यातही कमालीची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे नाशिकसह पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यात विक्रमी पाऊस नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्णातील धरणांमध्ये ४२ टक्के जलसाठा झाला असून, नाशिकला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर, दारणा धरणातही ७९ टक्के साठा झाल्याने सोमवारपासून धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. गेल्या दोन दिवसात हजारो क्युसेक पाणी गोदावरी व दारणा नदीतून नांदूरमध्यमेश्वरमार्गे जायकवाडीकडे सोडण्यात आले. मंगळवारी रात्रीपासून पावसाने उघडीप दिली, त्याचबरोबर धरणक्षेत्रातही पावसाने विश्रांती घेतल्यामुळे बुधवारी मध्यरात्रीपासून गंगापूर धरणातील विसर्ग ९३०२ वरून २४९६ क्युसेक करण्यात आला, तर दारणाचाही साठा १०६०० वरून ११०० क्युसेक करण्यात आल्यामुळे पुराचे पाणी ओसरण्यास मदत झाली आहे. बुधवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेत अधूनमधून सूर्यदर्शन दिल्याने गेल्या पाच दिवसांपासून पावसामुळे वैतागलेल्या नाशिककरांना मोठा दिलासा मिळून जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली.बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्णात ३७६ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, सर्वाधिक पावसाची नोंद पेठ तालुक्यात ९८ व त्या खालोखाल इगतपुरी ८८ व सुरगाणा तालुक्यात ७१ मिलीमीटर अशी झाली आहे. त्र्यंबकेश्वर येथे ४९ मिलीमीटर व नाशिकला २८ मिलीमीटर नोंद करण्यात आली. जिल्ह्णातील अन्य तालुक्यांत मात्र पावसाची वक्रदृष्टी कायम आहे.