शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

पूर्व भागात पावसाने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 16:23 IST

नाशिक : मंगळवारी पावसाने पूर्व भागातील तालुक्यांमध्ये जोरदार हजेरी लावल्याने शेतकरीवर्गात समाधान व्यक्त केले जात असून, कापणीला आलेल्या पिकांना या पाण्यामुळे मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यात १०६ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. येत्या ४८ तासांत अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.गेल्या दोन दिवसांपासून हवामानात ...

नाशिक : मंगळवारी पावसाने पूर्व भागातील तालुक्यांमध्ये जोरदार हजेरी लावल्याने शेतकरीवर्गात समाधान व्यक्त केले जात असून, कापणीला आलेल्या पिकांना या पाण्यामुळे मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यात १०६ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. येत्या ४८ तासांत अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.गेल्या दोन दिवसांपासून हवामानात प्रचंड बदल झाला असून, हवेतील उकाडा वाढला आहे. आकाशात ढगांनी गर्दी केल्याने अधून मधून पावसाची हजेरी लागत आहे. सोमवारी रात्री व मंगळवारी रात्री सलग दोन दिवस विजेच्या कडकडाटात जोरदार पाऊस कोसळल्याने त्याचा शेतकºयांना फायदा झाला आहे. मका, बाजरी, सोयाबीन, भुईमूग या पिकांना हा पाऊस उपयोगी असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. मंगळवारी रात्री जिल्ह्यातील पूर्व भागातील मालेगाव, चांदवड, नांदगाव, देवळा, कळवण, बागलाण, सिन्नर, येवला या तालुक्यात जोरदार पाऊस झाला. उलट पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाºया पश्चिम भागात पावसाने पाठ फिरविली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सरासरीनुसार गेल्या दहा दिवसांत २२ टक्के पाऊस झाला असून, वार्षिक सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात १०६ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यापर्यंत ९० टक्के पाऊस झाला होता. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत पावसाने शंभरी ओलांडली असून, मालेगाव, चांदवड, कळवण, बागलाण, देवळा, सिन्नर, येवला या तालुक्यांमध्ये मात्र अद्याप शंभरी गाठायची आहे.