त्र्यंबकेश्वर : पावसाच्या सातत्याने आज पाचवा दिवशी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. पावसाच्या सरीवर सरी कोसळत असून, छत्री असूनही पावसाचा चारही बाजूने मारा होत असल्याने भिजावे लागते. काल दिवसभरात रात्रीसह एकूण पर्जन्यवृष्टी १२५ मि.मी. झाली, तर आतापर्यंत ६८३ मि.मी. नोंद झाली आहे.दरम्यान, मागील वर्षी याच तारखेपर्यंत एकूण १२२६ मि.मी. पाऊस झाला होता. त्यामानाने पावसाची एकूण सरासरी त्यामानाने कमीच आहे.त्र्यंबकला आज पहिल्यांदाच पूर पाहावयास मिळाला. तेली गल्ली, मेनरोड भागात पुराचे पाणी घरात शिरले. स्लॅब असूनही पात्र पूर्णपणे भरून स्लॅबच्या बाहेर पाणी रस्त्यावर शिरले.अरविंद जोश्ी यांच्या घरापासून अन्य मार्गावरील सर्वच भागात पाणी शिरले. घरात गुडघ्यापेक्षा जास्त पाणी आले.रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पालिकेसमोर वाहनेही जाऊ शकत नव्हते. तर स्मशानभूमी रस्त्यावर सांडपाणी शुद्धीकरण केंद्राजवळील रस्त्यावर जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले.दरम्यान, अंजनेरी येथे सुनिता हिरामण चव्हाण (१७) ही मुलगी पुरात वाहून गेली. तसेच अनेक घरांची पडझड व नुकसान झाल्याचे कळते.दुपारी ४ ते ५ वाजेपासून पाऊस थांबलेला होता. बेझे धरण ६७३.८0 इतके भरले आहे. कारण क्षमता १८७९ द.ल.घ.फू. असून, आतापर्यंत ४८0 द.ल.घ.फू. इतके भरले आहे. साधारणत: २५ ते ३0 टक्के पाणी धरणात जमा झाले आहे. येथील अन्नपूर्णा आश्रमातील सुरू असलेल्या बांधकामाची माती मुरूम येथील प्रगतशील शेतकरी वाळूजी ढोन्नर यांच्या भात शेतीत भरल्याने आवणे पूर्णपणे भरली आहेत.शहराबरोबरच तालुक्यात देखील पावसाचे प्रमाण जास्त होते गावात गढईच्या खालच्या बाजूस असलेल्या सुरेश वाडेकर यांच्या घरात पाणी घुसून नुकसान झाल्याचे कळाले.(वार्ताहर)
त्र्यंबकला पाचव्या दिवशीही पाऊस
By admin | Updated: August 1, 2014 01:06 IST