शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी

By admin | Updated: September 9, 2015 23:20 IST

जनजीवन विस्कळीत : शेतकऱ्यांना दिलासा, खरीप पिकाला जीवदान

नाशिक : जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून, दोन दिवसांपासून अनेक गावात परतीच्या पावसाने हजेरी लावली. सुमारे दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर कॅम्पसह मालेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. बुधवारी शहरात तुरळक पाऊस पडला असला तरी तालुक्यातील दाभाडी, चंदनपुरी, येसगाव, मथुरपाडे परिसरात जोरदार पाऊस पडल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी परिसरातील विविध पर्जन्यमापकात मालेगावी २८ मीमी, करंजगव्हाणला ३, झोडग्याला १३, दाभाडीत ४, सायने २, कळवाडी ४ तर निमगावी ७ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी सकाळपासून आकाशात पावसाचे ढग गोळा झाल्याने दिवसभरात क्वचितच सूर्याचे दर्शन झाले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्दोन दिवसापासून पाऊस पडत असल्याने चिंतेचे वातावरण कमी होण्यास मदत झाली आहे. आगामी काळात असाच पाऊस पडल्यास पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. अभोण्यात पाऊस : शेतकऱ्यांसह सर्वांच्याच तोंडचे पाणी पळविणाऱ्या पावसाने बुधवारी परिसरात हजेरी लावली. काही दिवसांपासून पावसाचे वातावरण तयार होत होते, परंतु पावसाने हजेरी लावली नाही. बुधवारी सकाळपासूनच वातावरणात उष्णता होती. मोठ्या विश्रातीनंतर पावसाचे आगमन झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

त्र्यंबकेश्वर : शहरात सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. पावसाचे वातावरण तयार झाले, मात्र जोरदार पाऊस झालाच नाही. मागील वर्षी ९ सप्टेंबरपर्यंत १७७८ मिमी पाऊस झाला होता. यावर्षी ९ सप्टेंबरपर्यंत केवळ ८४३ मिमी पाऊस पडला आहे. घोटी : अनेक महिनांपासून पावसाच्या माहेरघरातूनही बेपत्ता झालेल्या पावसाने बुधवारी जोरदार पुनरागमन केले. दुपारच्या सुमारास तालुक्यातील पूर्व भागासह महामार्गालगतच्या गावांना पावसाने झोडपून काढले. दरम्यान, या पावसामुळे तालुक्यातील खरीप पिकांना संजीवनी मिळाली असल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यातही पावसाने महिनाभरापासून पाठ फिरविली होती. पावसाळ्याचा ऋतु असतानाही महिनाभरापासून रखरखित उष्मा जाणवत होता. उन्हाळ्याची अनुभूती येत होती. याचा परिणाम भात, नागली, वरई आदि पिकांवर झाला होता. ही पिके पाण्याअभावी संकटात आली होती. दरम्यान, तालुक्यातील धरणसाठ्यात वाढ होऊनही पाण्याचा विसर्ग होत राहिल्याने धरणानी तळ गाठला होता.पावसाने दगा दिल्यामुळे खरीप पिके संकटात आलेली असताना बुधवारी दुपारपासून मेघगर्जनेसह तालुक्यातील अनेक भागात पाऊस झाल्याने तालुक्यातील पिकांना जीवदान मिळाले आहे. शेतकरी सुखावला आहे. दरम्यान, बुधवारी झालेल्या पावसाने घोटी व इगतपुरी शहरातील सखल भागात पाणी साचले, तर जनजीवनही विस्कळीत झाले. (लोकमत चमू)पावसासाठी सिन्नरला रुद्राभिषेक व होमहवन

सिन्नर : येथील गणेश पेठेतील सिद्धेश्वर मंदिरात आर्य-चाणक्य युवा फाउण्डेशनच्या वतीने पावसासाठी रुद्राभिषेक व होमहवन करण्यात आले. संपूर्ण भारतात वरुणराजाने भरपूर बरसावे, असे साकडे यावेळी घालण्यात आले. पावसाच्या पाण्यावरच मोठ्या प्रमाणात शेती अवलंबून असून, त्याच्या भरवशावरच अनेक पिके घेतली जातात. मात्र, यंदा पावसानेच पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांना नैराश्य आल्याचे चित्र आहे. वेळेवर आणि भरपूर पर्जन्यवृष्टी व्हावी, यासाठी वरुणराजाला साकडे घालून यज्ञ करण्याचे वेदशास्त्रात सुचवण्यात आले आहे. त्यानुसार आर्य-चाणक्य युवा फाउण्डेशनच्या सोनल लहामगे, उमेश काकड, सौरभ ठाणेकर, विशाल चव्हाण, महेश निकम, विकी शेळके, संतोष शिंदे, तुषार गाडेकर यांनी पुरोहित दुर्गेश मालपाठक यांच्या मार्गदर्शनाखाली पावसासाठी रुद्राभिषेक व होमहवन केले. त्यानंतर सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे आर्य-चाणक्य युवा फाउण्डेशनच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. निसर्गाचा समतोल बिघडत असल्याने पावसाचे प्रमाण घटले आहे. या समस्येवर मात करण्यासाठी प्रत्येकाने किमान एकतरी झाड लावावे व त्याचे संगोपन करावे असे आवाहन फाउण्डेशनच्या वतीने करण्यात आले.