शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
2
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
3
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
4
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
5
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
6
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
7
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
8
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
9
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
10
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
11
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
12
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
13
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
14
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
15
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
16
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
17
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
18
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
19
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
20
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 

साठविलेल्या कांद्याचे पावसामुळे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:11 IST

मागील वर्षापासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा ...

मागील वर्षापासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा झाल्याने आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. यावर्षी अवकाळी पावसाने खरीप-रब्बी हंगामातील कांदा रोपे खराब झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध होईल, तेथून मिळेल त्या भावात कांदा बियाणे आणून कांदा लागवड केली. मात्र, या बियाणांतही शेतकऱ्यांची फसवणूक झाली. लागवड केलेल्या कांद्याला डोंगळे निघाले. तसेच वातावरणातील सततच्या बदलामुळे व महिन्यातून दोन ते तीन वेळेस पडत असलेल्या बेमोसमी पावसाने कांदा पिकावर मावा, करपा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्नात निम्म्याने घट आली. असे असले तरी तयार झालेला कांदा बाजार समित्या बंद असल्यामुळे विक्री करता न आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे कांदा साठविण्यासाठी पर्यायी व्यवस्था नव्हती, त्यांनी कांदा शेतातील झाडांच्या सावलीत पोळ लावून झाकून ठेवला. मागील महिन्यात झालेल्या वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली तसेच होत असलेला अवकाळी पाऊस यामुळे कांदा सडून खराब झाला आहे. अनेक शेतकऱ्यांचा कांदा खराब झाला असल्यामुळे अनेकांनी कांदा उकिरड्यावर टाकून दिला आहे तर काहींना अन्न-पाण्याच्या शोधात असणाऱ्या शेळ्या-मेंढ्यांना कांदा खाद्य म्हणून खाऊ घालावा लागत आहे.

यावर्षी येवला तालुक्यात सुमारे पंधरा हजार हेक्टरवर उन्हाळी कांद्याची लागवड झाली होती. त्यासाठी शेतकऱ्यांनी एकरी सुमारे सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च केला. बियाणे भेसळयुक्त निघाल्याने व वातावरणातील वारंवार होणाऱ्या बदलामुळे कांदा पिकाला पोषक वातावरण तयार न झाल्याने उत्पादन घटले. तयार झालेला कांदा बाजार समित्या कोरोना लॉकडाऊनमुळे बंद असल्याने विकता आला नाही. त्यामुळे कांदा झाकून ठेवावा लागला. .नियमात शिथिलता आल्याने व बाजार समित्या सुरू झाल्याने शेतकरी वर्गाने कांदा विक्रीसाठी काढला; मात्र कांदा खराब होऊन सडून गेल्याने शेतकऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. लाखो रुपये खर्च करूनही पदरात काहीच पडत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला असून, त्याच्यापुढे खरीप भांडवलाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोट...

कोरोना लॉकडाऊनमुळे बाजार समित्या बंद असल्याने उन्हाळी कांदा विकता आला नाही, त्यामुळे कांदा साठवून ठेवला. आता नियमात बदल होऊन बाजार समित्या सुरू झाल्याने कांदा विक्रीसाठी काढला; मात्र वातावरणातील बदल व अवकाळी पावसाने संपूर्ण कांदा सडून नुकसान झाले आहे. शासनाने अशा सर्व खराब झालेल्या कांद्याचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी.

- सागर शेळके, कांदा उत्पादक, ठाणगाव