शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

साठविलेल्या कांद्याचे पावसामुळे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:11 IST

मागील वर्षापासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा ...

मागील वर्षापासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा झाल्याने आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. यावर्षी अवकाळी पावसाने खरीप-रब्बी हंगामातील कांदा रोपे खराब झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध होईल, तेथून मिळेल त्या भावात कांदा बियाणे आणून कांदा लागवड केली. मात्र, या बियाणांतही शेतकऱ्यांची फसवणूक झाली. लागवड केलेल्या कांद्याला डोंगळे निघाले. तसेच वातावरणातील सततच्या बदलामुळे व महिन्यातून दोन ते तीन वेळेस पडत असलेल्या बेमोसमी पावसाने कांदा पिकावर मावा, करपा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्नात निम्म्याने घट आली. असे असले तरी तयार झालेला कांदा बाजार समित्या बंद असल्यामुळे विक्री करता न आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे कांदा साठविण्यासाठी पर्यायी व्यवस्था नव्हती, त्यांनी कांदा शेतातील झाडांच्या सावलीत पोळ लावून झाकून ठेवला. मागील महिन्यात झालेल्या वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली तसेच होत असलेला अवकाळी पाऊस यामुळे कांदा सडून खराब झाला आहे. अनेक शेतकऱ्यांचा कांदा खराब झाला असल्यामुळे अनेकांनी कांदा उकिरड्यावर टाकून दिला आहे तर काहींना अन्न-पाण्याच्या शोधात असणाऱ्या शेळ्या-मेंढ्यांना कांदा खाद्य म्हणून खाऊ घालावा लागत आहे.

यावर्षी येवला तालुक्यात सुमारे पंधरा हजार हेक्टरवर उन्हाळी कांद्याची लागवड झाली होती. त्यासाठी शेतकऱ्यांनी एकरी सुमारे सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च केला. बियाणे भेसळयुक्त निघाल्याने व वातावरणातील वारंवार होणाऱ्या बदलामुळे कांदा पिकाला पोषक वातावरण तयार न झाल्याने उत्पादन घटले. तयार झालेला कांदा बाजार समित्या कोरोना लॉकडाऊनमुळे बंद असल्याने विकता आला नाही. त्यामुळे कांदा झाकून ठेवावा लागला. .नियमात शिथिलता आल्याने व बाजार समित्या सुरू झाल्याने शेतकरी वर्गाने कांदा विक्रीसाठी काढला; मात्र कांदा खराब होऊन सडून गेल्याने शेतकऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. लाखो रुपये खर्च करूनही पदरात काहीच पडत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला असून, त्याच्यापुढे खरीप भांडवलाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोट...

कोरोना लॉकडाऊनमुळे बाजार समित्या बंद असल्याने उन्हाळी कांदा विकता आला नाही, त्यामुळे कांदा साठवून ठेवला. आता नियमात बदल होऊन बाजार समित्या सुरू झाल्याने कांदा विक्रीसाठी काढला; मात्र वातावरणातील बदल व अवकाळी पावसाने संपूर्ण कांदा सडून नुकसान झाले आहे. शासनाने अशा सर्व खराब झालेल्या कांद्याचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी.

- सागर शेळके, कांदा उत्पादक, ठाणगाव