शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

साठविलेल्या कांद्याचे पावसामुळे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:11 IST

मागील वर्षापासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा ...

मागील वर्षापासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा झाल्याने आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. यावर्षी अवकाळी पावसाने खरीप-रब्बी हंगामातील कांदा रोपे खराब झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध होईल, तेथून मिळेल त्या भावात कांदा बियाणे आणून कांदा लागवड केली. मात्र, या बियाणांतही शेतकऱ्यांची फसवणूक झाली. लागवड केलेल्या कांद्याला डोंगळे निघाले. तसेच वातावरणातील सततच्या बदलामुळे व महिन्यातून दोन ते तीन वेळेस पडत असलेल्या बेमोसमी पावसाने कांदा पिकावर मावा, करपा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्नात निम्म्याने घट आली. असे असले तरी तयार झालेला कांदा बाजार समित्या बंद असल्यामुळे विक्री करता न आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे कांदा साठविण्यासाठी पर्यायी व्यवस्था नव्हती, त्यांनी कांदा शेतातील झाडांच्या सावलीत पोळ लावून झाकून ठेवला. मागील महिन्यात झालेल्या वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली तसेच होत असलेला अवकाळी पाऊस यामुळे कांदा सडून खराब झाला आहे. अनेक शेतकऱ्यांचा कांदा खराब झाला असल्यामुळे अनेकांनी कांदा उकिरड्यावर टाकून दिला आहे तर काहींना अन्न-पाण्याच्या शोधात असणाऱ्या शेळ्या-मेंढ्यांना कांदा खाद्य म्हणून खाऊ घालावा लागत आहे.

यावर्षी येवला तालुक्यात सुमारे पंधरा हजार हेक्टरवर उन्हाळी कांद्याची लागवड झाली होती. त्यासाठी शेतकऱ्यांनी एकरी सुमारे सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च केला. बियाणे भेसळयुक्त निघाल्याने व वातावरणातील वारंवार होणाऱ्या बदलामुळे कांदा पिकाला पोषक वातावरण तयार न झाल्याने उत्पादन घटले. तयार झालेला कांदा बाजार समित्या कोरोना लॉकडाऊनमुळे बंद असल्याने विकता आला नाही. त्यामुळे कांदा झाकून ठेवावा लागला. .नियमात शिथिलता आल्याने व बाजार समित्या सुरू झाल्याने शेतकरी वर्गाने कांदा विक्रीसाठी काढला; मात्र कांदा खराब होऊन सडून गेल्याने शेतकऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. लाखो रुपये खर्च करूनही पदरात काहीच पडत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला असून, त्याच्यापुढे खरीप भांडवलाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोट...

कोरोना लॉकडाऊनमुळे बाजार समित्या बंद असल्याने उन्हाळी कांदा विकता आला नाही, त्यामुळे कांदा साठवून ठेवला. आता नियमात बदल होऊन बाजार समित्या सुरू झाल्याने कांदा विक्रीसाठी काढला; मात्र वातावरणातील बदल व अवकाळी पावसाने संपूर्ण कांदा सडून नुकसान झाले आहे. शासनाने अशा सर्व खराब झालेल्या कांद्याचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी.

- सागर शेळके, कांदा उत्पादक, ठाणगाव