शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
3
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
4
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
5
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
6
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
7
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
8
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
9
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
10
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
11
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
12
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
13
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
14
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
15
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
16
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
17
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
18
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
19
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
20
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

पावसाची हजेरी कायम; २० टक्के पेरण्या पूर्ण

By admin | Updated: July 9, 2016 00:33 IST

पावसाची हजेरी कायम; २० टक्के पेरण्या पूर्ण

नाशिक : जूनमध्ये दडी मारलेल्या पावसाने जुलैमध्ये चांगली हजेरी लावल्याने खरीप पेरण्यांना वेग आला आहे. ८ जुलैअखेर जिल्ह्यातील सहा लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी एक लाख २७ हजार हेक्टर (१९.२०) क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. पावसाची अशीच हजेरी कायम राहिल्यास खरिपाच्या शंभर टक्के पेरण्या आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.खरिपाच्या पेरण्या पाऊस नसल्याने लांबल्या होत्या. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने सलग हजेरी लावल्याने बळीराजाची खरीप पेरण्यांची लगबग वाढली होती. शुक्रवारी (दि.८) दुपारनंतर पुन्हा शहरासह जिल्ह्णातील काही भागांत पावसाने हजेरी लावली. जिल्ह्णात खरिपाचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र ६ लाख ५२ हजार हेक्टर असून, त्यापैकी १ लाख २७ हजार १३० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहे. खरिपात भात, नागली, बाजरीचे सर्वाधिक क्षेत्र आहे. तसेच मका व सोयाबीनचे क्षेत्रही अधिक आहे. जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्यांना सुरुवात झाली नव्हती. मात्र जुलैतील पावसाची हजेरी पाहता बळीराजाने खरिपाच्या पेरण्या आटोपण्यासाठी लगबग सुरू केली आहे. खरिपाच्या पेरण्या झालेल्या क्षेत्रात भात, नागली, ज्वारी, बाजरी, मका, तूर, उडीद, मूग, भूईमूग, सूर्यफूल, सोयाबीन या पिकांचा प्रामुख्याने समावेश आहे. सोयाबीन पिकाचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र ५७ हजार हेक्टर असून, त्यापैकी ४ हजार ७६२ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाच्या पेरण्या झाल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळनंतर अर्धा तास पावसाने शहर परिसरात दमदार हजेरी लावली. दिवसभर आकाश निरभ्र होते. मात्र सायंकाळनंतर पावसाने हजेरी लावली. (प्रतिनिधी)