शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

घोषणांचा पाऊस फेरीवाल्यांच्या हाती छदामही मिळाला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:15 IST

नाशिक : राज्यात वाढत असलेली कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यासाठी राज्य शासनाने ५ एप्रिलपासून कठोर निर्बंध लागू करताना ...

नाशिक : राज्यात वाढत असलेली कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यासाठी राज्य शासनाने ५ एप्रिलपासून कठोर निर्बंध लागू करताना फेरीवाल्यांना १,५०० रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली. मात्र, १४ एप्रिल रोजी मुदत संपून पुन्हा निर्बंध वाढविण्यात आले तरी अद्यापही फेरीवाल्यांना यातील छदामही मिळालेली नाही. यामुळे राज्य शासनाची ही मदत नक्की केव्हा मिळणार, असा प्रश्न आता जिल्ह्यातील फेरीवाल्यांकडून विचारला जात आहे. नाशिक शहरात सुमारे नऊ हजार नोंदणीकृत फेरीवाले असून, १० ते १५ हजार विनानोंदणी फेरीवाले आहेत. शासनाने कठोर निर्बंध लावल्यामुळे फेरीवाल्यांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होऊ नये, त्यांच्या किमान रोटीचा प्रश्न सुटावा, यासाठी शासनातर्फे त्यांना १,५०० रुपयांची मदत दिली जाणार आहे. ही मदत थेट त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. मात्र, घोषणा होऊन महिना उलटला तरी अद्याप जिल्ह्यातील एकाही फेरीवाल्याच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाहीत. जिल्ह्यात फेरीवाल्यांची संख्या मोठी आहे. सध्या कठोर निर्बंधांमुळे फेरीवाल्यांना व्यवसाय करणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्य शासनाने लवकरात लवकर मदतीची रक्कम खा्त्यावर जमा करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

कोट -

कठोर निर्बंधांमुळे फळविक्रीचा व्यवसाय करता येत नाही. सकाळी ग्राहकांची संख्या कमी असते, त्यामुळे पुरेसा व्यवसाय होत नाही. यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. - अखिलेश शर्मा

कोट-

शासनाने मदत जाहीर केली असली तरी ती मिळेल तेव्हाच खरे. मागच्यावर्षीही असेच पाच हजार रुपये देण्याची घोषणा केंद्र शासनाने केली हाेती, पण ते पैसेही अजून मिळालेले नाहीत. - मंजुळाबाई सरोदे

कोट-

कोरोनामुळे मागील वर्षापासून व्यवसाय करणे कठीण झाले आहे. व्यवसाय करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शासन पैसे लवकर देईल, असे वाटत होते, पण अजूनही त्याची कार्यवाही सुरु झालेली नाही. आता नेमके कधी पैसे मिळणार, हे देवच जाणे. - मंगला पाळीकराव

शहरातील नोंदणीकृत फेरीवाले - ९,०००

नोंदणी नसलेले फेरीवाले - किमान १५,०००

चौकट-

फेरीवाल्यांना मदतीबाबतचा विषय महापालिकेत नेमका कोणत्या उपायुक्तांकडे आहे, हेच स्पष्ट नाही. अतिक्रमण उपायुक्त करुणा डहाळले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अद्याप निधी आला नसल्याचे सांगतानाच हा विषय जाहिरात आणि परवाना विभागाकडे असल्याचे सांगितले. या विभागाचे उपायुक्त प्रदीप चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हा विषय अतिक्रमण उपायुक्तांकडे असल्याचे सांगितले.