शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

रेल्वे वाहतूक अखेर पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 23:54 IST

गेल्या पाच दिवसांपासून विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची दोन्ही बाजूची वाहतूक अखेर रविवारपासून पूर्णपणे सुरळीत झाली. मुंबईतील पाऊस थांबल्याने तसेच वाशिंद दरम्यान रेल्वे अपघात झालेल्या ठिकाणी रुळ दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, लांब पल्ल्याच्या गीतांजली, मुंबई-भुसावळ, कामायानी आदी गाड्या रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पंचवटी, गोदावरी, मंगला पाठोपाठ राज्यराणीही आजपासून सुरू झाली.

नाशिकरोड : गेल्या पाच दिवसांपासून विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची दोन्ही बाजूची वाहतूक अखेर रविवारपासून पूर्णपणे सुरळीत झाली. मुंबईतील पाऊस थांबल्याने तसेच वाशिंद दरम्यान रेल्वे अपघात झालेल्या ठिकाणी रुळ दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, लांब पल्ल्याच्या गीतांजली, मुंबई-भुसावळ, कामायानी आदी गाड्या रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पंचवटी, गोदावरी, मंगला पाठोपाठ राज्यराणीही आजपासून सुरू झाली.सहा दिवसांपूर्वी नागपूरहून मुंबईला जाणाºया दुरांतो एक्स्प्रेसला आसनगाव-वासिंद रेल्वे स्थानकादरम्यान अपघात झाला होता. वाशिंद आणि आसनगाव दरम्यान अपघात झालेल्या ठिकाणचे हानी झालेले रुळ बदलण्यात आल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे. मुंबईला जाणारा मार्ग बंद पडल्याने मुंबईहून नाशिकला येणाºया मार्गावरच रेल्वेची भिस्त होती. भुसावळहून मुंबईला जाणाºया गाड्या वाशिंदजवळ येताच डाऊनच्या मार्गावर टाकण्यात येत होत्या. तेथून पुढे दहा ते तीस किमी गतीने नेऊन पुन्हा अपच्या मार्गावर येत होत्या. सिंगल लाईनचा हा धोका पत्करल्यामुळे पंचवटी, गोदावरी व अन्य गाड्या सुरू झाल्या. आता सर्वच वाहतूक सुरळीत झाली आहे. पंचवटी व अन्य गाड्या सुरू झाल्याने नाशिककर प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. राज्यराणी पाच दिवस बंद ठेवण्यात आली होती. राज्यराणी सुरू करण्यासाठी प्रवाशांनी जोर लावल्याने तीही आजपासून सुरू झाली. दोन्ही मार्ग खुले झाल्याने ही गाडी आज मुंबईला रवाना झाली. पुण्याला जाण्यासाठी नाशिककरांना पहाटे भुसावळ-पुणे गाडी आहे. ती पाच दिवस दौंडमार्गे पुण्याला सोडण्यात येत होती. आजपासून ही गाडीदेखील नाशिकमार्गे धाऊ लागल्याने पुण्याला जाणाºया नाशिककरांची गैरसोय दूर झाली आहे.