शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

रेल्वे वाहतूक अखेर पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 23:54 IST

गेल्या पाच दिवसांपासून विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची दोन्ही बाजूची वाहतूक अखेर रविवारपासून पूर्णपणे सुरळीत झाली. मुंबईतील पाऊस थांबल्याने तसेच वाशिंद दरम्यान रेल्वे अपघात झालेल्या ठिकाणी रुळ दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, लांब पल्ल्याच्या गीतांजली, मुंबई-भुसावळ, कामायानी आदी गाड्या रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पंचवटी, गोदावरी, मंगला पाठोपाठ राज्यराणीही आजपासून सुरू झाली.

नाशिकरोड : गेल्या पाच दिवसांपासून विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची दोन्ही बाजूची वाहतूक अखेर रविवारपासून पूर्णपणे सुरळीत झाली. मुंबईतील पाऊस थांबल्याने तसेच वाशिंद दरम्यान रेल्वे अपघात झालेल्या ठिकाणी रुळ दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, लांब पल्ल्याच्या गीतांजली, मुंबई-भुसावळ, कामायानी आदी गाड्या रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पंचवटी, गोदावरी, मंगला पाठोपाठ राज्यराणीही आजपासून सुरू झाली.सहा दिवसांपूर्वी नागपूरहून मुंबईला जाणाºया दुरांतो एक्स्प्रेसला आसनगाव-वासिंद रेल्वे स्थानकादरम्यान अपघात झाला होता. वाशिंद आणि आसनगाव दरम्यान अपघात झालेल्या ठिकाणचे हानी झालेले रुळ बदलण्यात आल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे. मुंबईला जाणारा मार्ग बंद पडल्याने मुंबईहून नाशिकला येणाºया मार्गावरच रेल्वेची भिस्त होती. भुसावळहून मुंबईला जाणाºया गाड्या वाशिंदजवळ येताच डाऊनच्या मार्गावर टाकण्यात येत होत्या. तेथून पुढे दहा ते तीस किमी गतीने नेऊन पुन्हा अपच्या मार्गावर येत होत्या. सिंगल लाईनचा हा धोका पत्करल्यामुळे पंचवटी, गोदावरी व अन्य गाड्या सुरू झाल्या. आता सर्वच वाहतूक सुरळीत झाली आहे. पंचवटी व अन्य गाड्या सुरू झाल्याने नाशिककर प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. राज्यराणी पाच दिवस बंद ठेवण्यात आली होती. राज्यराणी सुरू करण्यासाठी प्रवाशांनी जोर लावल्याने तीही आजपासून सुरू झाली. दोन्ही मार्ग खुले झाल्याने ही गाडी आज मुंबईला रवाना झाली. पुण्याला जाण्यासाठी नाशिककरांना पहाटे भुसावळ-पुणे गाडी आहे. ती पाच दिवस दौंडमार्गे पुण्याला सोडण्यात येत होती. आजपासून ही गाडीदेखील नाशिकमार्गे धाऊ लागल्याने पुण्याला जाणाºया नाशिककरांची गैरसोय दूर झाली आहे.