शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देतबसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
3
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
4
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
5
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
6
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
7
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
8
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
9
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?
10
Matthew Breetzke World Record : हा भाऊ काय ऐकत नाय! फिफ्टी प्लसचा 'चौकार' अन् आणखी एक विश्व विक्रमी डाव
11
"हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग," अमेरिकेच्या माजी NSA नं भारतावरील टॅरिफवरुन केली जोरदार टीका
12
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
13
आलिया भटचे होणारे भाऊजी कोण? शाहीनने शेअर केले बॉयफ्रेंडसोबतचे फोटो; कोण आहे तो?
14
SC on Stray Dogs: श्वानांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालण्यास बंदी; पकडण्यापासून रोखल्यास २ लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
15
'मी प्रेमाने तिच्या जवळ गेलो पण...'; पहिल्या रात्रीच पत्नीचा खरा चेहरा समोर आला, घाबरलेला पती पोलिसांकडे गेला!
16
मुकेश अंबानी यांच्या आई कोकिला बेन यांची प्रकृती बिघडली; एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल
17
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
18
सावध व्हा, तुमच्यासोबतही असं घडू शकतं! अधिकारी असल्याची बतावणी करून २.३ कोटी रुपये पळवले
19
Asia Cup आधी रिंकू सिंहचा शतकी धमाका; ८ उत्तुंग षटकारासह २२५ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
20
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?

१८ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:12 IST

सिन्नर : तालुक्यात सरासरीपेक्षा २८ टक्के जास्त जास्त पाऊस झाल्याने जलसाठे भरले आहेत. रब्बीखालील क्षेत्रात वाढ होण्याबरोबरच सहा हजार ...

सिन्नर : तालुक्यात सरासरीपेक्षा २८ टक्के जास्त जास्त पाऊस झाल्याने जलसाठे भरले आहेत. रब्बीखालील क्षेत्रात वाढ होण्याबरोबरच सहा हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली असून, कांद्याची लागवड करण्याकडे कल वाढला असल्याची माहिती असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

यंदा ८०३ मिमी इतका पाऊस झाल्याने जलपातळीही झपाट्याने सुधारण्यास मदत झाली. रब्बीच्या अखेरपर्यंत विहिरींची जलपातळी टिकून राहण्याची शक्यता आहे. भाजीपाल्याचे क्षेत्र वाढले आहे. कांद्याची लागवड करण्याकडे कल वाढला आहे. ठाणगाव, चास, नळवाडी, कोनांबे, पांढुर्ली, नांदूरशिंगोटे या परिसरात भूजल पातळी टिकून आहे. वावी, पंचाळे, शहा टंचाईग्रस्त मानल्या जाणाऱ्या या परिसरातही भूजल पातळी समाधानकारक असल्याने रब्बीखालील क्षेत्र वाढले आहे. रब्बी पिकांची एकूण चौदा हजार ६६५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ज्वारीची १,५६८, मका १,७६८ तर हरभऱ्याची तीन हजार ९९४ हेक्टरवर पेरणी झाली. गव्हाच्या क्षेत्रात यंदा ५०० हेक्टरने वाढ झाली आहे. ज्वारीचेही क्षेत्र दीडशे हेक्टरने वाढले आहे.

तालुक्यात गहू, हरभरा, मका या रब्बी पिकांसाठी स्पर्धा होत आहे. शेतकऱ्यास यात सहभागी होता येईल. रब्बीतील पीक कापणी प्रयोगासाठी गावनिहाय समितीही गठीत करण्यात आली आहे. तालुकास्तरावर प्रथम येणाऱ्यास पाच हजार, द्वितीय क्रमांकास तीन तर तृतीय क्रमांकास दोन हजार रुपयांचे बक्षीस सरकारतर्फे देण्यात येणार आहे. सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

---------------

३,२५२ हेक्टरवर कांदा लागवड

रब्बी कांदा लागवड यंदा ३,२५२ हेक्टरवर करण्यात आली आहे. नांदूरशिंगोटे परिसरात १,२२१ हेक्टरवर, तर वावी परिसरात १,०५२ हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे. नायगाव, ब्राह्मणवाडे, गुळवंच, नांदूरशिंगोटे, डुबेरे, सोनांबे परिसरात कांद्याची लागवड झाली आहे.

----------------

पिकांवर दुष्परिणाम

रब्बी पिकांवर बदलत्या वातावरणाचा मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम दिसून येत आहे. ढगाळ हवामानामुळे माव्याचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचा लागवड खर्चही वाढला आहे. धुक्यामुळे रब्बी पिकांवर परिणाम झाला आहे. त्यातच कमी दाबाने व खंडित वीजपुरवठा शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे.