शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

१८ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:12 IST

सिन्नर : तालुक्यात सरासरीपेक्षा २८ टक्के जास्त जास्त पाऊस झाल्याने जलसाठे भरले आहेत. रब्बीखालील क्षेत्रात वाढ होण्याबरोबरच सहा हजार ...

सिन्नर : तालुक्यात सरासरीपेक्षा २८ टक्के जास्त जास्त पाऊस झाल्याने जलसाठे भरले आहेत. रब्बीखालील क्षेत्रात वाढ होण्याबरोबरच सहा हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली असून, कांद्याची लागवड करण्याकडे कल वाढला असल्याची माहिती असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

यंदा ८०३ मिमी इतका पाऊस झाल्याने जलपातळीही झपाट्याने सुधारण्यास मदत झाली. रब्बीच्या अखेरपर्यंत विहिरींची जलपातळी टिकून राहण्याची शक्यता आहे. भाजीपाल्याचे क्षेत्र वाढले आहे. कांद्याची लागवड करण्याकडे कल वाढला आहे. ठाणगाव, चास, नळवाडी, कोनांबे, पांढुर्ली, नांदूरशिंगोटे या परिसरात भूजल पातळी टिकून आहे. वावी, पंचाळे, शहा टंचाईग्रस्त मानल्या जाणाऱ्या या परिसरातही भूजल पातळी समाधानकारक असल्याने रब्बीखालील क्षेत्र वाढले आहे. रब्बी पिकांची एकूण चौदा हजार ६६५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ज्वारीची १,५६८, मका १,७६८ तर हरभऱ्याची तीन हजार ९९४ हेक्टरवर पेरणी झाली. गव्हाच्या क्षेत्रात यंदा ५०० हेक्टरने वाढ झाली आहे. ज्वारीचेही क्षेत्र दीडशे हेक्टरने वाढले आहे.

तालुक्यात गहू, हरभरा, मका या रब्बी पिकांसाठी स्पर्धा होत आहे. शेतकऱ्यास यात सहभागी होता येईल. रब्बीतील पीक कापणी प्रयोगासाठी गावनिहाय समितीही गठीत करण्यात आली आहे. तालुकास्तरावर प्रथम येणाऱ्यास पाच हजार, द्वितीय क्रमांकास तीन तर तृतीय क्रमांकास दोन हजार रुपयांचे बक्षीस सरकारतर्फे देण्यात येणार आहे. सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

---------------

३,२५२ हेक्टरवर कांदा लागवड

रब्बी कांदा लागवड यंदा ३,२५२ हेक्टरवर करण्यात आली आहे. नांदूरशिंगोटे परिसरात १,२२१ हेक्टरवर, तर वावी परिसरात १,०५२ हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे. नायगाव, ब्राह्मणवाडे, गुळवंच, नांदूरशिंगोटे, डुबेरे, सोनांबे परिसरात कांद्याची लागवड झाली आहे.

----------------

पिकांवर दुष्परिणाम

रब्बी पिकांवर बदलत्या वातावरणाचा मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम दिसून येत आहे. ढगाळ हवामानामुळे माव्याचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचा लागवड खर्चही वाढला आहे. धुक्यामुळे रब्बी पिकांवर परिणाम झाला आहे. त्यातच कमी दाबाने व खंडित वीजपुरवठा शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे.