शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीचे साडेआठ हजार हेक्टर क्षेत्र पडून

By admin | Updated: December 11, 2015 23:15 IST

बागलाण : पिण्यासाठी जलसाठ्याचे आरक्षण; बळीराजाला मोठा आर्थिक फटका

सटाणा : जिल्हा प्रशासनाने बागलाणचे जलनियोजन करताना रब्बी हंगामासाठी पाणी न देण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यातील सुमारे साडेआठ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीअभावी पडून राहणार आहे. त्यामुळे गहू, हरभरा आणि कांदा उत्पादक चाळीस ते पंचेचाळीस कोटी रुपयांना मुकणार आहे. परिणामी आधीच दुष्काळाच्या झळांनी होरपळणाऱ्या बागलाणच्या बळीराजाचे अर्थकारण कोलमडणार आहे. रब्बीला पाण्याचे एकतरी आवर्तन मिळणार या आशेवर बहुतांश शेतकऱ्यांनी गहू, हरभऱ्याची पेरणी केली आहे. मात्र पाणी मिळण्याची सूतराम शक्यता नसल्याने त्या पेरण्यादेखील आता हातच्या जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.बागलाणचे प्रमुख पीक म्हणून डाळींब फळपीक नावारूपाला आले होते. मात्र तेल्यासारख्या रोगाने या पिकावर आक्र मण केले. त्यावर काही शेतकऱ्यांनी मात करून पीक वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र नैसर्गिक संकटातून डाळींब बागा वाचविण्याच्या प्रयत्नात आधीच कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांनी केलेल्या बेसुमार औषध फवारण्यांमुळे तेल्याचा प्रादुर्भाव अधिकच वाढून डाळींब पीक याभागात अखेरच्या घटका मोजत आहे.जिल्हा प्रशासनाच्या जलनियोजन समितीने नियोजन करताना आगामी सात महिन्यांचा टंचाई आराखडा डोळ्यासमोर ठेवून जलनियोजन करण्यात आले आहे. मात्र या नियोजनात रब्बीसाठी पाणीच शिल्लक नसल्याचे सांगून पाणी न देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे यंदा हरणबारी, केळझर, दसाणा, पठावा या लाभ क्षेत्रातील शेती व्यवसाय पाण्याअभावी धोक्यात आला आहे. या प्रकल्पांमुळे दरवर्षी सुमारे साडेआठ हजार क्षेत्रावरील रब्बी पिकाला पाणी मिळते. रब्बीच्या उत्पादनातून शेतकऱ्यांची कोट्यवधीचे अर्थकारण होते. यंदा मात्र खरीप पावसाअभावी वाया गेल्याने रब्बी तरी हातात येईल या आशेने गहू, हरभऱ्याचे बियाणे, कांद्याचे रोप टाकून ठेवले. कर्ज काढून खते, बियाणे आणली, शेती तयार केली; परंतु जिल्हा प्रशासनाने पाणी शिल्लक नसल्याचे कारण दाखवून रब्बीला पाणी न देण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची भावना शेतकरीवर्गाकडून व्यक्त केली जात आहे. रब्बीला पाणी नाकारल्यामुळे यंदा तालुक्यातील तब्बल साडेआठ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीअभावी पडून राहणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे रब्बी पिकाच्या उत्पादनातून मिळणाऱ्या चाळीस ते पंचेचाळीस कोटी रु पयांना शेतकरी मुकणार आहे. यामुळे आधीच दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले असून, तो अधिकच आर्थिक कोंडीत सापडला आहे. (वार्ताहर)