शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

रब्बी हंगामातील पिके करपू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 15:43 IST

कळवण -लघु पाटबंधारे विभाग व तहसील कार्यालयाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार देवळीवणी लघुपाटबंधारे प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले नसल्याने अंबिका ओझर ग्रामस्थांनी व शेतकरी बांधवांनी नाराजी व्यक्त केली असून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन दोन दिवसात न मिळाल्यास पुन्हा प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकरी बांधवानी दिला आहे.

ठळक मुद्दे विहिरींनी गाठला तळ : अंबिका ओझर ... महसूल व पाटबंधारे विभागाच्या आश्वासनानुसार पाणी नाही दोन दिवसात पाणी न सोडल्यास प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा अंबिका ओझर येथील शेतकरी ग्रामस्थाचा इशारा

कळवण -लघु पाटबंधारे विभाग व तहसील कार्यालयाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार देवळीवणी लघुपाटबंधारे प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले नसल्याने अंबिका ओझर ग्रामस्थांनी व शेतकरी बांधवांनी नाराजी व्यक्त केली असून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन दोन दिवसात न मिळाल्यासपुन्हा प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकरी बांधवानी दिला आहे.कळवण तालुक्यातील अंबिका ओझर येथील विहिरींनी तळ गाठल्याने रब्बी हंगामातील पिकांना शेवटचे पाणी देता येत नसल्याने पिके करपू लागली आहेत. हंगाम वाया जाण्याची भीती आहे. यंदा कोणत्याच शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी हवालिदल झाला आहे. असे असतांना ऐन हातातोंडाशी आलेला घास पिकांना शेवटचे पाणी न मिळाल्यास पैसे, वेळ, मेहनत व पीक वाया जाणार असल्याने व धरणातील हक्काचे आरिक्षत पाणी मिळावे या मागणीसाठी शेतकर्यांनी दि.५फेब्रुवारी रोजी सहाय्यक अभियंता पाटबंधारे विभाग कार्यालय मानूर येथे बेमुदत आमरण उपोषण सुरु केले होते. या आंदोलनांना शिवसेना कळवण तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी पाठिंबा देत तहसीलदार कैलास चावडे व सहाय्यक अभियंता पाटबंधारे विभाग अभिजित रौंदळ यांच्याशी चर्चा करून शेतकर्यांची अडचण ओळखून पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने दखल घेत आंदोलनाच्या दुसर्यादिवशी एक वाजता नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत दि.११ फेब्रुवारी रोजी सकाळी पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले होते.दोन दिवसात हक्काचे पाणी न मिळाल्यास पुन्हा प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी उपोषणकर्ते रामदास खिल्लारी, सरपंच गीताबाई खिल्लारी, इंदिराबाई भोये पोलीस पाटील, मन्साराम गांगुर्डे, विक्र म भोये, पांडुरंग भोये, कांतीलाल भोये, पंढरीनाथ भोये, वामन भोये, रमेश बढावे , साहेबराव भोये, एकनाथ भोये, बुधा मांडवी, भाऊसाहेब भोये, रामचंद्र भोये, काशीराम जोपळे, भाऊराव भोये , परशराम भोये, अविनाश अिहरे, दिपक भोये, बापु भोये, काशीराम भोये आदींसह शेतकरी बांधवानी दिला आहे.