शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

 दिंडोरी तालुक्यात रबीची पिके जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 18:08 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात व इतर भागात अवकाळी पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले; परंतु रबी हंगामातील गहू, हरभरा ही पिके अस्मानी संकटावर मात करीत जोमात आल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मागील हंगामाची नुकसान मालिका रबी हंगामातही सुरू राहिल्याने दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली होती. आता अवकाळी पावसाने रबी हंगाम पूर्णपणे वाया जाईल की काय, या भीतीने शेतकरी वर्ग भयभीत झाला होता; परंतु नशिबाने साथ दिल्याने अवकाळी पावसाचा फटका केवळ अर्ली द्राक्षांना बसला व गहू, हरभरा ही पिके वाचल्यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.मागील हंगामात कमी पाऊस झाला; परंतु त्या कमी पावसामुळे नगदी भांडवल देणाऱ्या पिकांचे अतोनात नुकसान केल्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे हतबल झाला होता. अशा परिस्थितीत शेतकरी वर्गाने मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज उपलब्ध करून रबी हंगामातील गहू, हरभरा या पिकांची पेरणी केली; परंतु अवकाळी पाऊस, वातावरणाचे बदलते रूप, पाणीमिश्रित धुके यामुळे रबीतील पिके वाया जातात की काय, अशी शंका शेतकऱ्यांना वाटत होती. नंतर थोड्याच दिवसांनी थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे ते वातावरण गहू, हरभरा पिकांसाठी पोषक ठरत आहे. त्यामुळे यंदा गहू व हरभरा याचे सरासरी उत्पादन वाढण्याचे चित्र सध्या दिसत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती