शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

रब्बी पिकांना नवसंजीवनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 01:11 IST

मानोरी : महिनाभरापासून ढगाळ वातावरणामुळे येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरातील शेतकरी रब्बी हंगामातील पिकांसह द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतित आहे. दरम्यान, तीन ते चार दिवसांपासून आकाश निरभ्र असून, वातावरण स्वच्छ झाल्याने थंडीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ही थंडी रब्बी पिकांना नवसंजीवनी ठरली आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.

ठळक मुद्देकुठे हर्ष कुठे चिंता : येवला तालुक्यात शेतकामांना वेग; थंडीने द्राक्षबागा धोक्यात

मानोरी : महिनाभरापासून ढगाळ वातावरणामुळे येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरातील शेतकरी रब्बी हंगामातील पिकांसह द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतित आहे. दरम्यान, तीन ते चार दिवसांपासून आकाश निरभ्र असून, वातावरण स्वच्छ झाल्याने थंडीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ही थंडी रब्बी पिकांना नवसंजीवनी ठरली आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक , मानोरी खुर्द, शिरसगाव लौकी, नेऊरगाव, जळगाव नेउर, मुखेड आदी परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात द्राक्ष लागवड झाली असून, अनेक ठिकाणी पुढील दहा ते बारा दिवसांत द्राक्षतोडणीस सुरु वात होणार आहे. फळतोडणीस आल्याने व्यापारी वर्गाकडून द्राक्षांचे दर ठरविणे सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अचानक थंडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने द्राक्षबागेला धोका निर्माण झाला आहे. पहाटे दवबिंदूदेखील जास्त प्रमाणात पडत असून, हे दवबिंदू द्राक्षफळावर जास्त वेळ साचून राहत असल्याने द्राक्षफळ खराब होण्याची धास्ती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे.रब्बी हंगामातील उन्हाळ कांदे, गहू , हरभरा, ज्वारी आदी पिकांना ही थंडी लाभदायी असल्याचे बोलले जात आहे. मागील काही दिवसांपूर्वी वातावरणात सातत्याने बदल झाल्याने रब्बी पिके आणि द्राक्षबागा संकटात सापडलेल्या होत्या. त्यामुळे जवळपास महिनाभर रब्बी हंगामातील पिकांवर आणि द्राक्षबागेवर औषध फवारणी करण्याची वेळ शेतकरीवर्गावर ओढवली होती. वातावरण बदलामुळे औषध फवारणी खर्चात भरसमसाठ वाढ झाली असून, त्यात ऐन द्राक्षतोडणीला थंडीची लाट तीव्र असल्याने तोंडाशी आलेला घास हिरावला जातो की काय अशी चिंता व्यक्त होत आहे.बागा वाचवण्यासाठी लाखोंचा खर्चमागील वर्षीच्या कोरड्या दुष्काळी स्थितीत अनेक शेतकºयांनी कुºहाड चालवत द्राक्षबागा भुईसपाट केल्या होत्या. यंदा पर्जन्यमान समाधानकारक असल्याने शेतकरीवर्गाने द्राक्षबागा पुन्हा फुलवल्या आहेत. वर्षातून एकदाच बागेतून उत्पादन निघत असल्याने बाग जगविण्यासाठी लाखो रु पयांचा खर्च येत असतो. सातत्याने वातावरणात बदल होत असला तरी मोठ्या मेहनतीने औषध फवारणी करून द्राक्षबागा वाचवण्यासाठी बागायतदारांची कसरत सुरू आहे. मात्र, पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचे बोलले जात असल्याने याचा परिणाम द्राक्षमण्यांवर होणार आहे. यामुळे द्राक्षाच्या दरात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.शेकोट्या पेटू लागल्याथंडीमुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. संध्याकाळी सहा वाजेपासून तरुण, आबालवृद्ध शेकोटीभोवती बसून गप्पा मारताना दिसत आहे. बाजारामध्ये उबदार कपडे मोठ्या प्रमाणात विक्र ीसाठी दाखल झाले आहे. मागणी असल्याने महागड्या दराने उबदार कपड्यांची विक्री होत आहे. थंडीने रु ग्णसंख्येत वाढ झाली असून, दवाखान्यात गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन