शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी पिकांना नवसंजीवनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 01:11 IST

मानोरी : महिनाभरापासून ढगाळ वातावरणामुळे येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरातील शेतकरी रब्बी हंगामातील पिकांसह द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतित आहे. दरम्यान, तीन ते चार दिवसांपासून आकाश निरभ्र असून, वातावरण स्वच्छ झाल्याने थंडीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ही थंडी रब्बी पिकांना नवसंजीवनी ठरली आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.

ठळक मुद्देकुठे हर्ष कुठे चिंता : येवला तालुक्यात शेतकामांना वेग; थंडीने द्राक्षबागा धोक्यात

मानोरी : महिनाभरापासून ढगाळ वातावरणामुळे येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरातील शेतकरी रब्बी हंगामातील पिकांसह द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतित आहे. दरम्यान, तीन ते चार दिवसांपासून आकाश निरभ्र असून, वातावरण स्वच्छ झाल्याने थंडीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ही थंडी रब्बी पिकांना नवसंजीवनी ठरली आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक , मानोरी खुर्द, शिरसगाव लौकी, नेऊरगाव, जळगाव नेउर, मुखेड आदी परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात द्राक्ष लागवड झाली असून, अनेक ठिकाणी पुढील दहा ते बारा दिवसांत द्राक्षतोडणीस सुरु वात होणार आहे. फळतोडणीस आल्याने व्यापारी वर्गाकडून द्राक्षांचे दर ठरविणे सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अचानक थंडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने द्राक्षबागेला धोका निर्माण झाला आहे. पहाटे दवबिंदूदेखील जास्त प्रमाणात पडत असून, हे दवबिंदू द्राक्षफळावर जास्त वेळ साचून राहत असल्याने द्राक्षफळ खराब होण्याची धास्ती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे.रब्बी हंगामातील उन्हाळ कांदे, गहू , हरभरा, ज्वारी आदी पिकांना ही थंडी लाभदायी असल्याचे बोलले जात आहे. मागील काही दिवसांपूर्वी वातावरणात सातत्याने बदल झाल्याने रब्बी पिके आणि द्राक्षबागा संकटात सापडलेल्या होत्या. त्यामुळे जवळपास महिनाभर रब्बी हंगामातील पिकांवर आणि द्राक्षबागेवर औषध फवारणी करण्याची वेळ शेतकरीवर्गावर ओढवली होती. वातावरण बदलामुळे औषध फवारणी खर्चात भरसमसाठ वाढ झाली असून, त्यात ऐन द्राक्षतोडणीला थंडीची लाट तीव्र असल्याने तोंडाशी आलेला घास हिरावला जातो की काय अशी चिंता व्यक्त होत आहे.बागा वाचवण्यासाठी लाखोंचा खर्चमागील वर्षीच्या कोरड्या दुष्काळी स्थितीत अनेक शेतकºयांनी कुºहाड चालवत द्राक्षबागा भुईसपाट केल्या होत्या. यंदा पर्जन्यमान समाधानकारक असल्याने शेतकरीवर्गाने द्राक्षबागा पुन्हा फुलवल्या आहेत. वर्षातून एकदाच बागेतून उत्पादन निघत असल्याने बाग जगविण्यासाठी लाखो रु पयांचा खर्च येत असतो. सातत्याने वातावरणात बदल होत असला तरी मोठ्या मेहनतीने औषध फवारणी करून द्राक्षबागा वाचवण्यासाठी बागायतदारांची कसरत सुरू आहे. मात्र, पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचे बोलले जात असल्याने याचा परिणाम द्राक्षमण्यांवर होणार आहे. यामुळे द्राक्षाच्या दरात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.शेकोट्या पेटू लागल्याथंडीमुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. संध्याकाळी सहा वाजेपासून तरुण, आबालवृद्ध शेकोटीभोवती बसून गप्पा मारताना दिसत आहे. बाजारामध्ये उबदार कपडे मोठ्या प्रमाणात विक्र ीसाठी दाखल झाले आहे. मागणी असल्याने महागड्या दराने उबदार कपड्यांची विक्री होत आहे. थंडीने रु ग्णसंख्येत वाढ झाली असून, दवाखान्यात गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन