शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कसा पाहता येईल जेतेपदासाठीचा ऐतिहासिक सामना?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

राज्यात प्रत्येक शहरात इंटिग्रेटेड बसपोर्ट : फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 22:30 IST

नाशिक : बस प्रवाशांच्या सोयीसाठी आता विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांचे नूतनीकरण करण्यात येणार असून, नाशिकच्या धर्तीवर राज्यात सर्वच शहरांमध्ये बसपोर्ट साकारण्यात येईल, तर पुण्यात स्वारगेट येथे इंटिग्रेटेड बसपोर्टचा प्रकल्प राबविला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.नाशिकमध्ये मेळा बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात येणार असून, बसपोर्टच्या धर्तीवर त्याचा विकास करण्यात येणार आहे. ...

ठळक मुद्देनाशिकहून मुंबईला अवघ्या सव्वा तासात बुलेट ट्रेनने पोहोचता येईलमुंबईतील बसस्थानकावर आता नाशिकचा भाजीपाला मिळू शकेलनितीन गडकरी यांनी राज्यभरात बसपोर्ट उभारण्याची तयारी दर्शविली पुण्यात स्वारगेट येथे इंटिग्रेटेड बसपोर्टचा प्रकल्प राबविला जाईल

नाशिक : बस प्रवाशांच्या सोयीसाठी आता विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांचे नूतनीकरण करण्यात येणार असून, नाशिकच्या धर्तीवर राज्यात सर्वच शहरांमध्ये बसपोर्ट साकारण्यात येईल, तर पुण्यात स्वारगेट येथे इंटिग्रेटेड बसपोर्टचा प्रकल्प राबविला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.नाशिकमध्ये मेळा बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात येणार असून, बसपोर्टच्या धर्तीवर त्याचा विकास करण्यात येणार आहे. १५ कोटी रुपयांच्या या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, परिवहनमंत्री दिवाकर रावते तसेच पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय भूतल परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यभरात बसपोर्ट उभारण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात करार करून एक एसपीव्ही स्थापन केली जाईल आणि त्यामाध्यमातून बसपोर्ट उभारले जातील. त्यासाठी केंद्र सरकार निधी देणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. मुंबई- अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेन सुरू करताना महाराष्टÑात या प्रकल्पाला जागा दिली जाईल, परंतु नाशिकला थांबा द्यावा, ही मागणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मान्य केली आहे. त्यामुळे नाशिकहून मुंबईला अवघ्या सव्वा तासात बुलेट ट्रेनने पोहोचता येईल, असेही ते म्हणाले. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात सर्वाधिक फायदा नाशिकला होणार असून, जेएनपीटीचे अंतर कमी होणार आहे. केंद्रसरकार नाशिकला ड्रायपोर्ट साकारणार असल्याने दोन ते अडीच तासांत औद्योगिक व शेतमाल जेएनपीटीपर्यंत निर्यातीसाठी पोहोचू शकेल, असे त्यांनी सांगितले.गुजरातला मल्टी ट्रान्सपोर्ट रेल्वे स्टेशन सुरू झाले, त्या धर्तीवर देशभरातील शंभर स्टेशनचा खासगीकरणातून पुनर्विकास करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. मुंबईतील बसस्थानकावर आता नाशिकचा भाजीपाला मिळू शकेल, असेही ते म्हणाले.