शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रांगांमुळे सामान्य नागरिकांचेच हाल : आदित्य ठाकरे

By admin | Updated: November 16, 2016 00:35 IST

रांगांमुळे सामान्य नागरिकांचेच हाल : आदित्य ठाकरे

नाशिक : एका रात्रीतून नोटा बदलण्याचा निर्णय घेतल्याने लोकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. सामान्य नागरिकांचेच प्रचंड हाल होत असल्याची टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली. नाशिक येथील विद्यार्थ्यांना टॅब वितरणासाठी आदित्य ठाकरे आले होते, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. विद्यार्थ्यांची दप्तरापासून सुटका करण्याचा प्रयत्न शिवसेनेचा असून, त्यासाठी मुंबई महापालिकांतर्गत तब्बल ४८० शाळांमधील १० हजार विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण करण्यात आले आहे. मुंबईमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम तयार करण्यात आले असून, वितरित करण्यात आलेल्या टॅबमध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराथी या भाषांतील पुस्तकांचा समावेश आहे. इंग्रजी, सेमी इंग्रजी आणि मराठी भाषांतील शाळांमध्ये वाटप करण्यात आलेल्या टॅबमध्ये नवनितच्या पुस्तकांचे स्कॅनिंग करून डिजिटल रूपात पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती देण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्यातून सुटका करण्यासाठी टॅबचे वितरण करण्यात यावे अशी मागणी मागील वर्षीच आपण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली असून, त्यावर सरकारने निर्णय घेणे अद्याप बाकी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांनाच मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लोकांना अडचणी येत आहे. शिवसेनेची याबाबतची भूमिका उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे युटीलिटी पेमेंट पाठविण्याची मुदत ३० डिसेंबरपर्यंत वाढवून देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)