शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

गोव्याच्या अधिवेशनात शिक्षक बदल्यांचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:32 IST

नाशिक : गोवा येथे होणाऱ्या प्राथमिक शिक्षक महासंघाच्या अधिवेशनात नाशिकच्या जिल्हा परिषद शिक्षक बदल्यांमधील गोंधळाकडे मुख्यमंत्र्यांसह शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले जाण्याची दाट शक्यता आहे. आॅनलाइन बदल्यांमध्ये शासनाची दिशाभूल करून अपेक्षित बदली पदरात पाडून घेणाºया शिक्षकांना अभय देतानाच इतर शिक्षकांवर झालेला अन्याय अधिवेशनात मांडला जाणार आहे. नाशिक जिल्ह्णासह राज्यातील इतर ठिकाणीदेखील आॅनलाइन बदल्यांमध्ये झालेल्या गोंधळाबाबत शिक्षणमंत्र्यांना निवेदन देण्याची तयारी नाशिकच्या पदाधिकाºयांनी चालविली आहे.

ठळक मुद्देशासनाचे वेधणार लक्ष : जिल्हा परिषदेतील गोंधळ येणार चव्हाट्यावर

नाशिक : गोवा येथे होणाऱ्या प्राथमिक शिक्षक महासंघाच्या अधिवेशनात नाशिकच्या जिल्हा परिषद शिक्षक बदल्यांमधील गोंधळाकडे मुख्यमंत्र्यांसह शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले जाण्याची दाट शक्यता आहे. आॅनलाइन बदल्यांमध्ये शासनाची दिशाभूल करून अपेक्षित बदली पदरात पाडून घेणाºया शिक्षकांना अभय देतानाच इतर शिक्षकांवर झालेला अन्याय अधिवेशनात मांडला जाणार आहे. नाशिक जिल्ह्णासह राज्यातील इतर ठिकाणीदेखील आॅनलाइन बदल्यांमध्ये झालेल्या गोंधळाबाबत शिक्षणमंत्र्यांना निवेदन देण्याची तयारी नाशिकच्या पदाधिकाºयांनी चालविली आहे.अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे अधिवेशन व शिक्षण परिषद येत्या ८ व ९ फेब्रुवारी रोजी गोवा येथे होणार आहे. या अधिवेशनासाठी मानव संसाधन विकासमंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह अनेक मंत्रिगण या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.या अधिवेशनात शिक्षकांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. या प्रलंबित मागण्यांबाबत कदाचित मुख्यमंत्र्यांकडून घोषणादेखील होण्याची शक्यता आहे. परंतु शिक्षक बदल्यांमधील गोंधळाला वाचा फुटावी यासाठी अधिवेशनात शिक्षक बदलीमध्ये झालेल्या प्रकाराबाबत गाºहाणे मांडले जाणार आहे. नाशिक जिल्ह्णातील अन्यायग्रस्त शिक्षकांच्या कृती समितीने यापूर्वीच न्यायालयात धाव घेतली आहे. आता अधिवेशनाच्या निमित्ताने शिक्षक बदल्यांकडे शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे. बदलीप्रक्रियेत खोटी माहिती भरून काही शिक्षकांनी शासनाची फसवणूक करून सोयीच्या बदल्या करून घेतल्या आहेत. प्रशासनाने देखील अशा शिक्षकांच्या बाजूने भूमिका घेतली आहे. त्यामुळे इतर शिक्षकांवर अन्याय झाला आहे. अनेक ठिकाणी पती-पत्नी एकत्रिकरण नव्हे तर त्यांना विभक्त करण्यात आले आहे. आदिवासी दुर्गम भागात सेवा करूनही त्यांनाच अवघड क्षेत्रात पाठवले आहे. आयुष्यभर ज्यांनी आदिवासी भागात सेवा केलेली नाही ते आजही सोयीच्या ठिकाणी काम करीत आहेत. महिला शिक्षकांच्या बदल्या करतानादेखील अनेक नियम पायदळी तुडविण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरमहा वेतन पाच तारखेच्या आत मिळावे, चटोपाध्याय, वरिष्ठ वेतनश्रेणी त्वरित लागू केल्यास कामगारांना त्याचा अधिकच लाभ होणार आहे. मार्च महिन्यापासून सकाळच्या शाळा कराव्यात, आदिवासी भागातील शिक्षकांना एकस्तर वेतनवाढ, शालेय पोषण आहाराची बिले वेळेवर मिळावित, एक वेतनवाढ फरक मिळावा, फरक बिले मिळावित, मेडिकल बिले मिळावित, मार्चपासून दुपारच्या शाळा सकाळी कराव्यात, अशी मागण्या करण्यात आल्या आहेत.