शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

रेंडाळगाव ते लभानतांडा रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी

By admin | Updated: June 30, 2014 22:52 IST

रेंडाळगाव ते लभानतांडा रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी

येवला : येथील तहसीलदारांच्या पुढाकार आणि निर्धाराने अखेर ५० वर्षांपासूनचा रेंडाळगाव ते लभानतांडा रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला. ५० वर्षांपासूनची तुमची आपापसातील भांडसे अद्याप मिटली नाही. तुमच्या वादामुळे या गावातील सुमारे पुन्हा पुन्हा जर तुम्ही कागदावर आला, तर निर्णय घेणे अवघड आहे. मी येथे प्रशासकीय अधिकारी म्हणून आलेला आहे. रस्त्यापासून वंचित ग्रामस्थांना रस्ता उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मी माझी प्रशासकीय भूमिका बाजूला ठेवतो तुम्हीही तुमच्या बांध, वाट, हिस्स्यांचे कागदपत्र बाजूला ठेवा. समजुतीची व सहकार्याच्या भावनेने विचार करा. तुमच्याच गावातील शालेय विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, वृद्धांना, आजारी पेशंटसाठी तुम्ही रस्ता देणार आहात. या रस्त्याचा वाद मिटल्याशिवाय मी येथून जाणार नाही, अशी भूमिका घेऊन येवला तहसीलदार शरद मंडलिक यांनी दुपारी ४ ते संध्याकाळी ७.३0 वाजेपर्यंत प्रत्यक्ष स्थळी थांबून ग्रामस्थांसाठी वहिवाटी रस्ता जाणे येणेसाठी उपलब्ध करून दिला. मंडल अधिकारी अशोक पगारे, डी. व्ही. वाघ हे याप्रसंगी उपस्थित होते.रेंडाळे, ता. येवला येथे कोळगाव खरवंडी रस्त्यावर रेंडाळागाव ते लभानतांडा या शिवरस्त्यावर शिवाजी कारभारी गरुड व अरुण कचरू अहेर या रस्त्यालगत शेतकऱ्यांमध्ये ५० वर्षांपासून वाद होता. सदरचे शेतकरी हक्क सांगत असल्याने दोन्ही बाजूंनी अतिक्रमण होऊन सदरचा रस्ता बंद झाला होता. शालेय विद्यार्थी, शेतकरी यांना हा रस्ता बंद झाल्याने दि. २८/१/१४ रोजी सुवर्ण जयंती राजस्व अभियाना अंतर्गत तत्कालीन नायब तहसीलदार विनायक थविल यांच्या उपस्थितीत मोकळा करण्यात आला होता. यावेळी जिल्हा बँक संचालक अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी स्वखर्चाने २ दिवस जेसीबी मशीन उपलब्ध करून देऊन हा वाद मिटण्यासाठी मध्यस्थी केली होती. शेती मशागतीचे कामे सुरू झाल्यावर लगतच्या दोन्ही शेतकऱ्यांकडून हा रस्ता बंद करण्यात आल्यावर रेंडाळा ग्रामस्थांनी तहसीलदार येवला यांच्याकडे सामुदायिक तक्रार दाखल करून रस्ता मिळण्याची मागणी केली. रस्त्यापासून वंचित ग्रामस्थांची शालेय विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन प्रत्यक्षस्थळी दोन दिवसांत येण्याचे आश्वासन देऊन वादी प्रतिवादींना हजर राहण्याचे सूचित केले.