शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

काजी गढीवासीयांचा सवाल : आम्ही जायचं कुठं? प्रशासन म्हणतं तात्पुरता निवारा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 14:47 IST

काठावरील सुमारे पंधरा घरे पावसाळ्यात गढी ढासळून पत्त्याच्या इमल्याप्रमाणे कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत गांभीर्याने पावले उचलणे गरजेचे आहे याकडे ‘लोकमत’ने ‘धोका वेळीच ओळखावा...’ या मथळ्याखाली सचित्र वृत्त गुरूवारी (दि.४) प्रसिध्द केले होते.

ठळक मुद्देदुपारी चार वाजेपर्यंत स्थलांतर करण्याचे ‘अल्टिमेटम’‘आमच्या जीवाची एवढी काळजी आहे, तर पावसाळ्यात का धावत येतात?‘आम्हांला तात्पुरता उपाय नको, कायमस्वरूपी इलाज करावा’

नाशिक : जुने नाशिकमधील धोकादायक झालेली काजीची गढी रहिवाशांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तत्काळ रिकामी करावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून रहिवाशांना केले जात आहे; मात्र रहिवाशी त्यांच्या भूमिकेवर अद्याप ठाम असून ‘आम्हांला तात्पुरता उपाय नको, कायमस्वरूपी इलाज करावा’ अशी मागणी त्यांनी धरली आहे. पावसाळ्यापुरते महापालिकेने रहिवाशांच्या निवाऱ्याची व्यवस्था शहरातील महापालिकांच्या शाळांमध्ये केली आहे. शनिवारी (दि.६) दुपारी चार वाजेपर्यंत स्थलांतर करण्याचे ‘अल्टिमेटम’ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रहिवाशांना दिले आहे.

काजीची गढी गोदावरीच्या काठाच्या दिशेने धोकादायक झाली आहे. काठावरील सुमारे पंधरा घरे पावसाळ्यात गढी ढासळून पत्त्याच्या इमल्याप्रमाणे कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत गांभीर्याने पावले उचलणे गरजेचे आहे याकडे ‘लोकमत’ने ‘धोका वेळीच ओळखावा...’ या मथळ्याखाली ‘आॅन दी स्पॉट’ सचित्र वृत्त गुरूवारी (दि.४) प्रसिध्द केले होते. रहिवाशांना केवळ नोटिसा बजावण्याचे सोपस्कार पार पाडून शांत बसलेले महापालिका प्रशासन या वृत्तानंतर खडबडून जागे झाले. रहिवशांच्या स्थलांतराची तात्पुरत्या स्वरूपात बी.डी. भालेकर शाळा, गाडगे महाराज धर्मशाळा, चव्हाट्यामधील रंगारवाडा मनपा शाळा या तीन ठिकाणी व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली. त्यानंतर सातत्याने आपत्ती व्यवस्थापनाकडून रहिवाशांना स्थलांतराचे आवाहन करण्यास सुरूवात झाली आहे. शनिवारी सकाळी महापालिका उपआयुक्त महेश डोईफोडे, अग्निशमन केंद्र अधिकारी राजेंद्र बैरागी, पश्चिम विभागीय अधिकारी अनिल नरसिंगे, प्रभारी शहर अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी पोलिसांच्या मदतीने गढीवर भेट दिली. यावेळी कर्मचाºयांनी रहिवाशांना स्थलांतर करण्याची विनंती केली. पावसाळ्यात गढीचा धोका अधिक वाढला असून तात्पुरत्या स्वरूपात आपल्या कुटुंबासह मनपाने उपलब्ध करून दिलेल्या निवा-यात आश्रय घ्यावा असे आवाहन करण्यात आले. मात्र रहिवाशांनी ‘नेमिची येतो पावसाळा...तसे नेमिच येता अधिकारी...’ असे मानून स्थलांतरास विरोध दर्शविला. ‘आमच्या जीवाची एवढी काळजी आहे, तर पावसाळ्यात का धावत येतात? अन्य दिवस कोठे जातात? असा संतप्त प्रश्नही गढीवासीयांनी यावेळी अधिका-यांपुढे उपस्थित केला. यावेळी मात्र प्रशासनाचे प्रतिनिधी निरूत्तर झाले.दुपारनंतर पोलिसांची मदत घेत रहिवाशांना तात्पुरत्या निवारास्थळी स्थलांतर करण्यास सुरूवात केली जाणार असल्याचे नरसिंगे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाRainपाऊस