शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

काजी गढीवासीयांचा सवाल : आम्ही जायचं कुठं? प्रशासन म्हणतं तात्पुरता निवारा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 14:47 IST

काठावरील सुमारे पंधरा घरे पावसाळ्यात गढी ढासळून पत्त्याच्या इमल्याप्रमाणे कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत गांभीर्याने पावले उचलणे गरजेचे आहे याकडे ‘लोकमत’ने ‘धोका वेळीच ओळखावा...’ या मथळ्याखाली सचित्र वृत्त गुरूवारी (दि.४) प्रसिध्द केले होते.

ठळक मुद्देदुपारी चार वाजेपर्यंत स्थलांतर करण्याचे ‘अल्टिमेटम’‘आमच्या जीवाची एवढी काळजी आहे, तर पावसाळ्यात का धावत येतात?‘आम्हांला तात्पुरता उपाय नको, कायमस्वरूपी इलाज करावा’

नाशिक : जुने नाशिकमधील धोकादायक झालेली काजीची गढी रहिवाशांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तत्काळ रिकामी करावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून रहिवाशांना केले जात आहे; मात्र रहिवाशी त्यांच्या भूमिकेवर अद्याप ठाम असून ‘आम्हांला तात्पुरता उपाय नको, कायमस्वरूपी इलाज करावा’ अशी मागणी त्यांनी धरली आहे. पावसाळ्यापुरते महापालिकेने रहिवाशांच्या निवाऱ्याची व्यवस्था शहरातील महापालिकांच्या शाळांमध्ये केली आहे. शनिवारी (दि.६) दुपारी चार वाजेपर्यंत स्थलांतर करण्याचे ‘अल्टिमेटम’ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रहिवाशांना दिले आहे.

काजीची गढी गोदावरीच्या काठाच्या दिशेने धोकादायक झाली आहे. काठावरील सुमारे पंधरा घरे पावसाळ्यात गढी ढासळून पत्त्याच्या इमल्याप्रमाणे कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत गांभीर्याने पावले उचलणे गरजेचे आहे याकडे ‘लोकमत’ने ‘धोका वेळीच ओळखावा...’ या मथळ्याखाली ‘आॅन दी स्पॉट’ सचित्र वृत्त गुरूवारी (दि.४) प्रसिध्द केले होते. रहिवाशांना केवळ नोटिसा बजावण्याचे सोपस्कार पार पाडून शांत बसलेले महापालिका प्रशासन या वृत्तानंतर खडबडून जागे झाले. रहिवशांच्या स्थलांतराची तात्पुरत्या स्वरूपात बी.डी. भालेकर शाळा, गाडगे महाराज धर्मशाळा, चव्हाट्यामधील रंगारवाडा मनपा शाळा या तीन ठिकाणी व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली. त्यानंतर सातत्याने आपत्ती व्यवस्थापनाकडून रहिवाशांना स्थलांतराचे आवाहन करण्यास सुरूवात झाली आहे. शनिवारी सकाळी महापालिका उपआयुक्त महेश डोईफोडे, अग्निशमन केंद्र अधिकारी राजेंद्र बैरागी, पश्चिम विभागीय अधिकारी अनिल नरसिंगे, प्रभारी शहर अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी पोलिसांच्या मदतीने गढीवर भेट दिली. यावेळी कर्मचाºयांनी रहिवाशांना स्थलांतर करण्याची विनंती केली. पावसाळ्यात गढीचा धोका अधिक वाढला असून तात्पुरत्या स्वरूपात आपल्या कुटुंबासह मनपाने उपलब्ध करून दिलेल्या निवा-यात आश्रय घ्यावा असे आवाहन करण्यात आले. मात्र रहिवाशांनी ‘नेमिची येतो पावसाळा...तसे नेमिच येता अधिकारी...’ असे मानून स्थलांतरास विरोध दर्शविला. ‘आमच्या जीवाची एवढी काळजी आहे, तर पावसाळ्यात का धावत येतात? अन्य दिवस कोठे जातात? असा संतप्त प्रश्नही गढीवासीयांनी यावेळी अधिका-यांपुढे उपस्थित केला. यावेळी मात्र प्रशासनाचे प्रतिनिधी निरूत्तर झाले.दुपारनंतर पोलिसांची मदत घेत रहिवाशांना तात्पुरत्या निवारास्थळी स्थलांतर करण्यास सुरूवात केली जाणार असल्याचे नरसिंगे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाRainपाऊस