शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

कांद्याचा प्रश्न दिल्ली दरबारी

By admin | Updated: July 14, 2014 00:29 IST

कांद्याचा प्रश्न दिल्ली दरबारी

येवला : भाजपाच्या येथील शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची दिल्लीत भेट घेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. त्यांच्याशी ५५ मिनिटे चर्चा करताना शिष्टमंडळाने विविध मागण्या माडल्या.कांदा उत्पादक शेतकऱ्याना कांद्याचा ३००० रुपये हमीभाव देण्यात यावा, कांदा उत्पादन खर्च महाग झाल्याचे लक्षात घेऊन कांद्यावरील निर्यातशुल्क शून्य करण्यात यावे, निर्यातमूल्य प्रत्येक वेळेस बदल्याने ना शेतकऱ्यांचा फायदा होतो ना घरघुती ग्राहकांचा. फायदा फक्त व्यापाऱ्यांचा होतो. याबाबत उपाययोजना करावी, कांद्याला ताबडतोब जीवनावश्यक वस्तूतून वगळण्यात यावे आदि मागण्यांचा त्यात समावेश आहे. या मागण्यांबाबत चर्चा करताना कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी कृषी खात्याचे विभाजन झाले असल्या कारणाने निर्णय प्रक्रि येस वेळ लागत असल्याचे नमूद केले.मागण्या संदर्भात कृषिखात्यासह अन्न व पुरवठा खाते, वाणिज्य खाते, मंत्र्यांची बैठक घेऊन योग्य निर्णय घेऊ, निर्णयात कांदे उत्पादक शेतकऱ्यांंच्या नुकसानीचा व तोट्याचा विचार केला जाईल, अशी हमी दिली. आगामी काळात पंतप्रधान ग्रामसडक योजना राबवून शहरी, ग्रामीण व दुर्गम भागांत रस्त्यांचे जाळे तयार करून ग्रामीण भागातील दळण -वळण गतिमान करू, नियोजित ग्राम सिंचन योजना तयार असून, देशातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहचणार आहे. त्यामुळे शेतकरी समृद्ध होतील, अशी माहिती सिंह यांनी दिली. आगामी काळात कांदा, टमाटे, बटाटे या पिकांसाठी धोरण ठरवून नुकसान व फसवणुकीला प्रतिबंध घालण्यात येणार असल्याचे नियोजन आहे, असे देखील त्यांनी नमूद केले. या शिष्टमंडळाने खासदार राजू शेट्टी यांचीही भेट घेतली. (वार्ताहर)