शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांवरच प्रश्नचिन्ह

By admin | Updated: October 23, 2015 00:19 IST

प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांवरच प्रश्नचिन्ह

नाशिक : चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या लिपिक व तलाठी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांवरच परीक्षार्थी उमेदवारांनी प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण होऊन परिणामी या परीक्षेचा निकाल खोळंबला आहे. उमेदवारांनी पुराव्यानिशी नोंदविलेल्या हरकतींमुळे प्रश्नपत्रिकेच्या तपासणीतही अडथळे निर्माण होऊन गुणपत्रक लांबणीवर पडले आहे. जिल्ह्णातील तलाठ्यांची रिक्त पदे व लिपिकांची पदे भरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जाहिरातीच्या माध्यमातून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले असता, या पदांसाठी इच्छुक असलेल्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्याने या दोन्ही पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर जिल्हा प्रशासनाने परीक्षा घेण्याचे निश्चित केले व त्याची सारी धुरा जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी उचलली. हजारोंच्या संख्येने परीक्षार्थी असल्यामुळे एका खासगी कंपनीला या परीक्षेच्या साऱ्या तयारीचा ठेका देण्यात येऊन फक्त प्रश्नपत्रिका काढण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:कडे ठेवले. त्यामुळे पुरेपूर गोपनीयता पाळत या परीक्षेची प्रश्नपत्रिका काढण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला गेला असला तरी, त्याविषयीही काहींनी त्याचवेळी शंका उपस्थित करून प्रश्नपत्रिका फुटल्याची चर्चाही रंगली होती, तथापि त्याचे ठोस पुरावे समोर आले नाहीत. मात्र आता परीक्षा संपल्यानंतर त्यात विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर काही उमेदवारांनी हरकती घेतल्या आहेत. लिपिक पदासाठी भाषा, गणित, सामान्यज्ञान व समाजशास्त्र अशा चार विषयांवर आधारित प्रश्न विचारण्यात आले होते. परीक्षेनंतर तिसऱ्या दिवशी प्रशासनाने या प्रश्नपत्रिकेची उत्तरे जाहीर केल्यानंतर परीक्षार्थी उमेदवारांनी त्याची पडताळणी केली असता, प्रशासनाने विचारलेल्या प्रश्नांची वेगवेगळी उत्तरे असल्याचे लक्षात आले. प्रशासनाला अपेक्षित असलेल्या उत्तरांपेक्षा उमेदवारांनी केलेल्या अभ्यासात वेगळी उत्तरे असल्याचे पुरावे गोळा करीत वीस उमेदवारांनी सात प्रश्नांना आक्षेप नोंदविले आहेत. जिल्हा प्रशासनाकडे त्यांनी लेखी स्वरूपात हरकती दाखल करून, स्पष्टीकरण मागितल्याने या परीक्षेच्या निकालावरही त्याचे परिणाम झाले आहेत. ज्या उमेदवारांनी हरकती नोंदविल्या, त्यांचे समाधान करण्याबरोबरच जर प्रश्नच चुकीचा असेल, तर उमेदवारांना त्या त्या प्रश्नांचे गुण बहाल करावे लागणार आहेत. उमेदवारांच्या या हरकतींमुळे अचूक प्रश्नपत्रिका काढल्याचा प्रशासनाचा दावा यामुळे फोल ठरला आहे.