शहरं
Join us  
Trending Stories
1
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
2
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
3
महाडमध्ये शिंदेसेना अन् राष्ट्रवादीत तुफान राडा; वाहनांची तोडफोड, तटकरे-गोगावले संघर्ष पेटला
4
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
5
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
6
हर्षित राणाला गौतम गंभीर इतक्या वेळा संधी का देतो? व्हायरल VIDEO मध्ये सापडलं उत्तर
7
सोन्यापेक्षा चांदीची किंमत दुप्पट! चांदीने दिला ८५% रिटर्न, लवकरच २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार करणार?
8
केंद्राचा मोठा निर्णय; पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलले, ‘सेवा तीर्थ’ नावाने ओळखले जाणार
9
न्यूयॉर्कमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर विक्रीला निघाले;  २०१६ मध्ये ट्रम्प यांना आठवण झालेली...
10
कमाल झाली! चाहता मैदानात घुसला; सामना थांबला आणि हार्दिक पांड्यानं हसत सेल्फीसाठी दिली पोझ
11
स्कूटी घेऊन जाताना कोसळला, २७ वर्षीय विनीतचा हार्ट अटॅकने मृत्यू; धडकी भरवणारा Video
12
पाकिस्तानमध्ये 'एचआयव्ही'चा कहर! १५ वर्षांत रुग्णसंख्या तिपटीने वाढली; लहान मुलांनाही संसर्ग! 
13
भाडे देणे म्हणजे खर्च नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य! घर खरेदीच्या मोहात पडण्यापूर्वी 'हे' गणित समजून घ्या!
14
Video: विराट - गंभीरमधील वाद ताणला गेला का? एअरपोर्टवर सिलेक्टरशी किंग कोहलीशी गंभीर चर्चा
15
कर्जमुक्त असलेल्या कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या, २०% चं अपर सर्किट; ₹३३ वर आली किंमत
16
"प्रत्येक नागरिकाच्या फोनमध्ये प्रवेश कशाला?"; 'संचार साथी' ॲपवरुन प्रियांका गांधींचा केंद्राला थेट सवाल
17
कार बाजारात मोठा उलटफेर; ह्युंदाई चौथ्या क्रमांकवर फेकली गेली, पहिली मारुती, दोन, तीन नंबरला कोण? 
18
१५ डिसेंबरपूर्वी करा 'हे' महत्त्वाचं काम; अन्यथा भरावा लागेल मोठा दंड
19
'संचार साथी' ॲपचे ५ महत्त्वाचे फीचर्स : चोरी झालेले फोन ब्लॉक करा आणि फ्रॉडला आळा घालण्यापर्यंत...
20
अरेरे! "५ लाख वाया गेले, माझी सर्व अब्रू गेली..."; नवरदेवाची व्यथा, नवरीने २० मिनिटांत मोडलं लग्न
Daily Top 2Weekly Top 5

विमान दुर्घटनेतील पीक पंचनाम्यावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 02:01 IST

नाशिक : गेल्या आठवड्यात निफाड तालुक्यात कोसळलेल्या विमान दुर्घटनेत नुकसान झालेल्या शेतपिकांचे तलाठी व कृषी सहायकांनी केलेल्या पंचनाम्याविषयी खुद्द प्रशासनातील अधिकाऱ्यांनाच संशय असून, सात शेतकºयांच्या सुमारे पंधरा कोेटी रुपयांच्या नुकसानीचा काढलेला आकडा अवास्तव वाटत असल्याने यासंदर्भात कृषी अधीक्षकांनी स्वत: खात्री करून नव्याने पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

ठळक मुद्देफेरपंचनाम्याच्या सूचनाशासकीय मदत नाहीच

नाशिक : गेल्या आठवड्यात निफाड तालुक्यात कोसळलेल्या विमान दुर्घटनेत नुकसान झालेल्या शेतपिकांचे तलाठी व कृषी सहायकांनी केलेल्या पंचनाम्याविषयी खुद्द प्रशासनातील अधिकाऱ्यांनाच संशय असून, सात शेतकºयांच्या सुमारे पंधरा कोेटी रुपयांच्या नुकसानीचा काढलेला आकडा अवास्तव वाटत असल्याने यासंदर्भात कृषी अधीक्षकांनी स्वत: खात्री करून नव्याने पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.२७ जून रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ओझरच्या एचएएल विमानतळावरून चाचणीसाठी आकाशात उड्डाण घेतलेल्या सुखोई या लढाऊ विमानात तांत्रिक दोष निर्माण झाल्याने ते निफाड तालुक्यातील वावीठुशी शिवारात शेतजमिनीवर कोसळले होते. या विमानातील दोन्ही पायलट सुरक्षितपणे खाली उतरल्याने जीवितहानी टळली असली तरी, या दुर्घटनेत पाच ते सात शेतगटांतील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. साधारणत: या भागात द्राक्षबागाच असल्यामुळे विमान कोसळल्याने बागा जमीनदोस्त झाल्या, तर दूरवर विमानाचे अवशेष विखुरल्याने शेतीपीक नष्ट झाले होते. एका शेतकºयाच्या शेतात मोठा खड्डा झाल्याने नजीकच्या काळात याठिकाणी शेती करणे शक्य नसल्याचे दिसून आले होते.इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतीपिकाच्या झालेल्या नुकसानीवर विश्वास ठेवण्यास शासकीय यंत्रणा तयार नसून, या संदर्भात निफाड उपविभागीय अधिकाºयांनी तालुका कृषी अधिकाºयांना पत्र पाठवून विमान दुर्घटनेच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात कृषी खात्याने संवेदनशीलता दाखविली नसल्याचा ठपका ठेवत या संदर्भात वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत, तर जिल्हा प्रशासनानेही सदरचा अहवाल पुन्हा जिल्हा कृषी अधीक्षकांकडे पाठवून दिला असून, त्यांना फेरपंचानामा करून निश्चित नुकसानीची माहिती सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.शेतकºयांच्या पीक नुकसानीचे पंचनामे करून झालेल्या नुकसानीची भरपाई एचएएलकडून मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असून, त्यानंतरच या शेतकºयांना भरपाई मिळणार आहे. विमान दुर्घटना नैसर्गिक आपत्ती नसल्यामुळे शेतकºयांना शासकीय मदत देय नाही.प्राथमिक अहवाल सादरया दुर्घटनेची दखल घेत निफाडच्या उपविभागीय अधिकाºयांनी तलाठी, मंडल अधिकाºयांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. कृषी सहायकाच्या मदतीने गोरठा व वावी येथील गट नंबर १६७, २८६, २८२, १३४, २४८, २८३, २७६ आदी गटांतील द्राक्षबागांचे पंचनामे करण्यात येऊन त्यात सुमारे पंधरा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करणारा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला आहे.

टॅग्स :Governmentसरकार