शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

विमान दुर्घटनेतील पीक पंचनाम्यावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 02:01 IST

नाशिक : गेल्या आठवड्यात निफाड तालुक्यात कोसळलेल्या विमान दुर्घटनेत नुकसान झालेल्या शेतपिकांचे तलाठी व कृषी सहायकांनी केलेल्या पंचनाम्याविषयी खुद्द प्रशासनातील अधिकाऱ्यांनाच संशय असून, सात शेतकºयांच्या सुमारे पंधरा कोेटी रुपयांच्या नुकसानीचा काढलेला आकडा अवास्तव वाटत असल्याने यासंदर्भात कृषी अधीक्षकांनी स्वत: खात्री करून नव्याने पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

ठळक मुद्देफेरपंचनाम्याच्या सूचनाशासकीय मदत नाहीच

नाशिक : गेल्या आठवड्यात निफाड तालुक्यात कोसळलेल्या विमान दुर्घटनेत नुकसान झालेल्या शेतपिकांचे तलाठी व कृषी सहायकांनी केलेल्या पंचनाम्याविषयी खुद्द प्रशासनातील अधिकाऱ्यांनाच संशय असून, सात शेतकºयांच्या सुमारे पंधरा कोेटी रुपयांच्या नुकसानीचा काढलेला आकडा अवास्तव वाटत असल्याने यासंदर्भात कृषी अधीक्षकांनी स्वत: खात्री करून नव्याने पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.२७ जून रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ओझरच्या एचएएल विमानतळावरून चाचणीसाठी आकाशात उड्डाण घेतलेल्या सुखोई या लढाऊ विमानात तांत्रिक दोष निर्माण झाल्याने ते निफाड तालुक्यातील वावीठुशी शिवारात शेतजमिनीवर कोसळले होते. या विमानातील दोन्ही पायलट सुरक्षितपणे खाली उतरल्याने जीवितहानी टळली असली तरी, या दुर्घटनेत पाच ते सात शेतगटांतील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. साधारणत: या भागात द्राक्षबागाच असल्यामुळे विमान कोसळल्याने बागा जमीनदोस्त झाल्या, तर दूरवर विमानाचे अवशेष विखुरल्याने शेतीपीक नष्ट झाले होते. एका शेतकºयाच्या शेतात मोठा खड्डा झाल्याने नजीकच्या काळात याठिकाणी शेती करणे शक्य नसल्याचे दिसून आले होते.इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतीपिकाच्या झालेल्या नुकसानीवर विश्वास ठेवण्यास शासकीय यंत्रणा तयार नसून, या संदर्भात निफाड उपविभागीय अधिकाºयांनी तालुका कृषी अधिकाºयांना पत्र पाठवून विमान दुर्घटनेच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात कृषी खात्याने संवेदनशीलता दाखविली नसल्याचा ठपका ठेवत या संदर्भात वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत, तर जिल्हा प्रशासनानेही सदरचा अहवाल पुन्हा जिल्हा कृषी अधीक्षकांकडे पाठवून दिला असून, त्यांना फेरपंचानामा करून निश्चित नुकसानीची माहिती सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.शेतकºयांच्या पीक नुकसानीचे पंचनामे करून झालेल्या नुकसानीची भरपाई एचएएलकडून मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असून, त्यानंतरच या शेतकºयांना भरपाई मिळणार आहे. विमान दुर्घटना नैसर्गिक आपत्ती नसल्यामुळे शेतकºयांना शासकीय मदत देय नाही.प्राथमिक अहवाल सादरया दुर्घटनेची दखल घेत निफाडच्या उपविभागीय अधिकाºयांनी तलाठी, मंडल अधिकाºयांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. कृषी सहायकाच्या मदतीने गोरठा व वावी येथील गट नंबर १६७, २८६, २८२, १३४, २४८, २८३, २७६ आदी गटांतील द्राक्षबागांचे पंचनामे करण्यात येऊन त्यात सुमारे पंधरा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करणारा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला आहे.

टॅग्स :Governmentसरकार