शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सानुग्रह अनुदानावर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: October 21, 2015 21:54 IST

महापालिकेवर अर्थसंकट : राजकीय पक्षांमध्ये श्रेयासाठी चढाओढ

नाशिक : एलबीटी रद्द करण्यात आल्याने कर्जबाजारी असलेल्या महापालिकेवर ओढवलेल्या आर्थिक संकटामुळे यंदा दिवाळीभेट म्हणून सानुग्रह अनुदानाची किती रक्कम महापालिका कर्मचाऱ्यांच्या हाती पडेल, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, पालिका कर्मचाऱ्यांना १५ ते २१ हजारांपर्यंतचे सानुग्रह अनुदान मिळावे, यासाठी कर्मचारी संघटनांसह राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे.राज्य शासनाने केवळ ५० कोटींच्या वरील उलाढालीवर एलबीटी सुरू ठेवल्याने महापालिकेची आर्थिक कोंडी झालेली आहे. त्यातच सिंहस्थ कामांची सुमारे ३५० कोटी रुपयांची देयके महापालिकेला येत्या काळात अदा करावी लागणार आहे. महापालिकेवर अर्थसंकट ओढवलेले असतानाच दोन आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान कितपत मिळेल, याची चर्चा सुरू झालेली आहे. यंदा आर्थिक स्थितीमुळे सानुग्रह अनुदानात कपात होण्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. मागील वर्षी कर्मचाऱ्यांना ११ हजार १११ रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. याशिवाय अतिरिक्त २ हजार रुपये देण्याचेही कबूल करण्यात आले होते. परंतु सदर २ हजाराची रक्कम अद्याप हाती पडली नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. सानुग्रह अनुदानाबाबत शिवसेनेच्या म्युनिसिपल कामगार सेनेने यापूर्वीच महासभेत एका प्रस्तावाद्वारे १५ हजारांची मागणी केली आहे, तर कॉँग्रेसनेही तसे पत्र दिले आहे. सीटू प्रणित कामगार संघटनेने, तर २१ हजार रुपयांची मागणी केली आहे. दि. १७ आॅक्टोबरला झालेल्या महासभेत सदस्यांनी सानुग्रह अनुदानासंबंधी निर्णय घेण्याची मागणी महापौरांकडे केली होती; परंतु महापौरांनी त्याबाबत भाष्य करणे टाळले होते. दरम्यान, कर्मचाऱ्यांना मागील वर्षाइतकेच सानुग्रह अनुदान देण्याचे मान्य झाल्यास महापालिका प्रशासनाला सुमारे १० कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. एकीकडे २ लाख रुपयांची कामे होत नसल्याची तक्रारी होत असताना सानुग्रह अनुदानाबाबत प्रशासन कोट्यवधीची तरतूद कशी करणार, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)