शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

हवा-पाणी शुद्धतेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:07 IST

नाशिक : महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन परिसरातच हवेचा गुणवत्ता निर्देशांक सर्वसाधारण तर गतवर्षाच्या तुलनेत पाणी शुद्धतेच्या टक्केवारीत घट झाल्याचे निष्कर्ष नोंदविले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन परिसरातच हवेचा गुणवत्ता निर्देशांक सर्वसाधारण तर गतवर्षाच्या तुलनेत पाणी शुद्धतेच्या टक्केवारीत घट झाल्याचे निष्कर्ष मनपाच्याच आरोग्य व पर्यावरण विभागाने नोंदविले आहेत. याशिवाय, शहरातील ध्वनिप्रदूषणाच्या पातळीतही कमालीची वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य व पर्यावरण विभागाने वार्षिक पर्यावरण मापन अहवाल महासभेला सादर केला. त्यात, हवा, पाणी आणि ध्वनिप्रदूषणाच्या पातळीविषयी निष्कर्ष नोंदवितानाच काही उपाययोजनाही सुचविण्यात आल्या आहेत. हवा गुणवत्ता निर्देशांकाबाबत अहवालात चार पैकी दोन ठिकाणी चांगला तर दोन ठिकाणी सर्वसाधारण दर्जा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे महापालिका मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन परिसरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक ४५.० असा सर्वसाधारण नोंदविण्यात आला आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीतील व्हीआयपी कंपनी परिसरातही हवेचा गुणवत्ता निर्देशांक ४०.५० असा सर्वसाधारणच आहे. मात्र, उद्योग भवन, गोल्फ क्लबजवळील आरटीओ कॉलनी याठिकाणी निर्देशांक चांगला असल्याचे म्हटले आहे. हवेबरोबरच पाण्याच्या शुद्धतेविषयीही प्रश्नचिन्ह आहे.  सन २०१५ मध्ये १७ हजार ८८२ पाण्याचे नमुने तपासण्यात आले असता त्यातील १७ हजार ५१३ नमुने पिण्यायोग्य आढळून आले. टक्केवारीचे प्रमाण ९७.९४ होते. सन २०१६ मध्ये १० हजार १५८ नमुने तपासण्यात येऊन त्यातील ९९८७ नमुने पिण्यायोग्य आढळून आले. टक्केवारीचे प्रमाण ९७.३१ राहिले. मात्र, सन २०१६ मध्ये तपासणीसाठी पाणी नमुने घेण्याचे प्रमाण का घटले याबाबत प्रश्न उपस्थित होऊ शकतो. शहरातील ध्वनिप्रदूषणाच्या पातळीतही वाढ झाल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे. निवासी क्षेत्रात ध्वनी मर्यादा ५५ डेसिबलच्या आत असणे बंधनकारक आहे. मात्र, शहरात दिवसा ८७ डेसिबलपर्यंत तर रात्री ७० डेसिबलपर्यंत ध्वनी पातळीचे प्रमाण गेल्याचे अहवालात म्हटले आहे. बाजारपेठ परिसरातही ध्वनी पातळीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. सुचविण्यात आलेले उपाय अहवालात काही उपायही सुचविण्यात आले आहेत. त्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर समन्वय साधून शहरातील कारखाने व परिसरात हवा प्रदूषण नियंत्रण यंत्र बसवावे. ऋतुमानानुसार हवामानावर देखरेख ठेवणे व त्याच्या नोंदी घेणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्ययावत करणे, वृक्षारोपणावर भर देणे, सिग्नल्सवर प्रदूषण कमी करणारी यंत्रणा बसविणे, प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदीपात्रात मिसळू न देणे, कारखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर जागेवरच प्रक्रिया करणे, जलशुद्धीकरण प्रक्रियेत सुधारणा करणे, नदीपात्रातील निर्माल्य व घाण-कचरा टाकण्यास प्रतिबंध करणे, ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रभावी योजना राबविणे आदी सूचनांचा समावेश आहे.