शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

हवा-पाणी शुद्धतेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:07 IST

नाशिक : महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन परिसरातच हवेचा गुणवत्ता निर्देशांक सर्वसाधारण तर गतवर्षाच्या तुलनेत पाणी शुद्धतेच्या टक्केवारीत घट झाल्याचे निष्कर्ष नोंदविले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन परिसरातच हवेचा गुणवत्ता निर्देशांक सर्वसाधारण तर गतवर्षाच्या तुलनेत पाणी शुद्धतेच्या टक्केवारीत घट झाल्याचे निष्कर्ष मनपाच्याच आरोग्य व पर्यावरण विभागाने नोंदविले आहेत. याशिवाय, शहरातील ध्वनिप्रदूषणाच्या पातळीतही कमालीची वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य व पर्यावरण विभागाने वार्षिक पर्यावरण मापन अहवाल महासभेला सादर केला. त्यात, हवा, पाणी आणि ध्वनिप्रदूषणाच्या पातळीविषयी निष्कर्ष नोंदवितानाच काही उपाययोजनाही सुचविण्यात आल्या आहेत. हवा गुणवत्ता निर्देशांकाबाबत अहवालात चार पैकी दोन ठिकाणी चांगला तर दोन ठिकाणी सर्वसाधारण दर्जा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे महापालिका मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन परिसरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक ४५.० असा सर्वसाधारण नोंदविण्यात आला आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीतील व्हीआयपी कंपनी परिसरातही हवेचा गुणवत्ता निर्देशांक ४०.५० असा सर्वसाधारणच आहे. मात्र, उद्योग भवन, गोल्फ क्लबजवळील आरटीओ कॉलनी याठिकाणी निर्देशांक चांगला असल्याचे म्हटले आहे. हवेबरोबरच पाण्याच्या शुद्धतेविषयीही प्रश्नचिन्ह आहे.  सन २०१५ मध्ये १७ हजार ८८२ पाण्याचे नमुने तपासण्यात आले असता त्यातील १७ हजार ५१३ नमुने पिण्यायोग्य आढळून आले. टक्केवारीचे प्रमाण ९७.९४ होते. सन २०१६ मध्ये १० हजार १५८ नमुने तपासण्यात येऊन त्यातील ९९८७ नमुने पिण्यायोग्य आढळून आले. टक्केवारीचे प्रमाण ९७.३१ राहिले. मात्र, सन २०१६ मध्ये तपासणीसाठी पाणी नमुने घेण्याचे प्रमाण का घटले याबाबत प्रश्न उपस्थित होऊ शकतो. शहरातील ध्वनिप्रदूषणाच्या पातळीतही वाढ झाल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे. निवासी क्षेत्रात ध्वनी मर्यादा ५५ डेसिबलच्या आत असणे बंधनकारक आहे. मात्र, शहरात दिवसा ८७ डेसिबलपर्यंत तर रात्री ७० डेसिबलपर्यंत ध्वनी पातळीचे प्रमाण गेल्याचे अहवालात म्हटले आहे. बाजारपेठ परिसरातही ध्वनी पातळीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. सुचविण्यात आलेले उपाय अहवालात काही उपायही सुचविण्यात आले आहेत. त्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर समन्वय साधून शहरातील कारखाने व परिसरात हवा प्रदूषण नियंत्रण यंत्र बसवावे. ऋतुमानानुसार हवामानावर देखरेख ठेवणे व त्याच्या नोंदी घेणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्ययावत करणे, वृक्षारोपणावर भर देणे, सिग्नल्सवर प्रदूषण कमी करणारी यंत्रणा बसविणे, प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदीपात्रात मिसळू न देणे, कारखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर जागेवरच प्रक्रिया करणे, जलशुद्धीकरण प्रक्रियेत सुधारणा करणे, नदीपात्रातील निर्माल्य व घाण-कचरा टाकण्यास प्रतिबंध करणे, ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रभावी योजना राबविणे आदी सूचनांचा समावेश आहे.