शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

टॅँकरप्रश्नी प्रशासन पेचात

By admin | Updated: August 1, 2016 00:46 IST

मुदत संपुष्टात : पाणीटंचाई कायम

नाशिक : जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा, तर पावसाच्या हजेरीने खरिपाच्या पेरणीत होत असलेली वाढ कायम असली तरी अद्यापही ग्रामीण भागात सुमारे शंभराहून अधिक गावे, वाड्यांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, टंचाई कृती आराखड्यानुसार टँकर सुरू ठेवण्याची मुदत ३१ जुलैअखेर असल्याने सोमवारपासून टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. जून महिन्यात लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना जूनअखेरपर्यंत टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मुदत शासनाने वाढवून दिली होती. तत्पूर्वी एप्रिल व मे महिन्यांतील भीषण पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता, जनतेला मागणीनुसार तत्काळ पाणीपुरवठा करणे सोपे व्हावे म्हणून शासनाने टॅँकर मंजुरीचे अधिकार स्थानिक पातळीवर तहसीलदारांना दिले होते. त्यामुळे जूनअखेर पाऊस लांबल्यामुळे शासनाने ३१ जुलैअखेरपर्यंत टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास अनुमती दिली. नाशिक जिल्ह्यात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली ती अद्यापपर्यंत कायम आहे, त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्याबरोबरच, नद्या, नाले भरून वाहू लागले आहे. परंतु नांदगाव, येवला, बागलाण, मालेगाव व सिन्नर या पाच तालुक्यांत अजूनही पाहिजे तसा समाधानकारक पाऊस पडलेला नाही. परिणामी खरिपाच्या पेरण्याही होऊ शकल्या नाहीत, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही कायम आहे. जुलैअखेरपर्यंत बागलाण, मालेगाव, सिन्नर, येवला, नांदगाव या पाच तालुक्यांतील २६ गावे, ७७ वाड्यांना २४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु शासनाने दिलेली मुदत रविवारी संपुष्टात येत असल्याने तहसीलदारांनाही आता टॅँकर सुरू करण्याचे अधिकार राहिलेले नाहीत. अशा परिस्थितीत सोमवारपासून टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा कसा करायचा, असा प्रश्न उभा राहिला आहे. (प्रतिनिधी)