शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

टॅँकरप्रश्नी प्रशासन पेचात

By admin | Updated: August 1, 2016 00:46 IST

मुदत संपुष्टात : पाणीटंचाई कायम

नाशिक : जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा, तर पावसाच्या हजेरीने खरिपाच्या पेरणीत होत असलेली वाढ कायम असली तरी अद्यापही ग्रामीण भागात सुमारे शंभराहून अधिक गावे, वाड्यांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, टंचाई कृती आराखड्यानुसार टँकर सुरू ठेवण्याची मुदत ३१ जुलैअखेर असल्याने सोमवारपासून टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. जून महिन्यात लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना जूनअखेरपर्यंत टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मुदत शासनाने वाढवून दिली होती. तत्पूर्वी एप्रिल व मे महिन्यांतील भीषण पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता, जनतेला मागणीनुसार तत्काळ पाणीपुरवठा करणे सोपे व्हावे म्हणून शासनाने टॅँकर मंजुरीचे अधिकार स्थानिक पातळीवर तहसीलदारांना दिले होते. त्यामुळे जूनअखेर पाऊस लांबल्यामुळे शासनाने ३१ जुलैअखेरपर्यंत टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास अनुमती दिली. नाशिक जिल्ह्यात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली ती अद्यापपर्यंत कायम आहे, त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्याबरोबरच, नद्या, नाले भरून वाहू लागले आहे. परंतु नांदगाव, येवला, बागलाण, मालेगाव व सिन्नर या पाच तालुक्यांत अजूनही पाहिजे तसा समाधानकारक पाऊस पडलेला नाही. परिणामी खरिपाच्या पेरण्याही होऊ शकल्या नाहीत, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही कायम आहे. जुलैअखेरपर्यंत बागलाण, मालेगाव, सिन्नर, येवला, नांदगाव या पाच तालुक्यांतील २६ गावे, ७७ वाड्यांना २४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु शासनाने दिलेली मुदत रविवारी संपुष्टात येत असल्याने तहसीलदारांनाही आता टॅँकर सुरू करण्याचे अधिकार राहिलेले नाहीत. अशा परिस्थितीत सोमवारपासून टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा कसा करायचा, असा प्रश्न उभा राहिला आहे. (प्रतिनिधी)