शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

भारताच्या पराभवाचा क्रिकेटप्रेमींना धक्का

By admin | Updated: June 19, 2017 01:47 IST

नाराजी : सोशल नेटवर्किंग साइट््सवर निषेध, हार्दिक पांड्याच्या फलंदाजीने दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी (दि. १८) झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर नाशिककर क्रिकेट रसिकांचा पूर्णत: भ्रमनिरास झाला. अनेक नेटिझन्सनी आपला तीव्र संताप सोशल माध्यमातून व्यक्त करत नाराजी प्रकट केली.भारताचा अंतिम फेरीसाठी प्रवेश निश्चित झाल्यानंतर शहरातील क्रिकेट रसिकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण होते, त्यातच अंतिम सामना रविवारी असल्याने अनेकांनी एकत्र बसून सामन्याचा आनंद घेण्याचे पसंद केले होते. परंतु विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया अक्षरश: पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळपासूनच अनेकांनी टीम इंडियाला समर्थन देणारे डीपी ठेवले होते. अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळपासूनच रस्त्यावर शुकशुकाट बघायला मिळला. भारताचे आघाडीचे फलंदाज एकीकडे बाद होत असताना हार्दिक पांड्याच्या कामगिरीला मात्र क्रीडापटूंनी सलाम केला. हार्दिक पांड्याने चौफेर फटकेबाजी करत षटकार मारत क्रीडारसिकांचे मनोरंजन केले.