शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

खाद्याच्या शोधात काळा करकोच्यांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 17:25 IST

देशमाने : रब्बी हंगामातील गहू, हरबरा, ज्वारी आदी पिकांच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाल्याने पशु-पक्षावर उपासमारीची वेळ आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही काळा करकोचा पक्षाचे परिसरात मोठ्या संख्येने आगमन झाले आहे. पावसाळा संपताच आॅक्टोबर-नोव्हेंबर मिहन्यात या पक्षांचे परिसरात आगमन होते. मात्र खाण्यासाठी अन्न-पाणी मिळत नसल्याने दिवसभर आकाशात भटकंती करताना दिसत आहे.

ठळक मुद्दे पक्षांचे थवेच्या-थवे अन्न-पाण्याच्या शोधात आकाशात उडताना दिसत आहे.

देशमाने : रब्बी हंगामातील गहू, हरबरा, ज्वारी आदी पिकांच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाल्याने पशु-पक्षावर उपासमारीची वेळ आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही काळा करकोचा पक्षाचे परिसरात मोठ्या संख्येने आगमन झाले आहे. पावसाळा संपताच आॅक्टोबर-नोव्हेंबर मिहन्यात या पक्षांचे परिसरात आगमन होते. मात्र खाण्यासाठी अन्न-पाणी मिळत नसल्याने दिवसभर आकाशात भटकंती करताना दिसत आहे.दिवसागणिक शेतकरी रब्बी हंगामात देखील गहू, हरबरा, ज्वारी आदी पिकाऐवजी फळबाग व नगदी पिकाकडे वळल्याने परिसरातील विविध प्रजातीच्या पक्षांची लक्षणीय घट झालेली दिसून येत आहे. मात्र असे असतानाही काळा करकोचा पक्षांचे थवेच्या-थवे अन्न-पाण्याच्या शोधात आकाशात उडताना दिसत आहे.एकवेळ देशमानेसह परिसरात रब्बी हंगामात ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असे, पाठोपाठ हरभऱ्याचे पीक असत. सदर पीक बहरात येताच अनेक प्रजातीच्या पक्षांना मुबलक प्रमाणात खाद्य उपलब्ध होत असे. रब्बी हंगाम पशु-पक्षांच्या किलबिलाटाने गजबजून जात असे. सायंकाळच्या वेळेस लाखो मैनांचे अवकाशातील विलोभनीय विहार आता लोप पावत चालले आहे.चौकट....आजही परिसरात मोर, साळुंकी, चिमणी, मैना आदींसह विविध प्रजातींचे पक्षी आढळून येतात, मात्र मोठ्या प्रमाणात वृक्षाची संख्या घटत चालल्याने त्यांचेही अस्तित्व धोक्यात आले आहे.पूर्वी मानवाच्या गरजा मर्यादित होत्या. गरजेपुरते अन्न-धान्य पिकवले तरी समाधानी होता, मात्र दिवसागणिक अधिक उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी व नगदी पिकांकडे शेतकरी वळल्याने स्वत:सह निसर्गाची मोठी हानी करत आहे. पशु-पक्षांच्या संवर्धनासाठी त्यांच्यासाठी चारा-पाण्याची सोय प्रत्येकाने आवर्जुन केली पाहिजे.- कैलास जगताप, देशमाने.