शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

खाद्याच्या शोधात काळा करकोच्यांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 17:25 IST

देशमाने : रब्बी हंगामातील गहू, हरबरा, ज्वारी आदी पिकांच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाल्याने पशु-पक्षावर उपासमारीची वेळ आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही काळा करकोचा पक्षाचे परिसरात मोठ्या संख्येने आगमन झाले आहे. पावसाळा संपताच आॅक्टोबर-नोव्हेंबर मिहन्यात या पक्षांचे परिसरात आगमन होते. मात्र खाण्यासाठी अन्न-पाणी मिळत नसल्याने दिवसभर आकाशात भटकंती करताना दिसत आहे.

ठळक मुद्दे पक्षांचे थवेच्या-थवे अन्न-पाण्याच्या शोधात आकाशात उडताना दिसत आहे.

देशमाने : रब्बी हंगामातील गहू, हरबरा, ज्वारी आदी पिकांच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाल्याने पशु-पक्षावर उपासमारीची वेळ आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही काळा करकोचा पक्षाचे परिसरात मोठ्या संख्येने आगमन झाले आहे. पावसाळा संपताच आॅक्टोबर-नोव्हेंबर मिहन्यात या पक्षांचे परिसरात आगमन होते. मात्र खाण्यासाठी अन्न-पाणी मिळत नसल्याने दिवसभर आकाशात भटकंती करताना दिसत आहे.दिवसागणिक शेतकरी रब्बी हंगामात देखील गहू, हरबरा, ज्वारी आदी पिकाऐवजी फळबाग व नगदी पिकाकडे वळल्याने परिसरातील विविध प्रजातीच्या पक्षांची लक्षणीय घट झालेली दिसून येत आहे. मात्र असे असतानाही काळा करकोचा पक्षांचे थवेच्या-थवे अन्न-पाण्याच्या शोधात आकाशात उडताना दिसत आहे.एकवेळ देशमानेसह परिसरात रब्बी हंगामात ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असे, पाठोपाठ हरभऱ्याचे पीक असत. सदर पीक बहरात येताच अनेक प्रजातीच्या पक्षांना मुबलक प्रमाणात खाद्य उपलब्ध होत असे. रब्बी हंगाम पशु-पक्षांच्या किलबिलाटाने गजबजून जात असे. सायंकाळच्या वेळेस लाखो मैनांचे अवकाशातील विलोभनीय विहार आता लोप पावत चालले आहे.चौकट....आजही परिसरात मोर, साळुंकी, चिमणी, मैना आदींसह विविध प्रजातींचे पक्षी आढळून येतात, मात्र मोठ्या प्रमाणात वृक्षाची संख्या घटत चालल्याने त्यांचेही अस्तित्व धोक्यात आले आहे.पूर्वी मानवाच्या गरजा मर्यादित होत्या. गरजेपुरते अन्न-धान्य पिकवले तरी समाधानी होता, मात्र दिवसागणिक अधिक उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी व नगदी पिकांकडे शेतकरी वळल्याने स्वत:सह निसर्गाची मोठी हानी करत आहे. पशु-पक्षांच्या संवर्धनासाठी त्यांच्यासाठी चारा-पाण्याची सोय प्रत्येकाने आवर्जुन केली पाहिजे.- कैलास जगताप, देशमाने.