शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

जीवनात पावित्र्य हेच प्रमाण माना

By admin | Updated: June 15, 2015 00:11 IST

अनिरुद्ध बापू : श्री गुरुजी रुग्णालयाच्या सोहळ्यात प्रतिपादन

नाशिक : जग काय बोलते त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्यांच्या मतांनी काही फरकही पडत नाही. जे काही करायचे ते स्वत:लाच करायचे आहे. त्यासाठी स्वत:च्या योग्यतेबद्दलची विचारधारा ठाम असली पाहिजे. जीवनात पावित्र्य हेच काम आणि प्रमाण माना, असे प्रतिपादन आध्यात्मिक गुरू डॉ. अनिरुद्ध बापू यांनी श्री गुरुजी रुग्णालयाच्या वतीने आयोजित सोहळ्यात बोलताना केले. कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचलित श्री गुरुजी रुग्णालयाच्या आयुर्वेद विभागाच्या पॅकेजेस्चा शुभारंभ अनिरुद्ध बापू यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी श्री गुरुजी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. विनायक गोविलकर होते. यावेळी अनिरुद्ध बापू यांनी सांगितले, आपण दुसऱ्यांच्या मतांचे खंडण करण्यातच वेळ घालवित राहतो. गोळवलकर गुरुजींनी असा वेळ कधीही घालविला नाही. सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याची त्यांची वृत्ती होती. आवश्यक तेथे जरूर विरोध करायचा; परंतु विरोध करण्यात वेळ घालवायचा नाही, असे त्यांचे सूत्र होते. आता गरज नसताना रुग्णालयांमध्ये रुग्णांना अ‍ॅडमिट करून घेतले जाते; परंतु समाजानेही आपली मानसिकता बदलण्याची गरज असून, आवश्यकता नसताना रुग्णांवर उपचार करण्याचा आग्रह धरणे म्हणजे डॉक्टरांना चुकीच्या मार्गावर नेणे आहे. रुग्णांचेही प्रशिक्षण होणे आवश्यक आहे, असेही अनिरुद्ध बापू यांनी सांगितले. डॉ. विनायक गोविलकर यांनी सेवाभावी वृत्तीने चालविल्या जाणाऱ्या श्री गुरुजी रुग्णालयाच्या कार्यपद्धतीचा वेध घेतला. रुग्णालयाच्या पाठीशी गेल्या आठ वर्षांपासून समाज सतत उभा आहे. सांघिक भावनेतूनच रुग्णालयाची वाटचाल सुरू असल्याचेही गोविलकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, वैद्य अश्विनी चाकूरकर व वैद्य सोनाली देशमुख यांनी आयुर्वेद पॅकेजेस्ची माहिती दिली. डॉ. गिरीश चाकूरकर यांनी प्रास्ताविक, तर प्रा. वृंदा गुडसूरकर यांनी सूत्रसंचालन केले. ओंकार कडवे याने ईशस्तवन सादर केले. व्यासपीठावर श्री गुरुजी रुग्णालयाचे उपाध्यक्ष मुकुंद खाडीलकर, कार्यवाह प्रवीण बुरकुले उपस्थित होते. (प्रतिनिधी)