शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

जीवनात पावित्र्य हेच प्रमाण माना

By admin | Updated: June 15, 2015 00:11 IST

अनिरुद्ध बापू : श्री गुरुजी रुग्णालयाच्या सोहळ्यात प्रतिपादन

नाशिक : जग काय बोलते त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्यांच्या मतांनी काही फरकही पडत नाही. जे काही करायचे ते स्वत:लाच करायचे आहे. त्यासाठी स्वत:च्या योग्यतेबद्दलची विचारधारा ठाम असली पाहिजे. जीवनात पावित्र्य हेच काम आणि प्रमाण माना, असे प्रतिपादन आध्यात्मिक गुरू डॉ. अनिरुद्ध बापू यांनी श्री गुरुजी रुग्णालयाच्या वतीने आयोजित सोहळ्यात बोलताना केले. कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचलित श्री गुरुजी रुग्णालयाच्या आयुर्वेद विभागाच्या पॅकेजेस्चा शुभारंभ अनिरुद्ध बापू यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी श्री गुरुजी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. विनायक गोविलकर होते. यावेळी अनिरुद्ध बापू यांनी सांगितले, आपण दुसऱ्यांच्या मतांचे खंडण करण्यातच वेळ घालवित राहतो. गोळवलकर गुरुजींनी असा वेळ कधीही घालविला नाही. सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याची त्यांची वृत्ती होती. आवश्यक तेथे जरूर विरोध करायचा; परंतु विरोध करण्यात वेळ घालवायचा नाही, असे त्यांचे सूत्र होते. आता गरज नसताना रुग्णालयांमध्ये रुग्णांना अ‍ॅडमिट करून घेतले जाते; परंतु समाजानेही आपली मानसिकता बदलण्याची गरज असून, आवश्यकता नसताना रुग्णांवर उपचार करण्याचा आग्रह धरणे म्हणजे डॉक्टरांना चुकीच्या मार्गावर नेणे आहे. रुग्णांचेही प्रशिक्षण होणे आवश्यक आहे, असेही अनिरुद्ध बापू यांनी सांगितले. डॉ. विनायक गोविलकर यांनी सेवाभावी वृत्तीने चालविल्या जाणाऱ्या श्री गुरुजी रुग्णालयाच्या कार्यपद्धतीचा वेध घेतला. रुग्णालयाच्या पाठीशी गेल्या आठ वर्षांपासून समाज सतत उभा आहे. सांघिक भावनेतूनच रुग्णालयाची वाटचाल सुरू असल्याचेही गोविलकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, वैद्य अश्विनी चाकूरकर व वैद्य सोनाली देशमुख यांनी आयुर्वेद पॅकेजेस्ची माहिती दिली. डॉ. गिरीश चाकूरकर यांनी प्रास्ताविक, तर प्रा. वृंदा गुडसूरकर यांनी सूत्रसंचालन केले. ओंकार कडवे याने ईशस्तवन सादर केले. व्यासपीठावर श्री गुरुजी रुग्णालयाचे उपाध्यक्ष मुकुंद खाडीलकर, कार्यवाह प्रवीण बुरकुले उपस्थित होते. (प्रतिनिधी)