शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

साफसफाई न करताच धान्याची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:25 IST

धान्य चाळण यंत्राची व्यवस्था शेतकरी हिताच्या दृष्टीने बाजार समित्यांनी करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने यापूर्वी शासनाने बाजार समित्यांकडे ...

धान्य चाळण यंत्राची व्यवस्था शेतकरी हिताच्या दृष्टीने बाजार समित्यांनी करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने यापूर्वी शासनाने बाजार समित्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. तथापि अनेक बाजार समित्यांनी अद्याप धान्य चाळण यंत्रे बसविलेली नाहीत, किंवा ज्या बाजार समित्यांनी असे धान्य चाळण यंत्र बसविलेले आहे तेथे त्याचा वापर परिणामकारकपणे केल्याचे दिसून येत नाही. यासंदर्भात सहकार व पणन मंत्री व कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात राज्यातील सर्व बाजार समित्यांनी धान्य चाळण यंत्र व मॉईश्चर मीटरची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र शासन पुरस्कृत ई-नाम योजनेंतर्गत तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गतही अनुदान तत्त्वावर राज्यातील अनेक बाजार समित्यांना धान्य चाळण यंत्रे मंजूर करण्यात आलेली आहेत. तथापि काही बाजार समित्यांनी अनुदान उपलब्ध असूनही धान्य चाळण यंत्र बसविण्याची तसदी घेतलेली नाही अथवा थेट नकार दर्शविलेला आहे. ही बाब गंभीर असून, बाजार समित्यांची स्थापना झालेली आहे, त्या उद्देशालाच छेद देणारी आहे. राज्यातील सर्व बाजार समित्यांनी विशेषत: ज्या बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अन्नधान्ये, कडधान्ये, तेलबिया आदी शेतमालाची आवक आहे, त्यांनी तातडीने धान्य चाळण यंत्र बसवून घ्यावे तसेच आर्द्रता मापक यंत्र याचीही खरेदी करून शेतकऱ्यांसाठी त्याचा वापर करावा. याबाबत कार्यवाही करून पणन कार्यालयास अहवाल पाठवावा, असे पणन संचालक सोनी यांनी आदेश दिले आहेत.

इन्फो

यामुळे आवश्यक असते यंत्र!

राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आणत असतात. त्यापैकी अन्नधान्ये, कडधान्ये, तेलबिया आदी प्रकारच्या शेतमालाची चाळण यंत्राद्वारे साफसफाई करून त्यातील काडीकचरा वेगळा करणे आवश्यक असते. जेणेकरून या शेतमालाचा एफएक्यू दर्जा गाठण्यास साहाय्य होते. शेतकऱ्यास योजनेंतर्गत लागू असलेल्या शेतमालाकरिता किमान आधारभूत किमतीचा लाभ होतो.