शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

रिक्षा नव्हे कोरोना संसर्गाची शिक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:14 IST

शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मार्च ते एप्रिल या कालावधित रुग्णांची संख्या प्रचंड वाढली. त्यामुळे ५ एप्रिलपासून ...

शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मार्च ते एप्रिल या कालावधित रुग्णांची संख्या प्रचंड वाढली. त्यामुळे ५ एप्रिलपासून राज्य शासनाने निर्बंध लागू केले आहेत. त्यावेळी शासनाने जी अधिसूचना जारी केली त्यात नागरिकांना आवश्यक त्या कारणांसाठी प्रवास करायचा असेल तर त्यासाठी दोन प्रवाशांनाच परवानगी देण्यात आली आहे, असे नमूद करण्यात आले आहे. मात्र एकदा परवानगी मिळाली की कोणत्याही नियमांचे पालन करायचे नाही असा बहुतांश रिक्षाचालकांचा अनुभव यंदाही आला आहे.

रिक्षा चालवणे हा रोजीरोटीचा व्यवसाय आहे. त्यामुळे रिक्षाचालकांचे हातावरचे पोट भरण्यासाठी त्यांनी व्यवसाय करण्यास हरकत नाही. मात्र, आरोग्य नियमांचे पालन न करता होत असलेले उल्लंघन हे संसर्गास कारणीभूत ठरत आहे. नाशिकमध्ये अजूनही कोरोना आटोक्यात आलेला नाही. बाधित रुग्णांना ऑक्सिजन बेड सोडाच, साधा बेड मिळत नाही अशी अवस्था आहे, अशावेळी वाढत्या संसर्गाची जबाबदारी कोणाची, हा मोठा हा प्रश्न आहे.

इन्फो...

१०,०००

परवानाधारक रिक्षाचालक

---

२,११,८७९

शहरातील एकूण बाधित

----

१४,२०९

सध्या उपचाराधीन रुग्ण

----

१६७४

शहरातील एकूण मृत्यू

---

इन्फो...

वाहतूक पोलीस गायब...

नाशिक शहरात सध्या बहुतांश सिग्नल बंद आहेत. पॉइंटवरही पोलीस नाहीत. वाहतूक पोलीस तर गायबच आहेत. त्यामुळे अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन होत असेल त्याला कोणी वाली आहे किंवा नाही, असा प्रश्न केला जात आहे.

-------------

समवेत दोन छायाचित्र

०२पीएचएमए ७७, ७८