शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

पुणेगाव पोहोच कालव्याच्या पाण्याची प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:27 IST

तालुक्याच्या उत्तर पूर्व भागाच्या अस्मितेचा पुणेगाव-दरसवाडी- डोंगरगाव पोहोच कालव्याची चर्चा सुरू झाली की, निवडणूक आली म्हणून समजावी, एवढी चेष्टा या प्रकरणाची झाली आहे. निवडणूक आली की अस्मिता जागवायची, मते मागायची. आणि एकदा का निवडणुका पार पडल्या की पुन्हा हा प्रश्न बासनात गुंडाळायचा. असे हे तीन पिढ्यांपासून सुरू आहे. राजकीय पोळ्या भाजल्या गेल्या; पण या भागातील शेतकºयांना पाणी काही दिसले नाही. आता मात्र निवडणुकाचा काळ नसला तरी तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याच्या प्रश्नासंबंधी सेना आणि राष्ट्रवादीला पुन्हा घुमारे फुटू लागले आहेत. श्रेयवादाची लढाई जोरदारपणे चालू असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

येवला : तालुक्याच्या उत्तर पूर्व भागाच्या अस्मितेचा पुणेगाव-दरसवाडी- डोंगरगाव पोहोच कालव्याची चर्चा सुरू झाली की, निवडणूक आली म्हणून समजावी, एवढी चेष्टा या प्रकरणाची झाली आहे. निवडणूक आली की अस्मिता जागवायची, मते मागायची. आणि एकदा का निवडणुका पार पडल्या की पुन्हा हा प्रश्न बासनात गुंडाळायचा. असे हे तीन पिढ्यांपासून सुरू आहे. राजकीय पोळ्या भाजल्या गेल्या; पण या भागातील शेतकºयांना पाणी काही दिसले नाही. आता मात्र निवडणुकाचा काळ नसला तरी तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याच्या प्रश्नासंबंधी सेना आणि राष्ट्रवादीला पुन्हा घुमारे फुटू लागले आहेत. श्रेयवादाची लढाई जोरदारपणे चालू असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अंतिम टप्प्यात येऊन ठप्प झालेले मांजरपाड्याचे काम निधीअभावी अद्यापही रखडलेलेच आहे. नियोजनात असलेला निधी इतरत्र वळवला गेल्याने संतापात अधिकच भर पडली आहे. मांजरपाड्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेकवेळा आंदोलने झाली. राजकीय पक्षांनी निवडणुकीत श्रेयवादासह राजकीय लढाई जरूर खेळावी, पण तालुक्याच्या या पाणीप्रश्नावर तत्काळ निर्णय घ्यावा. पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याचे जनक स्व. आमदार जनार्दन पाटील यांनी जीवनभर उत्तर पूर्व भागात पाणी यावे म्हणून अथक परिश्रम घेतले आहेत. मांजरपाडा वळण बंधाºयाचे व बोगद्याचे दोन वर्षांपासून बंद असलेले काम तत्काळ सुरू व्हावे, ही मागणी करणारी कृती समितीदेखील आता पाठपुरावा करून थकली आहे. अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलने, मोर्चे काढत हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला; मात्र अद्यापपावेतो यश आले नाही. परंतु पाणी आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याच्या सिंहगर्जना मात्र होत आहे.माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने दरसवाडी कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशाने पाणी सोडण्यात आल्याने या कालव्याच्या जलपूजनासाठी महाजन यांना निमंत्रित करण्यात आले असून, या हद्दीत पाणी पोहचताच जलपूजनाचा कार्यक्र म पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत व त्यांच्याच हस्ते होणार आहे. गत चाळीस वर्षांच्या कालखंडात या कालव्याच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात या कालव्याचा प्रश्न अग्रक्र माने मांडला जातो. पालकमंत्र्यांनी कालव्याची पाहणी करून नंतरच पाणी सोडावे.-अंबादास बनकर, सहकार नेतेपुणेगाव-दरसवाडी कालव्याचे रु ंदीकरण व अस्तरीकरण आणि सर्वात महत्त्वाचे मांजरपाडा- १ या बोगद्याचे रखडलेले काम तसेच डोंगरगावपर्यंत अपूर्ण कामे पूर्णत्वास जाणे गरजेचे आहे. वरील कामे करण्याचे आश्वासन नको तर मंजुरी व आर्थिक तरतूद व्हावी अशी शासनाकडे मागणी आहे. ती पूर्ण करण्याकरिता प्रयत्न व्हावे. पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याचा इतिहास, वस्तुस्थिती व भविष्य नाकारून निसर्गाने दाखवलेली ईश्वरीकृपा याचा आधार घेत सुरू झालेली श्रेयवादाची लढाई म्हणजे अनेकांना आमदार होण्याची झालेली  घाई हेच आहे.- अ‍ॅड. माणिकराव शिंदे, राष्टÑवादीचे नेतेपाणी येवला हद्दीत जाण्यासाठी ३५ किमी आहे. १९ किमीला दाखल झाले असून, ओव्हर फ्लो चालू राहिल्यास पाणी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणात आहे. दुसरे जेसीबी मशीन उपलब्ध झाल्याने काम सोपे झाले आहे. पाणी आणण्यासाठी श्रमदानासह सहकार्य करणाºया येवलेकरांना धन्यवाद. सांगवी येथे पाणी तुंबल्याने कालवा फुटण्याची स्थिती निर्माण झाली होती. मी कडवाचे कार्यकारी अभियंता गावित यांच्याशी संपर्क साधून मशीनची मागणी केली. त्यांनी त्वरित मशीन उपलब्ध करून दिले. परिसरातील शेतकºयांनी मोठी मदत केली. येवला तालुक्यातून १०० शेतकरी श्रमदानातून काम करत आहे.  - संभाजी पवार, शिवसेना नेते