शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

पुणेगावचे पाणी पोहचले ४४ किमीपर्यंत

By admin | Updated: August 29, 2016 01:44 IST

पाटोदा : पुढील तीन दिवसात दरसवाडीत पोहचण्याची शक्यता

पाटोदा : गेल्या ४४ वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणेगाव-दरसवाडी- डोंगरगाव पोहोच कालव्याच्या चाचणीसाठी २६ आॅगस्टला दुपारी ४ वाजता पाणी सोडण्यात आले असून, आज (२८ आॅगस्ट) सायंकाळपर्यंत हे पाण्याने विना अडथळा सुमारे ४४ किलोमीटर अंतर (बहादुरी बोगदा) पार केले आहे. सध्या कडवा कालवा विभागातून ९० क्यूसेकने पाण्याचा चाचणीसाठी विसर्ग सुरू असून, हे पाणी दरसवाडी धरणात पोहचण्यात अजून २२ किलोमीटर अंतर बाकी आहे. हे अंतर येत्या तीन चार दिवसात पूर्ण होऊन दरसवाडीत पोहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.पुणेगावमधून दरसवाडीपर्यंत जरी पाणी सोडले असले तरी अद्याप या कालव्याची पाण्याची पहिलीच चाचणी असल्याकारणाने पाण्याचे परक्युलेशन किती प्रमाणात होते यावर बरेच काही अवलंबून आहे. दरसवाडी धरणापासून ते पाठीमागे २० किलोमीटर अंतराची अद्याप कोणतीच चाचणी झालेली नाही. त्यामुळे दरसवाडी धरणात पाणी पोहचणे हीच खरी परीक्षा आहे. पुणेगाव धरणातून चाचणीसाठी सुमारे २०० एमसीपीटी पाणी दिले जाणार आहे. दरसवाडी धरणाची क्षमता १०८ एमसीपीटीची असून, आज रोजी दरसवाडी धरणात सुमारे ६८ एमसीपीटी पाणी उपलब्ध असून, पुणेगावचे पाणी येत्या तीन-चार दिवसात दरसवाडी धरणात पोहचण्याची शक्यता असून, दरसवाडी धरणात पाणी पोहचल्यानंतर दरसवाडी धरणातून पुढे डोंगरगाव पोहोच कालव्याची बाळापूरपर्यंत चाचणी घेतली जाणार आहे. कडवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता संघाणी, उपभियांता टाटीया हे स्वत: या व्यवस्थेची पाहणी करीत आहे. दरम्यान, आज येवला तालुका राष्ट्रवादी करॅँग्रेसचे तालुकाध्यक्ष मोहन शेलार यांनी कार्यकर्त्यांसह पुणेगाव ते दरसवाडीपर्यंत कालव्याची पाहणी केली आहे.पुणेगाव धरणातून दरसवाडी धरणात सोडलेले पाणी येत्या तीन चार दिवसात धरणात पोहचल्या नंतर दरसवाडी धरणपूर्ण भरण्यास सुमारे चार ते पाच दिवस लागू शकतात . धरण भरल्यानंतरच डोंगरगाव पोहोच कालव्याची येवला तालुक्यातील बाळापुर पर्यंत कालव्याची चाचणी होऊ शकते असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. (वार्ताहर)