शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

साहित्य सरिता हिंदी मंचच्या वतीने चिटको, शर्मा यांच्या पुस्तकांचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 01:11 IST

नाशिक : महिलांचा सृजनशील आविष्कार शांततेत होत असतो, त्यामुळे तो अनेकदा समाजापुढे येत नाही.

ठळक मुद्दे ‘कँटीले कैक्टस मेें फूल’ पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशनमहिलांचे कर्तृत्व हे समाजापुढे वारंवार येण्याची गरज

नाशिक : महिलांचा सृजनशील आविष्कार शांततेत होत असतो, त्यामुळे तो अनेकदा समाजापुढे येत नाही. मात्र समाजाच्या जडणघडणीमध्ये महिलांचे नेहमीच भरीव योगदान राहिले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरुण करमाकर यांनी केले.साहित्य सरिता हिंदी मंचच्या वतीने गंगापूररोड परिसरातील शंकराचार्य संकुल सभागृहात डॉ. विद्या चिटको लिखित ‘नाशिक के बहु सांस्कृतिक परिप्रेक्ष्य में स्त्री’ व आनंदबाला शर्मा लिखित ‘कँटीले कैक्टस मेें फूल’ या दोन पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. पी. व्ही. कोटमे हे होते. याप्रसंगी डॉ. रोचना भारती, डॉ. विद्या चिटको, सी. पी. मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी करमाकर म्हणाले, महिलांमध्ये निसर्गाने मोठी शक्ती दिली असून, त्यांचा आविष्कार हा नेहमीच शक्तिशाली राहिलेला आहे. देशाच्या इतिहासात अनेक महिलांची नावे त्यांच्या कर्तबगारीमुळे आजही तितक्याच अभिमानाने झळकत आहेत. महिलांचे कर्तृत्व हे समाजापुढे वारंवार येण्याची गरज आहे; मात्र दुर्दैवाने तसे होत नाही, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी विद्या चिटको यांनी सांगितले की, नाशिकच्या इतिहासात योगदान देणाºया महिलांचे कार्यकर्तृत्व पुस्तकाच्या माध्यमातून सर्वांसमोर येण्यास मदत झाली आहे. तसेच शर्मा यांनीही पुस्तकाविषयी वर्णन केले.