शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
3
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
4
अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
5
"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा
6
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
7
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
8
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
9
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
10
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
11
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
13
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
14
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
15
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
16
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
17
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
18
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
19
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
20
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

विमा कंपनीविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:19 IST

नांदगाव : निसर्गाच्या कोपापुढे हतबल झालेला शेतकरी पीक विम्याच्या रकमेची चातकासारखी वाट बघत असतांना, कोट्यवधींच्या रकमा विमा कंपनीने दाबून ...

नांदगाव : निसर्गाच्या कोपापुढे हतबल झालेला शेतकरी पीक विम्याच्या रकमेची चातकासारखी वाट बघत असतांना, कोट्यवधींच्या रकमा विमा कंपनीने दाबून ठेवल्याच्या प्रकारास वाचा फोडण्यासाठी नांदगाव विधानसभा मतदार संघातील ६५ हजार शेतकऱ्यांच्यावतीने आमदार सुहास कांदे यांची जनहितार्थ याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.

आमदार कांदे यांनीच याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. दरम्यान, ३० ऑगस्ट रोजी सुनावणीसाठी विमा कंपनीने म्हणणे मांडले नाही तर त्यांच्या अनुपस्थितीत सुनावणी घेऊन, पुढील योग्य आदेश निर्गमित करण्यात येतील अशी तंबी न्यायालयाने दिल्याने या याचिकेविषयी औत्सुक्य निर्माण झाले आहे. मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायाधीश जी. एस. कुलकर्णी यांच्या पीठापुढे हा दावा सुरू आहे.

सन २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. १ कोटी ९८ लाख ६४ हजार ७८५ रुपयांचा प्रीमियम भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात नुकसान भरपाईची काही लाखांची रक्कम आली. नांदगाव तालुक्यातील ३०५८५ पैकी २३४६६ (७६.७%) जणांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा झालीच नाही. शेतकऱ्याने भरलेल्या प्रीमियममध्ये केंद्र व राज्य सरकारचे योगदान सुमारे ४० टक्के असते.

मोजक्याच लोकांना भारती अक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीने विम्याची रक्कम अदा केल्याने, उर्वरित मोठ्या संख्येच्या मनात ‘पुढचा नंबर’ आपलाच अशी आशा निर्माण करून मनोविज्ञानाचा खेळ खेळला. या खेळात हळूहळू विमाधारक विमा कंपनीचा नाद सोडून देतील आणि विम्याची रक्कम अदा करण्याचे टाळता येईल. या भ्रमात असलेल्या विमा कंपनीला न्यायालयात खेचून शेतकरी वर्गाला न्याय देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती कांदे यांनी दिली. विमा कंपनीने १०० कोटींची विमा रक्कम अदा केली नसल्याचा दावा त्यांनी केला.

इन्फो

असमान वाटप

या प्रकरणाचा तळापर्यंत शोध घेतांना अनेक बाबी उजेडात आल्या. त्यात शेतीच्या बांधाच्या एका बाजूच्या पिकाला नुकसान भरपाई देण्यात आली आहे आणि दुसऱ्या बाजूला ती देण्यात आलेली नाही. विमा कंपनीकडे दोघांची सारखीच कागदपत्रे जमा आहेत. आमदार कांदे यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून भरपाई मिळालेले व न मिळालेले शेतकरी यांच्या याद्या घेऊन स्वत: उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. संदर्भित विमा कंपनीने असमान न्यायाने वागून व औचित्याचा भंग करून हजारो शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित ठेवल्याचे कागदोपत्री पुरावे सादर केले. भारत व राज्य सरकारने शेतकरी हितार्थ अदा केलेली प्रीमियमची कोट्यवधी रुपयांची रक्कम हा करदात्यांचा पैसा आहे. याकडे लक्ष वेधले.

इन्फो

ठळक मुद्दे....

१) ३०५८५ शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे १९,८२५.४३ हेक्टर क्षेत्रावरचे पीक नष्ट झाले म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी विमा कंपनीकडे मागणी केली होती.

२) दाव्यात विमा कंपनीसह भारत सरकार व राज्य सरकार यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

३) २०२१ च्या खरीप हंगामापर्यंत विम्याचा परतावा आलेला नाही.

४) शेतकरी हितासाठी स्वखर्चाने आमदार सुहास कांदे यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला.

५) फसवणुकीचा तक्रार अर्ज पोलीस अधीक्षक व नांदगाव पोलीस ठाण्यात दाखल

फोटो- १६ विमा

160821\16nsk_14_16082021_13.jpg

फोटो- १६ विमा