शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

येवल्यात जनता कर्फ्यूस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 17:52 IST

उद्यापर्यंत बंद : व्यापारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठळक मुद्देदवाखाने, औषध दुकाने वगळता इतर सर्वच व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून जनता कर्फ्यूस पाठींबा दिला

येवला : शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या प्रशासनासह शहरवासियांसाठी चिंतेची बाब ठरली असल्याने या पार्श्वभूमीवर शहरात मंगळवा (दि.२३) पासून जनता कफ्यू पाळण्यास सुरूवात झाली आहे. मंगळवार ते गुरूवार असे सलग तीन दिवस जनता कर्फ्यू सुरू राहणार असून त्यास शहरातील सर्वच व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली आहेत.अनलॉक सुरू झाल्यानंतर शासकीय निर्देशानुसार वेळेच्या बंधनासह इतर विविध नियमांबाबत काय, कुठे व कसे सुरू राहिल याबाबत पालिका मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांनी आदेश जारी केले होते. दरम्यान, गेल्या आठवड्यात शहरातील सम-विषम व वेळेबाबत व्यापारी संघटना प्रतिनिधींनी प्रांताधिकारी यांचेसह संबंधीत अधिकाऱ्यांची भेट घेवून वेळ वाढवून मिळावा व सम-विषम रद्द करण्यात यावे अशी मागणी केली होती. यानंतर शहरात व्यापारी व शहरवासीयांमध्ये गोंधळ निर्माण झाला असता, अधिकारीवर्गाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणेच दुकानांसाठी वेळ व सम-विषम राहिल असे जाहिर केले होते. दरम्यान, व्यापाºयांच्या बैठकीत शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार विविध व्यवसायिकांच्या संघटनांकडून दि. २३ ते २५ जून रोजी जनता कर्फ्यूची अंमलबजावणी करण्याचे जाहीर करण्यात आले. दवाखाने, औषध दुकाने वगळता इतर सर्वच व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून जनता कर्फ्यूस पाठींबा दिला. तर भाजीपाला विक्र ेते, किराणा व्यावसायिकही कर्फ्यूत सहभागी झाले होते. शहरातील बाजारपेठेसह मुख्य भागात शुकशुकाट दिसून आला.