शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

ओतूर, श्रीभुवन धरणासाठी अर्थसंकल्पात तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:15 IST

राज्याच्या अर्थसंकल्पात तालुक्यातील सप्तशृंगी गडावरील पाणी टंचाई व इतर विकास कामासाठी तसेच ओतूर व श्रीभुवन प्रकल्पासाठी भरीव ...

राज्याच्या अर्थसंकल्पात तालुक्यातील सप्तशृंगी गडावरील पाणी टंचाई व इतर विकास कामासाठी तसेच ओतूर व श्रीभुवन प्रकल्पासाठी भरीव तरतूद केल्यामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे.

ऑगस्ट २०२० मध्ये जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभागाचे सचिव, मुख्य अभियंता व अधिकाऱ्यांच्या बैठकीत ओतूर धरणाच्या दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याचे निर्देश दिले होते तर श्रीभुवन लघुपाटबंधारे प्रकल्पाची नोव्हेंबर २०२० मध्ये जयंत पाटील यांनी पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी श्रीभुवन परिसरातील पाणी प्रश्नांची सोडवणूक करण्याची ग्वाही दिली होती. ओतूर धरणाचा जुना सांडवा तोडून नव्याने काँक्रिटमध्ये सांडवा बांधण्यात येणार असून नवीन धरणासाठी जुन्या धरणाचे मटेरियल न वापरता नवीन गुणवत्तेचे साधन- साहित्य वापरण्यात येणार आहे. नवीन ओतूर धरण पूर्ण लांबीत नव्याने करण्यात येणार असून त्यासाठी ३९ कोटी २८ लाख रुपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ओतूर धरणातील अवैशिष्ट कामे, शिल्लक कामे,विशेष दुरुस्ती अंतर्गत अर्थसंकल्पात विशेष दुरुस्तीसाठी ४ कोटी रुपयांची ठोक तरतूद करण्यात आली आहे. श्रीभुवन प्रकल्प नवीन असून प्रकल्पाची किंमत ३३ कोटी रुपये आहे. अर्थसंकल्पात ५ कोटी रुपयांची तरतूद केल्याने प्रकल्पाच्या कामास गती मिळणार आहे. या प्रकल्पामुळे २.४० दशलक्ष घनफूट पाणीसाठा होणार असून २२६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

इन्फो

ओतूर धरण एक कहाणी

ओतूर धरणाची मूळ प्रशासकीय मान्यता सन १९७१ मध्ये मिळून धरणाच्या कामास १९७२ मध्ये सुरुवात झाली होती. १९७६ मध्ये हे धरण पूर्ण झाले. त्यावेळी प्रकल्पासाठी ३७ लाख रुपये खर्च झाला होता.

१९७७ पासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरु झाली. त्यामुळे स्व. ए. टी. पवार यांनी गळती प्रतिबंधक दुरुस्ती कामास २०११ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळवली. त्याअनुषंगिक कामांसाठी ७ कोटी १२ लाख रुपये मंजूर केले. २४ महिने मुदतीत धरण पूर्ण करण्याचे निर्देश होते मात्र काहीही काम न होता

प्रकल्पावर १ कोटी ८ लाख रुपये खर्च झाला. धरणाचे काम गेल्या ६ वर्षांपासून ठप्प आहे. आता अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याने पुन्हा एकदा आशा पल्लवित झाल्या आहेत.