शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

ओतूर, श्रीभुवन धरणासाठी अर्थसंकल्पात तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:15 IST

राज्याच्या अर्थसंकल्पात तालुक्यातील सप्तशृंगी गडावरील पाणी टंचाई व इतर विकास कामासाठी तसेच ओतूर व श्रीभुवन प्रकल्पासाठी भरीव ...

राज्याच्या अर्थसंकल्पात तालुक्यातील सप्तशृंगी गडावरील पाणी टंचाई व इतर विकास कामासाठी तसेच ओतूर व श्रीभुवन प्रकल्पासाठी भरीव तरतूद केल्यामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे.

ऑगस्ट २०२० मध्ये जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभागाचे सचिव, मुख्य अभियंता व अधिकाऱ्यांच्या बैठकीत ओतूर धरणाच्या दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याचे निर्देश दिले होते तर श्रीभुवन लघुपाटबंधारे प्रकल्पाची नोव्हेंबर २०२० मध्ये जयंत पाटील यांनी पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी श्रीभुवन परिसरातील पाणी प्रश्नांची सोडवणूक करण्याची ग्वाही दिली होती. ओतूर धरणाचा जुना सांडवा तोडून नव्याने काँक्रिटमध्ये सांडवा बांधण्यात येणार असून नवीन धरणासाठी जुन्या धरणाचे मटेरियल न वापरता नवीन गुणवत्तेचे साधन- साहित्य वापरण्यात येणार आहे. नवीन ओतूर धरण पूर्ण लांबीत नव्याने करण्यात येणार असून त्यासाठी ३९ कोटी २८ लाख रुपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ओतूर धरणातील अवैशिष्ट कामे, शिल्लक कामे,विशेष दुरुस्ती अंतर्गत अर्थसंकल्पात विशेष दुरुस्तीसाठी ४ कोटी रुपयांची ठोक तरतूद करण्यात आली आहे. श्रीभुवन प्रकल्प नवीन असून प्रकल्पाची किंमत ३३ कोटी रुपये आहे. अर्थसंकल्पात ५ कोटी रुपयांची तरतूद केल्याने प्रकल्पाच्या कामास गती मिळणार आहे. या प्रकल्पामुळे २.४० दशलक्ष घनफूट पाणीसाठा होणार असून २२६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

इन्फो

ओतूर धरण एक कहाणी

ओतूर धरणाची मूळ प्रशासकीय मान्यता सन १९७१ मध्ये मिळून धरणाच्या कामास १९७२ मध्ये सुरुवात झाली होती. १९७६ मध्ये हे धरण पूर्ण झाले. त्यावेळी प्रकल्पासाठी ३७ लाख रुपये खर्च झाला होता.

१९७७ पासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरु झाली. त्यामुळे स्व. ए. टी. पवार यांनी गळती प्रतिबंधक दुरुस्ती कामास २०११ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळवली. त्याअनुषंगिक कामांसाठी ७ कोटी १२ लाख रुपये मंजूर केले. २४ महिने मुदतीत धरण पूर्ण करण्याचे निर्देश होते मात्र काहीही काम न होता

प्रकल्पावर १ कोटी ८ लाख रुपये खर्च झाला. धरणाचे काम गेल्या ६ वर्षांपासून ठप्प आहे. आता अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याने पुन्हा एकदा आशा पल्लवित झाल्या आहेत.