शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

वीरता सिद्ध करणे म्हणजे जिंकणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 18:33 IST

मानिसक आणि वैचारिक दुर्बलता काढून टाकल्याशिवाय जिंकणारा समाज निर्माण होणार नाही. समाजातील एखाद्याचे कौशल्य, वीरता सिद्ध करता येण म्हणजे जिंकण होय. ज्या दिवशी ही वीरता सिद्ध होईल तेव्हा त्याच्या पायावर संपूर्ण समाज नतमस्तक होतो, असे मत विद्या वाचस्पती विवेक घळसासी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देविवेक घळसासी धामणे दांपत्यास यंदाचा वसंत गौरव

सटाणा : मानिसक आणि वैचारिक दुर्बलता काढून टाकल्याशिवाय जिंकणारा समाज निर्माण होणार नाही. समाजातील एखाद्याचे कौशल्य, वीरता सिद्ध करता येण म्हणजे जिंकण होय. ज्या दिवशी ही वीरता सिद्ध होईल तेव्हा त्याच्या पायावर संपूर्ण समाज नतमस्तक होतो, असे मत विद्या वाचस्पती विवेक घळसासी यांनी व्यक्त केले.येथील सहकारमहर्षी कै. वसंतराव दगाजी पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पाटील चेरीटेबल ट्रस्टतर्फे दगाजी चित्रमंदिरमध्ये आयोजित वसंत व्याख्यानमालेत जिंकणारा समाज घडविण्यासाठी या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना घळसासी बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष सुनील मोरे उपस्थित होते. अनुकूलतेवरच विजयाचे गणित अवलंबून असते. सामाजिकतेच्या भ्रामक कल्पनेतील विकृती माणसाला जिंकू देत नाहीत. पराभूत मानिसकतेतून माणसाने जिंकण्याची इच्छा धारण केली पाहिजे असे सांगून घळसासी पुढे म्हणाले की, जिंकणारा समाज निर्माण करताना पहिल्यांदा आपल्या डोक्यात भरलेल्या जाणीवपूर्वक उणीवा टाकून दिल्या पाहिजेत. अिस्तत्वाची मशाल पेटवताना आम्ही विकिसत होण्यासाठी जन्माला आलो आहोत, असे समाजमन तयार होण्याची गरज आहे. दीड हजार वर्षांपासून आपण अंधाराची चर्चा करत बसलो तर प्रकाशाचे स्वप्न पडणार कधी ? कोणतीही सेवा शोषण नाही. सेवा सामर्थ्याची गोष्ट बनू शकते. मनुष्याला पापाची निर्मिती मानणारे समाज घडवू शकत नाही. त्यासाठी मानिसक, वैचारिक दौर्बल्य फेकून दिले पाहिजे. विकृतीयुक्त समाज व भेदाभेदांच्या भिंती समाजात उभ्या राहिल्यानेच हरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आपल्या समाजाची विकृती, दुर्बलता शोधत राहिलो तर जिंकण्याचे उत्तर कधीही सापडणार नाही, असेही घळसासी यांनी स्पष्ट केले.ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी प्रास्ताविक करून आभार मानले. कार्यक्र मास द्वारकाबाई पाटील, डॉ. शुभदा माजगावकर, डॉ. सौ. शहा, डॉ. सौ. येवलकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, प्रल्हाद पाटील, कल्याणराव भोसले, बाळासाहेब मराठे, व्ही. डी. सोनवणे, दि. शं. सोनवणे, प्रा. बी. डी. बोरसे, विश्वास चंद्रात्रे, डॉ. विजया पाटील, मनीषा पाटील, अनुराधा मराठे, सरोज चंद्रात्रे, समीर पाटील, आदींउपस्थित होते. प्रा. जितेंद्र मेतकर यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :cultureसांस्कृतिक