शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

आमदारांच्या घरांवर आंदोलकांची धडक

By admin | Updated: November 3, 2015 23:21 IST

पाणीप्रश्नी सर्वपक्ष एकवटले : सानप, फरांदेंकडे घंटानाद, सीमा हिरेंकडे चहापान

नाशिक : गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याबाबत सर्वपक्ष एकवटले असताना भाजपा आमदारांनी सोईस्कररीत्या मौन बाळगल्याने त्यांना ‘जागते’ करण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने शहरातील तीनही भाजपा आमदारांच्या निवासस्थानी धडक मारली. आमदार बाळासाहेब सानप आणि आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या घरासमोर घंटानाद करीत आंदोलकांनी घोषणाबाजी केली, तर आमदार सीमा हिरे यांच्या घरासमोर घंटानाद होण्यापूर्वीच हिरे यांनी आंदोलकांना सामोरे जात आपणही नाशिककरांबरोबरच असल्याची नि:संदिग्ध ग्वाही दिली. शिवाय मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बुधवारी शिष्टमंडळ घेऊन जाण्याचेही स्पष्ट केले. जायकवाडीसाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा मुद्दा पेटला असताना स्थानिक सत्ताधारी आमदार मात्र मौन बाळगून असल्याने त्यांना जागे करण्यासाठी आणि पाणीप्रश्नाची तीव्रता लक्षात आणून देण्यासाठी भाजपावगळता सर्वपक्षीय कृती समितीने तीनही आमदारांच्या घरांसमोर घंटानाद आंदोलन करण्याचे सोमवारी जाहीर केले होते. त्यानुसार सकाळी पुन्हा एकदा महापौरांच्या ‘रामायण’ निवासस्थानी सर्व पक्षांचे पदाधिकारी यांनी एकत्र येत प्रारंभी पंचवटीत पूर्व विभागाचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या कृष्णनगर येथील निवासस्थानाकडे कूच केले. सानप यांच्या निवासस्थानवजा संपर्क कार्यालयासमोर सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी घंटानाद करीत प्रचंड घोषणाबाजी केली. ‘नाशिकचे पाणी पळविणाऱ्या भाजपा सरकारचा धिक्कार असो’, ‘भाजपा सरकार हाय हाय’, ‘मुख्यमंत्री-पालकमंत्री हाय हाय’, ‘जागे व्हा, आमदारसाहेब जागे व्हा’ या घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. सानप मात्र निवासस्थानी उपस्थित नव्हते.

हिरे यांनी साधले टायमिंग

सीमा हिरे यांनी स्थानिक अन्य भाजपा आमदारांच्या भूमिकेला छेद देत यापूर्वीही मुकणे पाणीप्रश्नी टायमिंग साधले होते. फरांदे व सानप हे दोघे मुकणे पाणीप्रश्नी वेगळी भूमिका मांडत असताना हिरे यांनी प्रारंभापासूनच मुकणे प्रकल्पाचे समर्थन केले होते. आताही पाणीप्रश्न पेटला असताना फरांदे व सानप यांच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही परंतु आमदार सीमा हिरे यांनी घरासमोर घंटा वाजण्यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट करत पुन्हा एकदा टायमिंग साधले. यावेळी आंदोलकांनीही हिरे या एकमेव आमदार नाशिककरांच्या बाजूने असल्याचे सांगत त्यांचे आभार मानले आणि सरकारदरबारी नाशिककरांची वकिली करण्याची विनंती केली.

आज मुख्यमंत्र्यांना भेटणार

आमदार बाळासाहेब सानप हे निवासस्थानी उपस्थित नव्हते, तर आमदार फरांदे या अद्याप विदेश दौऱ्यावरून परतल्या नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, आमदार सीमा हिरे यांनी आंदोलकांना सामोरे जात आपली भूमिका स्पष्ट केली. हिरे यांनी सांगितले, पाणीप्रश्नी मी नाशिककरां- सोबतच असून मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. बुधवारी (दि. ४) सर्वपक्षीय शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती कथन केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत नाशिकचे हक्काचे पाणी बाहेर जाऊ दिले जाणार नसल्याची ग्वाही देतानाच हिरे यांनी रामकुंडात ठाण मांडून आंदोलन करण्याची तयारीही दर्शविली.