शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

संरक्षित मंदिरांचा ठेवा ढासळला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:55 IST

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या अंजनेरी गावातील सुमारे एक हजार वर्षांहून अधिक प्राचीन हेमाडपंती जैन व हिंदू मंदिरांचा दुर्मीळ ठेवा नामशेष होत आहे. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिरांच्या संरक्षणासाठी आणि या वास्तू जतन करण्यासाठी गेल्या वर्षी सुमारे १६ कोटी ७५ लाखांचा निधी केंद्राकडून मंजूर करण्यात आला आहे

अझहर शेख ।त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या अंजनेरी गावातील सुमारे एक हजार वर्षांहून अधिक प्राचीन हेमाडपंती जैन व हिंदू मंदिरांचा दुर्मीळ ठेवा नामशेष होत आहे. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिरांच्या संरक्षणासाठी आणि या वास्तू जतन करण्यासाठी गेल्या वर्षी सुमारे १६ कोटी ७५ लाखांचा निधी केंद्राकडून मंजूर करण्यात आला आहे; मात्र अद्यापही कामाला सुरुवात झालेली नाही. येथील १६ अत्यंत दुर्मिळ अशा हेमाडपंती मंदिरांच्या पुनर्विकासाच्या कामाला अजूनही मुहूर्त मिळत नसल्याने मंदिरांची पडझड मोठ्या प्रमाणात सुरूच आहे.रामायणात अंजनीपुत्र हनुमानाचे जन्मस्थळ होण्याचा अभिमान बाळगणाºया तर यादवकाळात त्या क्षेत्राच्या राजधानीचा नावलौकिक तीर्थक्षेत्र अंजनेरी गावाने मिळविला आहे. येथील सुमारे एक हजार वर्षांहून अधिक पुरातन हेमाडपंती मंदिरे अखेरच्या घटका मोजत आजही इतिहासाचे साक्षीदार म्हणून लक्ष वेधून घेतात; मात्र भारतीय पुरातत्व खात्याचे अद्याप या मंदिरांकडे लक्ष न गेल्यामुळे संरक्षित वारसा म्हणून घोषित केलेल्या व बांधकामाच्या दृष्टीने अत्यंत नाजूक समजल्या जाणाºया मंदिरांची पडझड पुरातत्व विभागाच्या संरक्षण कुंपणामध्येच सुरू आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या अंजनगिरी पर्वतरांगेच्या कुशीत वसलेल्या अंजनेरी गावात प्राचीन हेमाडपंती स्थापत्यकलेचा नमुना या मंदिरांच्या रुपाने आजही पहावयास मिळतो. पावसाळ्यात निसर्गाची मुक्त हस्ते होणारी सौंदर्याची उधळण आणि धरणीने पांघारलेला हिरवा शालू व अंजनगिरीवर होणारा पावसाच्या सरींचा जलाभिषेक अशा निसर्गरम्या वातावरणात आजच्या तरुणपिढीला जीर्ण व पडझड झालेल्या मंदिरांच्या दुर्मीळ स्थापत्यकलेसोबत ‘सेल्फी’चा मोह आवरणे शक्य होत नाही. पर्यटकांसह तरुणाईचे येथे गर्दी लोटते. आगळ्या वेगळ्या बांधकाम शैलीमधील जैन व हिंदू मंदिरांचा दुर्मीळ ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्र्यंबकेश्वरपासून सहा किलोमीटर अलीकडे असलेले अंजनेरी तीर्थक्षेत्र एकेकाळी जैन धर्मीय समाजबांधवांची वसाहत म्हणूनदेखील ओळखले जात होते. या अंजनेरी गावाच्या वेशीवर असलेल्या विविध जैन व हिंदू धर्मीय हेमाडपंती पुरातन मंदिरे आजही गौरवशाली धार्मिक इतिहासाची साक्ष देतात. येथील मंदिरांमध्ये आढळलेल्या शिलालेखावरील उल्लेखानुसार इसवी सन ११४२ (शके १०६३)मध्ये यादवकालीन राजाच्या एका मंत्र्याकडून येथील पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धाराचा प्रयत्न झाल्याचे पुरावे आढळतात. तसेच १७०८ साली जेव्हा अंजनेरी राजधानी मराठा पेशव्यांच्या साम्राज्यात विलीन झाली तेव्हादेखील येथील मंदिरांच्या विकासाचा प्रयत्न झाल्याचे बोलले जाते.