शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

संरक्षित मंदिरांचा ठेवा ढासळला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:55 IST

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या अंजनेरी गावातील सुमारे एक हजार वर्षांहून अधिक प्राचीन हेमाडपंती जैन व हिंदू मंदिरांचा दुर्मीळ ठेवा नामशेष होत आहे. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिरांच्या संरक्षणासाठी आणि या वास्तू जतन करण्यासाठी गेल्या वर्षी सुमारे १६ कोटी ७५ लाखांचा निधी केंद्राकडून मंजूर करण्यात आला आहे

अझहर शेख ।त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या अंजनेरी गावातील सुमारे एक हजार वर्षांहून अधिक प्राचीन हेमाडपंती जैन व हिंदू मंदिरांचा दुर्मीळ ठेवा नामशेष होत आहे. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिरांच्या संरक्षणासाठी आणि या वास्तू जतन करण्यासाठी गेल्या वर्षी सुमारे १६ कोटी ७५ लाखांचा निधी केंद्राकडून मंजूर करण्यात आला आहे; मात्र अद्यापही कामाला सुरुवात झालेली नाही. येथील १६ अत्यंत दुर्मिळ अशा हेमाडपंती मंदिरांच्या पुनर्विकासाच्या कामाला अजूनही मुहूर्त मिळत नसल्याने मंदिरांची पडझड मोठ्या प्रमाणात सुरूच आहे.रामायणात अंजनीपुत्र हनुमानाचे जन्मस्थळ होण्याचा अभिमान बाळगणाºया तर यादवकाळात त्या क्षेत्राच्या राजधानीचा नावलौकिक तीर्थक्षेत्र अंजनेरी गावाने मिळविला आहे. येथील सुमारे एक हजार वर्षांहून अधिक पुरातन हेमाडपंती मंदिरे अखेरच्या घटका मोजत आजही इतिहासाचे साक्षीदार म्हणून लक्ष वेधून घेतात; मात्र भारतीय पुरातत्व खात्याचे अद्याप या मंदिरांकडे लक्ष न गेल्यामुळे संरक्षित वारसा म्हणून घोषित केलेल्या व बांधकामाच्या दृष्टीने अत्यंत नाजूक समजल्या जाणाºया मंदिरांची पडझड पुरातत्व विभागाच्या संरक्षण कुंपणामध्येच सुरू आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या अंजनगिरी पर्वतरांगेच्या कुशीत वसलेल्या अंजनेरी गावात प्राचीन हेमाडपंती स्थापत्यकलेचा नमुना या मंदिरांच्या रुपाने आजही पहावयास मिळतो. पावसाळ्यात निसर्गाची मुक्त हस्ते होणारी सौंदर्याची उधळण आणि धरणीने पांघारलेला हिरवा शालू व अंजनगिरीवर होणारा पावसाच्या सरींचा जलाभिषेक अशा निसर्गरम्या वातावरणात आजच्या तरुणपिढीला जीर्ण व पडझड झालेल्या मंदिरांच्या दुर्मीळ स्थापत्यकलेसोबत ‘सेल्फी’चा मोह आवरणे शक्य होत नाही. पर्यटकांसह तरुणाईचे येथे गर्दी लोटते. आगळ्या वेगळ्या बांधकाम शैलीमधील जैन व हिंदू मंदिरांचा दुर्मीळ ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्र्यंबकेश्वरपासून सहा किलोमीटर अलीकडे असलेले अंजनेरी तीर्थक्षेत्र एकेकाळी जैन धर्मीय समाजबांधवांची वसाहत म्हणूनदेखील ओळखले जात होते. या अंजनेरी गावाच्या वेशीवर असलेल्या विविध जैन व हिंदू धर्मीय हेमाडपंती पुरातन मंदिरे आजही गौरवशाली धार्मिक इतिहासाची साक्ष देतात. येथील मंदिरांमध्ये आढळलेल्या शिलालेखावरील उल्लेखानुसार इसवी सन ११४२ (शके १०६३)मध्ये यादवकालीन राजाच्या एका मंत्र्याकडून येथील पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धाराचा प्रयत्न झाल्याचे पुरावे आढळतात. तसेच १७०८ साली जेव्हा अंजनेरी राजधानी मराठा पेशव्यांच्या साम्राज्यात विलीन झाली तेव्हादेखील येथील मंदिरांच्या विकासाचा प्रयत्न झाल्याचे बोलले जाते.