शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

अल्पसंख्याकांना संरक्षण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:18 IST

नाशिक : देशातील विविध भागांत गोरक्षणाच्या नावाखाली दलित, मुस्लीम व अन्य अल्पसंख्याक समुदायाच्या नागरिकांवर हल्ले होत असल्याने अल्पसंख्याकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्यामध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी हल्लेखोरांवर मोकोको कायद्याअंतर्गत कारवाई करून अल्पसंख्याकांना संरक्षण देण्याची मागणी मालेगावचे आमदार तथा इन्सानियत बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष असिफ शेख यांनी केली आहे.

नाशिक : देशातील विविध भागांत गोरक्षणाच्या नावाखाली दलित, मुस्लीम व अन्य अल्पसंख्याक समुदायाच्या नागरिकांवर हल्ले होत असल्याने अल्पसंख्याकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्यामध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी हल्लेखोरांवर मोकोको कायद्याअंतर्गत कारवाई करून अल्पसंख्याकांना संरक्षण देण्याची मागणी मालेगावचे आमदार तथा इन्सानियत बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष असिफ शेख यांनी केली आहे.  आमदार रशिद शेख यांच्या नेतृत्वात इन्सानियत बचाव, लोकशाही बचाव संघर्ष समितीने मालेगाव ते नाशिक पदयात्रा काढून देशभरातील अल्पसंख्याकांवर होणाºया हल्ल्यांचा निषेध नोंदवला. तसेच हल्लेखोरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाºयांना निवेदनही देण्यात आले. या निवेदनाच्या माध्यमातून हाफिज जुनैद याची रेल्वेमध्ये हत्या झाल्याने अल्पसंख्याक समुदायामध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.मालेगाव येथील शहीद चौैकातून १५ आॅगस्ट रोजी काढलेली पदयात्रा सुमारे ११० कि लोमीटर अंतर चालून शनिवारी (दि.१९) नाशिक येथील हुतात्मा स्मारकात पोहोचली. या भगवान आढाव, लतिफ बागवान, विठ्ठल बर्वे, अब्दुल कय्यम, शहजाद अख्तर, अब्दुल सिद्दीकी यांच्यासह नाशिकमधील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंत हुदलीकर, पंडित येलमामे, दगडूशा कलाल, सरस्वती पाटील, सरस्वती मोरे, विमल अचावणे यांनीही सहभाग घेतला. तसेच काँगेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, हेमलता पाटील, बबलू खैरे यांच्यासह छात्रभारतीचे सागर निकम, समाधान बागुल, मंगेश साबळे आदींनीही या पदयात्रेत सहभाग घेतला.प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी गोरक्षणाच्या नावाखाली मुस्लीम व दलित समुदायांवर हल्ले करून काही पक्ष व जातीयवादी संघटना एकधर्मी राष्ट्र निर्माण करू पाहत आहेत. असे प्रकार थांबविण्यासाठी संसदेत व विधिमंडळात कडक कायदा अस्तित्वात आणण्याच्या मागणीसह अशा संघटनांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणीही यावेळी पदयात्रेत सहभागी झालेल्या आंदोलकांनी केली. आंदोलकांचा ठिय्याच्मालेगाव येथून पदयात्रेने नाशिकपर्यंत आलेल्या इन्सानियत बचाव संघर्ष समितीच्या आंदोलकांनी थेट जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्याचा आग्रह केला. परंतु, जिल्हाधिकारी उपलब्ध नसल्याने आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातच ठिय्या आंदोलन सुरू केले. अखेर निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी मध्यस्थी करून निवेदन स्वीकारून तिढा सोडवला.