शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कवितांचा सुकाळ; गझलचा दुष्काळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:25 IST

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणाऱ्या कवी कट्ट्यासाठी राज्यासह राज्याबाहेरुन देखील कवितांचा जबरदस्त ओघ सुरू झाला ...

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणाऱ्या कवी कट्ट्यासाठी राज्यासह राज्याबाहेरुन देखील कवितांचा जबरदस्त ओघ सुरू झाला आहे. मात्र, यंदाच्या वर्षापासून प्रथमच सुरू करण्यात येणाऱ्या गझल काव्य वाचनासाठी मात्र अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने आयोजक देखील चिंतेत पडले आहेत. त्यामुळेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अधिकाधिक गझल पाठविण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

संमेलनाच्या आयोजकांकडे गत महिनाभरात प्राप्त झालेल्या रचनांमध्ये कवितांचे प्रमाण हजारात तर गझलांचा टक्का मात्र अत्यल्प आहे. फेब्रुवारीच्या पूर्वार्धापर्यंत आलेल्या हजारभर कवितांमधे गझलांचे प्रमाण फक्त पन्नास होते. येणाऱ्या गझलांच्या दर्जाबाबत निवड समिती दक्ष असल्याने त्यांनी निवड प्रक्रियेबाबत काही नियमदेखील केले आहेत. आयोजकांकडे पाठविण्यात येणारी कविता,गझल स्वरचितच असावी, एका कवीने एकच गझल पाठवावी. तसेच प्रत्येक कवीला सादरीकरणाला तीन मिनिटे वेळ निश्चित करण्यात आलेला असल्याने संबंधित रचना आटोपशीर असावी असेही नियम घालून देण्यात आले आहेत. तसेच गझल ई मेलद्वारे पाठवताना कविते खालीच आपले नाव, पत्ता, ई मेल आयडी ,मोबाईल नंबर अशी माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर कविता पोस्टाने पाठविताना पाकिटावर कवी कट्टा असा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

इन्फो

गझलच्या स्वतंत्र सत्रासाठी प्रयास

या भव्य सोहळ्यात काव्यवाचन कार्यक्रमात ‘गझल’ हे आकर्षण केंद्र कसे राहील, यासाठी आयोजक प्रयत्नशील आहेत. पुरेशा प्रमाणात चांगल्या दर्जाच्या गझल प्राप्त झाल्यास गझल काव्य प्रकाराचे स्वतंत्र सत्र कसे घेता येईल, यासाठी आयोजन समिती प्रयत्न करीत आहे. त्यामुळे येणाऱ्या गझलांच्या दर्जात्मक निवडीसाठी स्वतंत्र ‘गझल निवड समिती’ नियुक्त करण्यात आली आहे. ही गझल समिती ज्या गझलांची निवड करेल, त्यांनाच सादरीकरणाची संधी मिळू शकणार आहे.

लोगो

साहित्य संमेलन लोगो वापरावा.