शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

कवितांचा सुकाळ; गझलचा दुष्काळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:25 IST

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणाऱ्या कवी कट्ट्यासाठी राज्यासह राज्याबाहेरुन देखील कवितांचा जबरदस्त ओघ सुरू झाला ...

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणाऱ्या कवी कट्ट्यासाठी राज्यासह राज्याबाहेरुन देखील कवितांचा जबरदस्त ओघ सुरू झाला आहे. मात्र, यंदाच्या वर्षापासून प्रथमच सुरू करण्यात येणाऱ्या गझल काव्य वाचनासाठी मात्र अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने आयोजक देखील चिंतेत पडले आहेत. त्यामुळेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अधिकाधिक गझल पाठविण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

संमेलनाच्या आयोजकांकडे गत महिनाभरात प्राप्त झालेल्या रचनांमध्ये कवितांचे प्रमाण हजारात तर गझलांचा टक्का मात्र अत्यल्प आहे. फेब्रुवारीच्या पूर्वार्धापर्यंत आलेल्या हजारभर कवितांमधे गझलांचे प्रमाण फक्त पन्नास होते. येणाऱ्या गझलांच्या दर्जाबाबत निवड समिती दक्ष असल्याने त्यांनी निवड प्रक्रियेबाबत काही नियमदेखील केले आहेत. आयोजकांकडे पाठविण्यात येणारी कविता,गझल स्वरचितच असावी, एका कवीने एकच गझल पाठवावी. तसेच प्रत्येक कवीला सादरीकरणाला तीन मिनिटे वेळ निश्चित करण्यात आलेला असल्याने संबंधित रचना आटोपशीर असावी असेही नियम घालून देण्यात आले आहेत. तसेच गझल ई मेलद्वारे पाठवताना कविते खालीच आपले नाव, पत्ता, ई मेल आयडी ,मोबाईल नंबर अशी माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर कविता पोस्टाने पाठविताना पाकिटावर कवी कट्टा असा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

इन्फो

गझलच्या स्वतंत्र सत्रासाठी प्रयास

या भव्य सोहळ्यात काव्यवाचन कार्यक्रमात ‘गझल’ हे आकर्षण केंद्र कसे राहील, यासाठी आयोजक प्रयत्नशील आहेत. पुरेशा प्रमाणात चांगल्या दर्जाच्या गझल प्राप्त झाल्यास गझल काव्य प्रकाराचे स्वतंत्र सत्र कसे घेता येईल, यासाठी आयोजन समिती प्रयत्न करीत आहे. त्यामुळे येणाऱ्या गझलांच्या दर्जात्मक निवडीसाठी स्वतंत्र ‘गझल निवड समिती’ नियुक्त करण्यात आली आहे. ही गझल समिती ज्या गझलांची निवड करेल, त्यांनाच सादरीकरणाची संधी मिळू शकणार आहे.

लोगो

साहित्य संमेलन लोगो वापरावा.