शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

कवितांचा सुकाळ; गझलचा दुष्काळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:25 IST

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणाऱ्या कवी कट्ट्यासाठी राज्यासह राज्याबाहेरुन देखील कवितांचा जबरदस्त ओघ सुरू झाला ...

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणाऱ्या कवी कट्ट्यासाठी राज्यासह राज्याबाहेरुन देखील कवितांचा जबरदस्त ओघ सुरू झाला आहे. मात्र, यंदाच्या वर्षापासून प्रथमच सुरू करण्यात येणाऱ्या गझल काव्य वाचनासाठी मात्र अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने आयोजक देखील चिंतेत पडले आहेत. त्यामुळेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अधिकाधिक गझल पाठविण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

संमेलनाच्या आयोजकांकडे गत महिनाभरात प्राप्त झालेल्या रचनांमध्ये कवितांचे प्रमाण हजारात तर गझलांचा टक्का मात्र अत्यल्प आहे. फेब्रुवारीच्या पूर्वार्धापर्यंत आलेल्या हजारभर कवितांमधे गझलांचे प्रमाण फक्त पन्नास होते. येणाऱ्या गझलांच्या दर्जाबाबत निवड समिती दक्ष असल्याने त्यांनी निवड प्रक्रियेबाबत काही नियमदेखील केले आहेत. आयोजकांकडे पाठविण्यात येणारी कविता,गझल स्वरचितच असावी, एका कवीने एकच गझल पाठवावी. तसेच प्रत्येक कवीला सादरीकरणाला तीन मिनिटे वेळ निश्चित करण्यात आलेला असल्याने संबंधित रचना आटोपशीर असावी असेही नियम घालून देण्यात आले आहेत. तसेच गझल ई मेलद्वारे पाठवताना कविते खालीच आपले नाव, पत्ता, ई मेल आयडी ,मोबाईल नंबर अशी माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर कविता पोस्टाने पाठविताना पाकिटावर कवी कट्टा असा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

इन्फो

गझलच्या स्वतंत्र सत्रासाठी प्रयास

या भव्य सोहळ्यात काव्यवाचन कार्यक्रमात ‘गझल’ हे आकर्षण केंद्र कसे राहील, यासाठी आयोजक प्रयत्नशील आहेत. पुरेशा प्रमाणात चांगल्या दर्जाच्या गझल प्राप्त झाल्यास गझल काव्य प्रकाराचे स्वतंत्र सत्र कसे घेता येईल, यासाठी आयोजन समिती प्रयत्न करीत आहे. त्यामुळे येणाऱ्या गझलांच्या दर्जात्मक निवडीसाठी स्वतंत्र ‘गझल निवड समिती’ नियुक्त करण्यात आली आहे. ही गझल समिती ज्या गझलांची निवड करेल, त्यांनाच सादरीकरणाची संधी मिळू शकणार आहे.

लोगो

साहित्य संमेलन लोगो वापरावा.