शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

समृद्धी केंद्र स्थलांतराच्या हालचाली

By admin | Updated: August 20, 2016 00:15 IST

चाचपणी : मऱ्हळ शिवारातील चार गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव

शैलेश कर्पे  सिन्नरमुंबई - नागपूर या महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील गोंदे येथे प्रस्तावित असलेले समृद्धी कृषी विकास केंद्र (नोड) गोंदे ग्रामस्थांचा वाढता विरोध पाहून स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने महसूल विभागाने हालचाली सुरू केल्याचे वृत्त आहे. एकाच गावातील शेकडो हेक्टर क्षेत्र संपादित करण्याऐवजी लगतच्या चार गावांचे थोडे-थोडे क्षेत्र घेऊन ‘नोड’ विकसित होऊ शकतो हा विचार पुढे आला आहे. त्यादृष्टीने सिन्नर तालुक्यातील गोंदेऐवजी मऱ्हळ शिवारातील लगतच्या चार गावांमध्ये समृद्धी कृषी विकास केंद्र (नोड) विकसित करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरु केल्याचे समजते. मुख्यमंत्री फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणून मुंबई-नागपूर या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाकडे पाहिले जात आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गोंदे येथे शेतकरी मेळावा घेऊन या महामार्गाला प्रखर विरोध केला होता. त्यानंतर शेतकरी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली होती. आमदार आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईला गेले होते. त्यामुळे नोडसाठी गोंदे येथील शेतकऱ्यांचा प्रखर विरोध असल्याचे समोर आले होते. शेतकऱ्यांचा प्रखर विरोध लक्षात घेऊन या महामार्गाच्या कामाला ब्रेक लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासह प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, बाळासाहेब वाघचौरे, तहसीलदार मनोजकुमार खैरनार, रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता चिंतामण धोत्रे यांनी मऱ्हळ बुद्रूक व मऱ्हळ खुर्द येथील शेतकऱ्यांची बैठक घेतली होती. त्यात शेतकऱ्यांनी महामार्गाला जमीन देण्यास कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही. रस्त्यासाठी जमिनी देण्यास तयार असल्याचे मऱ्हळ बुद्रूक व खुर्द येथील शेतकऱ्यांनी सांगितले होते. मात्र समृद्धी कृषी विकास केंद्रासाठी जमिनी घेऊ नका, असे शेतकऱ्यांनी सांगितले होते. शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घ्यायचा नाही, असे शासनाचे धोरण असले तरी जमिनी देण्याची शेतकऱ्यांची मानसिकता तयार करण्यासाठी महसूल विभागाने प्रयत्न सुरू केले आहे. तालुक्यातील पूर्व भागातील अवर्षण ग्रस्त मऱ्हळ शिवारातील चार गावे समृद्धी कृषी विकास केंद्रासाठी ६०० ते ८०० हेक्टर क्षेत्र जमिनी देण्यास तयार झाले तर गोंदेऐवजी मऱ्हळ येथे समृद्धी कृषी विकास केंद्र उभारले जावू शकते, असा प्रस्ताव पुढे आल्याचे समजते.