शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

प्रस्ताव : मुलांची संख्या अल्प असल्याचे दिले कारण १०१ अंगणवाड्यांना लागणार टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 01:54 IST

नाशिक : अपुरी पटसंख्या असल्याचे निमित्त करून शहरातील ४१३ पैकी १०१ अंगणवाड्या बंद करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. येत्या महासभेत हा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देप्रस्ताव मांडल्यानंतर लोकप्रतिनिधींनी त्यास विरोधही केलाआता १०१ अंगणवाड्या बंद केल्या जाणार आहेत

नाशिक : अपुरी पटसंख्या असल्याचे निमित्त करून शहरातील ४१३ पैकी १०१ अंगणवाड्या बंद करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. येत्या महासभेत हा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. महापालिकेने आर्थिक बचतीच्या नावाखाली अनेक प्रकारचे निर्णय घेतले आहेत. तथापि, शैक्षणिक खर्चाला कात्री लावण्याच्या निर्णयावर मात्र तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. गेल्याच आठवड्यात मनपाने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ३७ शाळांचे विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर लोकप्रतिनिधींनी त्यास विरोधही केला. शाळा विलीनीकरणामुळे मुलांना दूरच्या शाळेत जावे लागेल, असे मत मांडले जात होते. मात्र आता १०१ अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर चिमुकले कोठे जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत ४१३ अंगणवाड्या चालवल्या जातात. त्यात बारा हजार मुले जातात. त्यातील ७६ अंगणवाड्या खासगी जागेत असून उर्वरित महापालिकेच्या जागेत आहेत. यातील मुलांच्या पटसंख्येचे सर्वेक्षण केल्यानंतर त्यातील १११ अंगणवाड्यांमध्ये ४ ते १४ या दरम्यानच बालकांची संख्या आढळली. त्यातील दहा शाळा वगळून आता १०१ अंगणवाड्या बंद केल्या जाणार आहेत. दहा मुलांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाड्या बंद करून ती मुले जवळच्या अंगणवाड्यांमध्ये स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव असून, त्यांसदर्भातील निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे घेणार आहेत. या निर्णयानंतरच किती अंगणवाड्यांना मुदतवाढ द्यायची यासंदर्भातील प्रस्ताव महासभेवर ठेवला जाणार आहे. सध्या विधान परिषद निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता सुरू असून त्यामुळेच यंदाच्या जून महिन्यापासून या अंगणवाडी बंद होतात की पुढील वर्षीपासून याबाबत निर्णयाची प्रतीक्षा आहे.