शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

चणकापूर उजव्या कालव्याच्या वहनक्षमता वाढीचा प्रस्ताव

By admin | Updated: December 31, 2015 22:14 IST

चणकापूर उजव्या कालव्याच्या वहनक्षमता वाढीचा प्रस्ताव

 देवळा : तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी चणकापूर उजव्या कालव्याच्या वहनक्षमतेत वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला असून, अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात तरतूद करून मार्च महिन्याअखेरपर्यंत हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, अशी माहिती आमदार डॉ. राहुल अहेर यांनी देवळा येथे आयोजित जनता दरबारात दिली. यावेळी तालुक्यातील जनतेने कृषी विभाग, वीज कंपनी, महसूल विभाग आदि विभागांविषयी तक्रारीचा पाढा वाचला. महसूल विभाग, पोलीस ठाणे व जनतेची एक संयुक्तरीत्या गिरणा नदीपात्रातून होणारा अवैध वाळू उपसा बंद करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद कृषी सभापती केदा अहेर, महिला बालकल्याण सभापती उषाताई बच्छाव, सभापती केदा शिरसाठ, उपविभागीय अधिकारी भीमराव दराडे उपस्थित होते. चणकापूर कालव्याची वहनक्षमता वाढविणे, मशाड नाल्याचे पाणी उजव्या कालव्यात टाकणे, रामेश्वर ते झाडीपर्यंतच्या कालव्याच्या कामापैकी ३२ ते ३५ किमीच्या कामाची रद्द झालेली निविदा काढण्यात आली असून, उर्वरित दोन प्रस्तावाना येत्या तीन महिन्याच्या आत मंजुरी मिळवून हाती घेण्यात येणार आहे. आंदोलकर्त्यांनी दहीवडपासून पुढील कालव्याच्या कामास जे अडथळा आणत आहेत त्यांची समजूत काढण्याचे आवाहन यावेळी आमदार अहेर यांनी केले. पाण्यावरून आंदोलनकर्त्यांनी राजकारण करू नये, रामेश्वर धरणावरून कालवा बायपास करण्याची मागणी करून पूर्व व पश्चिम भागातील जनतेत संघर्ष निर्माण करू नये, असेही ते म्हणाले. गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल यंत्रणा, पोलीस व स्थानिक नागरिकांची समिती स्थापन करावी. नदीला पाणी नसेल तर त्यावेळी नदीपात्रात २४ तास बंदोबंस्त ठेवून वाळू चोरी पूर्णपणे थांबविण्याची सूचना आमदार अहेर यांनी संबंधित विभागाला दिल्या. वाखारी येथे अंगणवाडीसेविका भरती प्रक्रियेत एका महिलेवर अन्याय झाल्याने सदर भरती रद्द करून नवीन भरती करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिला. (वार्ताहर) महाराजस्व अभियान व विस्तारित समाधान योजना कार्यक्रमांतर्गत आमदार अहेर यांनी देवळा तहसील कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन केले होते.