शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीत टॅँकरचे प्रस्ताव धूळ खात पडून

By admin | Updated: May 22, 2017 01:31 IST

तालुक्यातील काही वाड्यांचे टॅँकरचे प्रस्ताव इगतपुरीच्या पंचायत समितीत धूळ खात पडून असल्याचे चित्र दिसत आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कबेलगाव कुऱ्हे : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून इगतपुरीची ओळख आहे. तालुक्यातील १२९ महसुली गावांपैकी पूर्व भागातील अनेक गावांना पाण्याची टंचाई कायम भेडसावत आहे. आजही काही आदिवासी वाड्यांना दूषित आणि गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे, तर काही वाड्यांचे टॅँकरचे प्रस्ताव इगतपुरीच्या पंचायत समितीत धूळ खात पडून असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी हातपंपावरून पिण्याचे पाणी आणले जाते. ग्रामीण भागातील महिला दुष्काळी परिस्थितीला मात्र खूप वैतागल्या आहेत. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अनेक व्यक्ती खा३गी पाण्याचे टँकर मागवितात, तर काही शेतकरी आपली शेती वाचविण्यासाठी या खासगी टँकरचा उपयोग करीत असतात. त्यामुळे त्यांच्या पिकांना जीवदान मिळत असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो परंतु तो ग्राहकांना परवडणारा नसूनदेखील अनेक जण टँकरलाच पसंती देत आहेत. तालुक्यात दोन महिन्याच्या कालावधीत अंदाजे चारशेच्या आसपास विवाह संपन्न झाले. त्यामध्ये अंदाजे ग्राहकाला एक दिवसाला पिण्याचे पाणी १८०० रुपये टॅँकरप्रमाणे लागतात, तर एका दिवशी अनेक ग्राहकांना लाखो रुपये मोजावे लागतात. लग्नसराई असल्याकारणाने या सोहळ्यासाठी अनेक जण पिण्याच्या पाण्यासाठी खासगी टँकर मागवितात. साधारण या टॅँकरसाठी ग्राहकांना सुमारे दोन हजार रुपये टॅँकरधारकांना द्यावे लागतात. तालुक्यातील पाण्याची परिस्थिती पाहता टँकरधारकांना दुष्काळ आता हवाहवासा वाटू लागला आहे. इगतपुरी तालुक्यात खासगी टँकर २५० ते ३०० च्या आसपास असून, या परिस्थितीत त्यांची चांदी होत आहे. अनेक पाण्याच्या टॅँकरवर मोबाइल नंबर लिहिलेले असून, ग्राहक पाणी मिळावे यासाठी सदर मोबाइलवर फोन करताना दिसतात. बऱ्याच गावांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने खासगी टँकरधारकांना पाचारण केले जाते. साधारण एका टॅँकरची क्षमता १० हजार लिटर एवढी असते .